शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
3
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
4
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
5
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
6
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
7
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
8
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी
9
Guruvar Ke Upay: गुरुवार विशेष उपाय कराल, तर एका हळदीच्या गाठीने मालामाल व्हाल!
10
भारताच्या डावपेचामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; ८ हजार किमी सीमेवर युद्धाचं सावट, काय घडतंय?
11
IND vs AUS : सूर्याचं 'ग्रहण' सुटलं! हिटमॅन रोहितच्या क्लबमध्ये एन्ट्री; MS धोनीचा विक्रमही मोडला
12
Fact Check: कंडोममुळं तुंबली गर्ल्स हॉस्टेलची पाईपलाईन? व्हायरल व्हिडीओमुळे नको ‘त्या’ चर्चा!
13
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
14
८ व्या वेतन आयोगाचा केव्हापासून मिळणार फायदा, संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागणार? जाणून घ्या
15
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
16
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
17
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
18
VIDEO: बकरीसोबत रील बनवत होती एक मुलगी, अचानक बकरीने जे केलं... पाहून तुम्हालाही येईल हसू
19
'कांतारा'फेम ऋषभ शेट्टीने साकारला होता 'घाशीराम', गाजलेल्या मराठी नाटकाशी आहे 'हे' कनेक्शन
20
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?

स्वप्न मोठी पण कृती शून्य!- असं होतंय का तुमचं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 17:19 IST

डोक्यात विचार खूप ! स्वप्न मोठी ! धमक? - दांडगीच! पण करता काय? काहीच नाही. हातात सतत मोबाइल. घरकाम शून्य. दुपार्पयत झोपा आणि बडय़ा बडय़ा बाता यातच मनातली स्वप्न गरगर फिरतात. प्रत्यक्षात घडत काहीच नाही. असं का होतं?

ठळक मुद्देमला मोठं करिअर करायचं आहे, असं म्हणून कुणाचंच करिअर होत नसतं !

- श्रुती पानसे

दहावी - बारावी आणि अगदी पदवीच्या आसपासही असलेल्या, ‘पुढं काय?’ या प्रश्नाच्या उंबरठय़ावरच्या मुलामुलींच्या मनात डोकावून बघितलं तर काय दिसतं?स्वतर्‍च्या आयुष्याबद्दलची छान स्वप्नं.या स्वप्नांच्या जोडीला प्रचंड आशा, आपण जे ठरवू तेच होणार याबद्दल खात्नी. आपण आपल्या आयुष्यात भरारी मारणारच यावर विश्वास.मात्न?या सगळ्या कल्पनांना वास्तवाची, मेहनतीची, अभ्यासाची जोड लागते. सहनशीलता लागते. आपल्यापाशी जिद्द तर असावी  लागतेच. महत्त्वाचं म्हणजे कष्ट एक-दोनदा नाही तर सतत करावे लागतात. ते करण्याची तयारी ठेवावी लागते. हे सारं मात्र स्वप्नांच्या भरारीत लक्षात घेतलं जात नाही, किंवा लक्षातच येत नाही.यश आणि यशासाठीची तयारी असे दोन टप्पे कुठल्याही स्वप्नचे केले तर त्यामध्ये अनेक गोष्टी असतात. स्वप्न  पाहणार्‍या प्रत्येकाला यश हवंच असतं. मात्र स्वप्न  पाहण्यापलीकडे ते प्रत्यक्षात उतरावं म्हणून आता त्यासाठी काय चालू आहे? या प्रश्नाचं उत्तर शोधायला हवं.एकतर हल्ली सगळ्यांच्या हाती वेळखाऊ मोबाइल आहे.  ज्यातून काहीही मिळणार नाही, असे पबजीसारखे घातक गेम्स आहेत. इन्स्टाग्रामसारखी साधनं आहेत. घरात सतत बसून राहिल्यामुळे अंगात आळशीपणा वाढतो आहे. विविध मानसिक आजार जडताहेत. शारीरिक आणि मानसिक तत्परता कमी होते आहे. मोबाइल व्यसनाधीनता वाढते आहे.त्याचा परिणाम असा की, थोडंसं मनाविरुद्ध झालं की लगेच नैराश्य येतं. ‘मी जातो/जाते घर सोडून’ अशा आईबाबांना धमक्या दिल्या जातात. आकर्षण वाटणं, प्रेम प्रकरणं, अफेअर, त्यातली पॅचअप आणि  ब्रेकअप हे सारखं चालू असतं. जगताना जरा काही बिनसलं, हवं ते मिळण्याची एखादी पायरी निसटली तर या जगात आपलं कोणी नाही, आपण हे जग सोडून जायला पाहिजे, असे विचार मनात येतात.आणि त्या विचारचक्रात हरवून जे करायचं तेही आपण करत नाही. त्यामुळे नुस्ती स्वपंA, इच्छा, विचार यापुढे जायला हवं. आणि त्याही पुढे जाऊन यश हवं असेल तर काही गोष्टी स्वीकाराव्या लागतील, काही टाळाव्या लागतील. 

