शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

काय तो निर्णय घ्याच!

By admin | Updated: October 30, 2014 19:37 IST

आपण काही निर्णयच घ्यायचा नाही, काही जबाबदारीच घ्यायची नाही, असं कातडीबचाव धोरण असेल, तर कसं तुमचं करिअर होईल?

विनोद बिडवाईक

आपण काही निर्णयच घ्यायचा नाही, काही जबाबदारीच घ्यायची नाही, असं कातडीबचाव धोरण असेल, तर कसं तुमचं करिअर होईल?

-----------------

आपण आयुष्यात किती निर्णय घेतो. खरं तर हरघडी निर्णयच घेत असतो. गर्दीच्या वेळेस कोणती बस घ्यावी इथपासून ते कुठले कपडे घ्यायचे, कुठलं शिक्षण घ्यायचं, कुठलं करिअर करायचं हे सगळे निर्णय आपल्याला घ्यावेच लागतात. 
गर्दीच्या वेळेस स्पेसिफिक बसने वेळेवर जात, बसायला जागा, विंडो सीटही घेणं हे तुमचं लॉजिक आहे. हे लॉजिक तुमच्या मेंदूत आपोआप प्रोसेस होतं आणि तुम्ही निर्णय घेता.
आपण हे जे रोजच्या आयुष्यात करतो तेच जॉब करताना, ऑफिसातही करावं लागतं.
जेव्हा तुम्ही जॉब करता तेव्हा बरेचसे निर्णय तुम्हाला घ्यावे लागतात. एखाद्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला कसं वागायला हवं इथपासून तर अचूक निर्णय घेत काम कसं तडीस न्यावं हे तुमचं तुम्ही ठरवणं अपेक्षित असतं. प्रत्येक गोष्ट तुम्ही बॉसला विचारणो अपेक्षित नाही. संस्थेच्या कल्चरप्रमाणो कदाचित एकादा बॉस सगळे निर्णय घेतही असेल, पण एखादा निर्णय घेतला आणि तो योग्य कसा आहे हे पटवून दिलं तर बॉस ऐकतो, कौतुकही करतो. असं करणारे अनेक कर्मचारी आपल्या अवतीभोवती असतात. 
उमेदवाराकडे ही अत्यंत महत्त्वाची निर्णयक्षमता आहे की नाही हेच बरेचदा मुलाखतीत तपासलं जातं. 
मुलाखतकर्ता बरेचदा एखादी काल्पनिक घटना सांगतो आणि अशा परिस्थितीत तू कसा वागशील? असं   विचारतो. या प्रश्नावर तुमच्या मेंदूचा खरा कस लागतो. एकतर अशा सिच्युएशनचा तुम्ही विचार केलेला नसतो. अचानक ती सांगितली जाते. विचार करायला वेळच नसतो. तेवढय़ातल्या तेवढय़ात मग तुम्हाला बरेचसे अल्टरनेटिव्ह स्वत: शोधावे लागतात. सांगावे लागतात.
त्या घटनेचं तुम्ही कसं विेषण करता आणि भविष्यातील होणा:या परिणामाचा कसा विचार करता हे तुम्ही सांगितलेल्या उत्तरात तपासलं जातं. निर्णय करताना तुम्ही वेगवेगळे पर्याय कसे तपासले आणि योग्य निष्कर्षावर कसे पोहोचलात हे समजून घेतलं जातं. 
खरं सांगायचं तर आजच्या वर्क कल्चरमध्ये प्रभावी निर्णयक्षमता अतिशय आवश्यक आहे. एखाद्या इमेलला काय उत्तर द्यावं या साध्या प्रश्नावर डोकं खाजवणा:या आणि हातावर हात धरून बसलेल्या अनेक व्यक्ती मी अवतीभोवती बघितल्या आहेत. 
मात्र असे निर्णय न घेतल्यामुळे कामाचं प्रचंड तणाव एखाद्या व्यक्तीवर येऊ शकतो. व्यवसायावर नकारात्मक प्रभाव पडतो तो वेगळा. कर्मचा:यांसाठी एअरलाईनची तिकिटे बुक करणा:या फ्रंट ऑफिसच्या कर्मचा:याने वेळेवर तिकिटे बुक केली नाही.  तर तिकिटांची किंमत दुप्पट द्यावी लागते. एक दिवस निर्णय न घेतल्यामुळे तिकिटांची किंमत वाढीव द्यावी लागते. तोटा होतोच.
प्रत्येक व्यवसायात हा नियम लागू होतो. वेळेवर निर्णय घेणं आणि कामाला लागणं महत्त्वाचं. प्रत्येक व्यक्तीचा वाटा आपल्या परीने असतो. अगदी तळातला कर्मचारीही ब:यापैकी कॉस्ट सेव्ह करू शकतो.
मात्र अनेकजण काही निर्णय घ्यायला, स्वत:चं डोकं चालवून काही काम करायलाच कचरतात. पण तं पाहता या प्रभावी निर्णयक्षमतेचं तंत्र खूप कठीण नाही. 
 मुलाखतीत निर्णयक्षमता जोखणारा एखादा प्रश्न आलाच तर शांतपणो परिस्थिती समजून घ्या. विचार करायला एक छोटासा पॉज घ्या. कदाचित भुतकाळात अशाप्रकारची काही परिस्थिती तुम्ही, तुमच्या मित्रने, आईवडिलांनी हाताळली असेल. याचा विचार करा. वेगवेगळ्या पर्यायाचा विचार करा आणि महत्त्वाचं म्हणजे भविष्यात या पर्यायापैकी कुठला पर्याय प्रभावी ठरू शकेल याचा विचार करून निर्णय घ्या.
उत्तर देतानाही सांगा की, मी अमुक निर्णय घेईन, त्यामागे हे लॉजिक आहे.
बिचकू मात्र नका, निर्णय घेणं तसं काही फार अवघड नसतो, फक्त जबाबदारी घ्यायची तयारी ठेवाच.