शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

एक करंजी-एक लाडू म्हणत टेम्पो भरभरून पाडय़ांवर जाताय? -जरा थांबा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 16:51 IST

शहरातल्या सर्व मित्र-मैत्रिणींना आमची हीच विनंती आहे. पाडय़ावर दिवाळीत जरूर या, पण फराळवाटपखोर म्हणून येऊ नका. आम्हाला बिचारे समजून येऊ नका. दानाचे पुण्य कमवायला येऊ नका. आनंद शेअर करायला या. -जमेल?

ठळक मुद्देफराळापेक्षा माणसांनी एकमेकांच्या जवळ येणं मोलाचं हे विसरू नका. 

मिलिंद थत्ते

दिवाळी हा आपला सर्वाचा सण. प्रत्येकाची सण साजरा करण्याची पद्धत थोडी वेगळी. कुठे गूळ घालून गोड करायची रीत, तर कुठे साखर. कुठे ओलं खोबरं, तर कुठे सुकं खोबरं. कुठे तूप तर कुठे तेल.  दिवाळी साजरी करताना काकडीच्या रसात तांदळाचे पीठ भिजवून केलेली पानात वाफवलेली गोड सावळी भाकरी, घुगर्‍या आणि अर्थातच घरातल्या गावठी कोंबडय़ाची भाजी असा मस्त बेत आमच्या जव्हार-मोखाडय़ाच्या पाडोपाडी असतो. याचवेळी कांदफळे आणि चवळीची भेट घरोघरी लोक देतात. सावळी भाकरी आणि भाजीची ताटेही एकमेकांच्या घरोघरी जातात. दिवाळीआधी घरातला पुरुष बाहेरगावी कामाला गेला असेल तर परत आलेला असतो. त्याने आणलेल्या पैशांतून नवीन कपडय़ांची खरेदीही झालेली असते. शाळांना सुटी असल्यामुळे बाहेरगावी शाळेत गेलेली मुले-मुलीही परत आलेली असतात. गाव कसं भरलेलं असतं, आनंदाचं वातावरण असतं. काही ठिकाणी शेणाचा गोळा कुडावर थापून त्यावर झेंडूच्या फुलांनी शाकारलेले असते. अशी आमची पाडय़ावरची दिवाळी होत असतानाच एखादा टेम्पो येतो.. त्यातून आलेल्या लोकांनी लाडू-करंजी-चिवडा आणि काही काही वस्तू आणलेल्या असतात. आमच्या काही गावांना तर याची सवयच झाली आहे. असा टेम्पो दिसला की छोटी पोरं धावतात, गर्दी करून टेम्पोवाले जे काही देतील ते घेतात. त्यातले काही पदार्थ आम्हाला सवयीचे नसतात, आवडीचे नसतात, मग ते फेकून द्यायचे आणि आवडलेले खायचे. पुढचा टेम्पो किंवा कार आली की त्यात काय आहे हे बघून ठरवायचे, जायचे की नाही! काही कारवाले तर भराभर पाकिटं वाटतात, पोरांना तसंच उभं करून फोटो काढतात, आपला बॅनर लावतात, स्वतर्‍च कॅमेर्‍याकडे बघून हसतात. सगळी मजाच वाटते आम्हाला.. आम्ही दिवाळी कशी करतो हे बघायलाही या पाहुण्यांना उसंत नसते. आमची दारं उघडी असतात, आल्या पाहुण्याचं आम्ही मनापासून स्वागत करतो. आम्ही शेतकरी असल्यामुळे जेवण मोजून वाढत नाही, जो पाहुणा येईल त्याला पोटभर जेऊ घालतो. आम्हाला जे छान वाटतं, खायला आवडतं, ते आमच्या दिवाळीत असतंच. एखादं पाहुणा सवडीनं आला तर आम्ही आमच्या मेजवानीत त्याचंही ताट वाढू की! पण हे फराळवाटे पाहुणे भलतेच घाईत असतात. त्यात त्यांना असं वाटतं की आमच्याकडे त्यांच्या आवडीचे लाडू-करंजी वगैरे नाही म्हणजे जशी काही आम्ही दिवाळीच करत नाही. खरं तर हे पाहुणे चांगल्या मनाने येत असतील, तर त्यांनी थोडा संथ श्वास घ्यावा. आमच्याकडची शुद्ध हवा भरून घ्यावी. आमच्या घरात मांडी घालून घटकाभर बसावं. आमची कांदफळं, दिवाळीतले इतर पदार्थ चाखावेत. आम्हीही त्यांच्याकडचे चाखू. सारे भारतीय माझे बांधव आहेत, हीच तर आपली सर्वाची प्रतिज्ञा आहे. मग दिवाळीसारख्या सणात भावाभावांनी एकत्र येणं, एकत्र  जेवणं, एकमेकांचे आनंद अनुभवणं- यासारखी दुसरी छान गोष्ट काय असू शकते? शहरातल्या सर्व मित्र-मैत्रिणींना आमची हीच विनंती आहे. पाडय़ावर दिवाळीत जरूर या; पण वाटपखोर म्हणून येऊ नका. आम्हाला बिचारे समजून येऊ नका. दानाचे पुण्य कमवायला येऊ नका. आनंद शेअर करायला या. तरुण असाल तर आमच्याबरोबर खेळायला या. छोटे असाल तर आमच्याबरोबर जंगल फिरायला या. कुणाकडे पाहुणे जाताना आपण खाऊ नेतोच की, तसाच थोडा फराळ घेऊनही या. (डबाभर, टेम्पोभर नाही). आणि फराळापेक्षा माणसांनी एकमेकांच्या जवळ येणं मोलाचं हे विसरू नका.     - एक पाडय़ावरचा  रहिवासी