1. निर्णय विचारपूर्वक या वयातले बहुतेक सगळे निर्णय टोकाचे असतात. म्हणून आपले बहुतेक सर्व निर्णय कधी आनंदात, तर कधी आत्यंतिक प्रेमात, कधी दुर्‍खाच्या कडेलोटात, अनावर राग आणि प्रचंड संतापात घेतले जातात. याच्याच जोडीला कधी अपमानांचं वेड असतं तर कधी खोल निराशा. कोणत्याही भावनेच्या गर्तेत वाहून न जाता निर्णय घेता आले पाहिजेत. कोणत्याही बाबतीत लहानसंही यश मिळवायचं असेल तर  ‘नाही’ ऐकायला शिकायला तर हवंच. कोणीही ‘नाही’ म्हटलं म्हणून आपला प्रवास काही थांबणार नाहीये, तो चालूच राहणार आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे.काही वेळा आपण स्वतर्‍ला खूपच शहाणे समजतो, त्यामुळे आपल्याकडून निर्णय घेण्यात काही चुका होतात. याचं कारण टीनएजमधली मुलं भावनांच्या प्रभावाखाली असतात. कारण त्यांचा मेंदू अमिग्डाला या भावनेच्या केंद्रातून निर्णय घेतो. त्यामुळे त्याचाच प्रभाव त्यांच्यावर असतो.आपल्या मेंदूत एक विचारांचं केंद्र असतं. ज्याला आपण सारासार विचार करतो. ते प्री-फ्रंटल कॉर्टेक्स या भागात असतं. किशोरावस्थेत या केंद्रातून मेंदू विचार करू शकत नाही. थोडं मोठं झाल्यावर साधारण बाविशी- पंचविशीनंतर या केंद्रातून विचार सुरू होतो. यानंतर घेतलेले निर्णय सहसा चुकत नाही. यासाठी विचार करताना आणि कोणताही निर्णय घेताना तो योग्य पद्धतीने असावा यासाठी घाईत निर्णय न घेता, थोडं थांबून निर्णय घ्यायला पाहिजेत. त्याचा परिणाम चांगला होईल.

2. गोंधळाचं धुकं दूर करा‘माझ्या मनात कन्फ्युजन आहे,’ असं सारखं म्हटलं तर हे वाढेल. आणि नीट सोडवलंत तर सुटेल. कन्फ्युजन हे तात्पुरतं असतं. एकाच वेळेला दोन वेगळ्या  क्षेत्नांबद्दल आकर्षण वाटू शकतं. दोन्ही करणं शक्य नसतं, किंवा दोन्ही सोडणं शक्य नसतं. फार पूर्वी नाही; पण गेल्या काही वर्षात ज्यांनी ज्यांनी करिअरचा निर्णय घेतला आहे त्यांच्याशी बोला. आपल्याला तेच करिअर निवडायचं नसेल तरी. यातून आपल्याला सध्याच्या काळात नक्की काय चालतं, याची माहिती मिळू शकते. ज्यांना भेटाल त्यातले काही करिअरविषयी समाधानी असतील, तर काही असमाधानी असतील. त्यांचे अनुभव विचारा. सगळ्यांकडून ही जी माहिती मिळेल, ती  उपयुक्तच असेल.कन्फ्युज्ड मुलांनी हे समजून घ्यायला हवं की आत्ता काहीकाळ गोंधळ असला तरी चालेल. यातूनच पुढे आपली वाट सापडणार आहे.

3. योग्य तेवढय़ाच अपेक्षाकाही मुलं स्वतर्‍कडून अवास्तव अपेक्षा ठेवतात. त्या पूर्ण करू न शकणं, ठरवलेल्या वाटेवर अडचणी आल्या तर थेट आयुष्यातूनच उठल्यासारखं वाटणं. इतर पर्यायांचं अस्तित्व नाकारणं, अशा विचारांमध्ये गुरफटणारी मुलं असुरक्षिततेच्या छायेत वावरतात. त्यांच्या मनाचा एक कोपरा कायम भीतीच्या सावटाखाली असतो. अशी मुलं एरवी नीट वागली, तरी त्याच्या मनावर घातक परिणाम झालेले असल्यामुळे मन एकाग्र होण्यात अडथळे येतात. सगळ्यांशी मिळून मिसळून राहू - बोलू शकत नाही. मोकळेपणाने कुणाशी मैत्नी करू शकत नाही. आत्मविश्वास कमी होतो. मनावर झालेला परिणाम शरीरावरही दिसून येतो. असे नकारात्मक परिणाम त्यांच्यावर होत असतात. या नकारात्मकतेच्या  मुळाशी असलेली भावना जास्त घातक आहे ती म्हणजे स्वत्वाला बसलेला धक्का. स्वतर्‍च्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही यामुळे आलेली अस्वस्थता.यातून सावरण्यासाठी यश अणि अपयश दोन्ही पचवण्याची तयारी पाहिजे. 

