शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

विकासाचं तोंड गावात दिसलं पाहिजे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 08:00 IST

कोल्हापूर जिल्ह्यातलं उंड्री नावाचं लहानसं गाव. ति‌थल्या तरुण मुलामुलींनी एकत्र येत पॅनल बनवलं. ते लढले आणि..

-इंदुमती गणेश

आम्ही लहान असल्यापासून बघतोय ग्रामपंचायतीत वर्षानुवर्षे तीच माणसं, त्यांचीच सत्ता. पण गावात विकासाचा पत्ता नाही. आदर्श गाव म्हणून बाकीची गावं गाजतात, त्यात आमचं गाव कुठंबी न्हाई. एकाच जागी थांबलंय जखडून ठेवल्यागत. बदल हवा होता, मग आम्ही ठरवलं ग्रामपंचायतीला लढायचं. आम्ही पॅनल उभारतोय म्हटल्यावर एवढी वर्षे एकमेकांना पाण्यात बघणारे सत्ताधारी-विरोधक एकत्र आले. आम्हाला प्रभागात उमेदवारच मिळू देईना. आमच्या नावाच्या पॅम्पलेटवर नारळ, सुया टोचलेले लिंबू, हळद-कुंकू, ब्लाऊजपीस ठेवून भानामतीची भीती दाखवायलाही काही मागे हटले नाहीत. माघारीसाठी दबाव, फोडाफोडीचं राजकारणही झालं. पण आम्ही लढलो, आता निवडून आलो. इच्छा एकच, गावचा विकास झाला पाहिजे..

- कोल्हापूरपासून ३७ किलोमीटरवर पन्हाळा तालुक्यातील उंड्री नावाचं लहानसं गाव आहे. या आडवाटेवरच्या गावात पहिल्यांदाच ग्रामपंचायतीत निवडून आलेले तरुण सदस्य आपला अनुभव सांगत होते. या गावातल्या तरुणांनी ठरवलं, आपणच पुढाकार घेऊन इलेक्शन लढवू. मग त्यांनी एकत्र येत श्री निनाई जनयुवाशक्ती पॅनल नावाचं तयार केलं. नऊ जागा लढवल्या. सगळेच पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे. त्यापैकी पाच जण निवडून आले. उज्ज्वला कांबळे, सविता यादव, रंजना यादव, शहाजी यादव व शरद मोरे यांनी विजय मिळवला. गावकऱ्यांनी या नव्या तरुण उमेदवारांवर भरवसा ठेवला.

त्यांच्याशी बोलायला म्हणून त्यांच्या गावी जावं तर धड रस्ता नाही. मुख्य म्हणून जो रस्ता त्यात खड्डेच जास्त. गावात दर्शनी जी ग्रामपंचायतीची इमारत दिसते तीही पडकीच. बाजूला तुंबलेली गटारं, अस्वच्छता. गावाला जोडून खोतवाडी आणि चव्हाणवाडी असे दोन वाडे आहेत, इथलं एकूण मतदान तेराशेच्या आसपास. गावात सेंट्रिंगचा मुख्य व्यवसाय. सोबत एमआर, शेती आणि दुग्ध व्यवसाय. शाळा सातवीपर्यंत. पुढच्या शिक्षणासाठी दोन-तीन किलोमीटरवरच्या दुसऱ्या गावात जावं लागतं.

निवडणूक लढवणाऱ्या-जिंकणाऱ्या या तरुण दोस्तांशी बोलणं झालं. तर ते सांगतात, ‘हे गावंच चित्र पाहताय तुम्ही. आम्ही ठरवलं, आपल्या शिक्षणाचा उपयोग गावासाठी करू. गावचा विकास झाला पाहिजे, हे चित्र बदललं पाहिजे. आम्ही निवडणूक लढवायची म्हटलं तर आधी तर चेष्टाच झाली. कशाला नाही ते उद्योग करताय, असा सल्लाही मिळाला. अनुभव तर आम्हालाही नव्हता, आजही नाही. पण घरोघर जाऊन लोकांशी बोललो, त्यांनी आमच्यावर भरवसा ठेवला. आता त्या भरवशाला जागून काम करायचं आहे.’

निवडून आलेल्यात तीन तरुणी त्यापैकी दोघी विवाहित आणि दोन तरुण. सगळे सर्वसामान्य कुटुंबातले, कष्टकरी. कोणलाही राजकीय पार्श्वभूमी नाही. हाती पैसाही नव्हताच. मात्र त्यांनी हिंमत करून निवडणूक तर लढवलीच. गप्पांनंतर गावात एक फेरफटकाही मारला. परत निघालो तेव्हा सगळे म्हणाले, ताई पुढच्यावेळी तुम्ही याल तेव्हा तुम्हाला आमचं गाव बदललेलं दिसेल..

या तरुण हातांच्या कष्टांना यश लाभो, या शुभेच्छा..!

( इंदुमती लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीत वार्ताहर आहे.)

indu.lokmat@gmail.com