शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
3
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
4
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
5
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
6
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
7
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
8
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
9
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
10
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
11
Secret Santa : अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
12
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
13
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
14
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
15
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
16
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
17
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
18
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
20
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
Daily Top 2Weekly Top 5

थांबलो नाही म्हणून जगलो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 07:00 IST

गाव सोडलं, संकटं आली, फसवणूक झाली; पण संघर्ष थांबवला नाही.

ठळक मुद्देनवीन जागा, नवीन शहर, नवीन माणसं आपल्याला भेटतात. त्यातून आपण शिकत जातो.

विठ्ठल देवकर

मी सोलापूर जिल्ह्यातल्या लऊळ या छोटय़ाशा गावचा. घरची परिस्थिती खूपच हालाखाची जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून वडिलांसोबत आठवडा बाजारात चुना  (पान  तंबाकू खायचा) विकायला जायचो. उन्हाळी आणि दिवाळी सुटय़ांमध्ये वडिलांना मदत करायला, चुनखडी गोळा करायला जायचो. अशा परिस्थितीत शिकलो, दहावी झालो. आम्ही दोघं भाऊ. मी धाकटा. आईला नेहमी वाटायचं माझ्या एकातरी पोरानं शिकलं पाहिजे. त्यात भावकीचा खूप त्नास. मग वडिलांनी ठरवलं पुढील शिक्षणासाठी बाहेर गावी टाकायचं. म्हणून अकरावी-बारावीसाठी अकलूजला शिकायला पाठवलं. पहिलं वर्ष खडतर गेलं; परंतु प्रसंगांना एकटय़ानं धीरानं तोंड देत गेलो. बळ मिळत गेलं. नंतर मागे वळून पाहिलं नाही. बारामतीमध्ये बीएस्सी, कम्प्युटर सायन्स केलं.एमएस्सी करायला पुण्यात आलो. त्याच काळात एका मित्नानं सांगितलं तुला कसबा पेठमध्ये रूम मिळवून देतो; पण एका महिन्याचं भाडं इस्टेट एजंटला द्यावं लागेल. नंतर कळलं तो त्याचा मोठा भाऊ होता, इस्टेट एजंट पण नव्हता. त्यांनी मला फसवलं. फार वाईट वाटलं. त्याच काळात फार वाईट दिवस अनुभवले. पण त्यातूनही शिकलो, तरलोच.आता मी एका नामांकित बहुराष्टीय कंपनीत उत्तम पदावर काम करतो आहे. अजून पुण्यात स्थिरावण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्याला भेटणारी सगळीच माणसं चांगली असतात असं नाही. नवीन जागा, नवीन शहर, नवीन माणसं आपल्याला भेटतात. त्यातून आपण शिकत जातो. संघर्ष करतो आणि त्याला मेहनतीची जोड देतो. प्रवास सुरूच ठेवतो.