4. घरातल्यांशी मोकळ्या गप्पावाढत्या वयातल्या मुलांमुलींसाठी घरातलं वातावरण हीदेखील एक समस्या असते. आपल्याशी घरातले लोक नीट वागत नाहीत, समजून घेत नाहीत, हा एक खूप मोठा आक्षेप असतो. त्यामुळे त्यांचं मन मित्नांकडे जास्त ओढा घेतं. पण यामुळे मनातला एकटेपणा संपत नाही.  चिडचिड वाढते.आईबाबा असे वागतात, यामागे एकच कारण आहे ते म्हणजे काळजी. तुमची काळजी, मार्काची काळजी, करिअरची काळजी, तुमच्या इमेजची काळजी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाईट सवयी/संगत लागू नये याची काळजी. घरची माणसं आपल्याला समजून घेत नाहीत असं वाटतं, सारखे सारखे प्रश्न विचारतात. तेव्हा यापैकी एका गोष्टीची किंवा अनेक किंवा या सर्व गोष्टींची काळजी एकाच वेळेला वाटत असते. म्हणून हे सर्व घडतं.काही झालं तरी घरात कोणतंही नकारात्मक वर्तन करायचं नाही, ही पहिली खूणगाठ घरातल्या सर्वानीच मनाशी पक्की करणं सगळ्यात आवश्यक आहे. एकमेकांसमोरच्या अडचणी दूर करायचा प्रयत्न करण्यासाठी एकमेकांशी बोलणं आवश्यक असतं.

5.  मन रिकामं न ठेवणंकाही मुला-मुलींच्या मनात कसला तरी न्यूनगंड तयार झालेला असतो. आपण इतरांपेक्षा कमी, अशी एक अतिशय जाणीव निर्माण झालेली असते. हा न्यूनगंडदेखील कशाचाही असू शकतो. चांगली बुद्धी, रूप, पुरेसे पैसे, चांगले कपडे नाहीत, मजा करायला गाडी नाही, चांगले मित्न नाहीत, असा कसलाही गंड मनात घर करून राहू शकतो. एकदा घट्टपणे मनात असा गंड तयार झाला की तो जाता जात नाही. अशा मुलांकडे कितीही चांगले गुण असले तरी या न्यूनगंडामुळे ते गुण बाहेर येऊ शकत नाहीत. आळस करणं, दिशाहीन असणं, करिअरचा चुकीचा निर्णय, घरातल्यांशी चांगला संवाद नसणं, व्यायामाचा, छंदांचा, चांगल्या मित्नमैत्रिणींचा चांगल्या माणसांचा अभाव, यामुळे जर काही चुकीच्या कल्पना घडत असतील तर या विचारांना मनात थारा न देणं चांगलं.म्हणून अशा गोष्टी आयुष्यात घडत असतील तर त्यावर उपाययोजना शोधा. नव्याने स्वतर्‍कडे बघा आणि चुका सुधारा स्वतर्‍च्या ! मुख्य म्हणजे स्वतर्‍चं मन फार काळ रिकामं ठेवू नका. गुंतवून ठेवा.  मोबाइल गेम्समध्ये वेळ आणि मन गुंतवून घेतल्यासारखं वाटतं. पण ते चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करणं आहे. ज्यावेळेस आपण काही प्रत्यक्ष काम करू आणि त्यात यशस्वी होऊ, आयुष्यात प्रोत्साहनपर असं काही तरी घडेल त्यावेळेस हे गंड आपोआप नाहीसे होतील.मात्र हे सारं आपोआप घडणार नाही. तुम्हालाच झडझडून उठून कामाला लागलं पाहिजे. जिद्दीनं कष्ट करत आपली वाट शोधली पाहिजे.त्याची तयारी आहे का?की आपण बसल्या जागीच फक्त गप्पा मारतोय, हे विचारा स्वतर्‍ला.( लेखिका मेंदूविकास अभ्यासक - सल्लागार आहेत)