शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

काय तो निर्णय घ्याच!

By admin | Updated: October 30, 2014 19:37 IST

आपण काही निर्णयच घ्यायचा नाही, काही जबाबदारीच घ्यायची नाही, असं कातडीबचाव धोरण असेल, तर कसं तुमचं करिअर होईल?

विनोद बिडवाईक

आपण काही निर्णयच घ्यायचा नाही, काही जबाबदारीच घ्यायची नाही, असं कातडीबचाव धोरण असेल, तर कसं तुमचं करिअर होईल?

-----------------

आपण आयुष्यात किती निर्णय घेतो. खरं तर हरघडी निर्णयच घेत असतो. गर्दीच्या वेळेस कोणती बस घ्यावी इथपासून ते कुठले कपडे घ्यायचे, कुठलं शिक्षण घ्यायचं, कुठलं करिअर करायचं हे सगळे निर्णय आपल्याला घ्यावेच लागतात. 
गर्दीच्या वेळेस स्पेसिफिक बसने वेळेवर जात, बसायला जागा, विंडो सीटही घेणं हे तुमचं लॉजिक आहे. हे लॉजिक तुमच्या मेंदूत आपोआप प्रोसेस होतं आणि तुम्ही निर्णय घेता.
आपण हे जे रोजच्या आयुष्यात करतो तेच जॉब करताना, ऑफिसातही करावं लागतं.
जेव्हा तुम्ही जॉब करता तेव्हा बरेचसे निर्णय तुम्हाला घ्यावे लागतात. एखाद्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला कसं वागायला हवं इथपासून तर अचूक निर्णय घेत काम कसं तडीस न्यावं हे तुमचं तुम्ही ठरवणं अपेक्षित असतं. प्रत्येक गोष्ट तुम्ही बॉसला विचारणो अपेक्षित नाही. संस्थेच्या कल्चरप्रमाणो कदाचित एकादा बॉस सगळे निर्णय घेतही असेल, पण एखादा निर्णय घेतला आणि तो योग्य कसा आहे हे पटवून दिलं तर बॉस ऐकतो, कौतुकही करतो. असं करणारे अनेक कर्मचारी आपल्या अवतीभोवती असतात. 
उमेदवाराकडे ही अत्यंत महत्त्वाची निर्णयक्षमता आहे की नाही हेच बरेचदा मुलाखतीत तपासलं जातं. 
मुलाखतकर्ता बरेचदा एखादी काल्पनिक घटना सांगतो आणि अशा परिस्थितीत तू कसा वागशील? असं   विचारतो. या प्रश्नावर तुमच्या मेंदूचा खरा कस लागतो. एकतर अशा सिच्युएशनचा तुम्ही विचार केलेला नसतो. अचानक ती सांगितली जाते. विचार करायला वेळच नसतो. तेवढय़ातल्या तेवढय़ात मग तुम्हाला बरेचसे अल्टरनेटिव्ह स्वत: शोधावे लागतात. सांगावे लागतात.
त्या घटनेचं तुम्ही कसं विेषण करता आणि भविष्यातील होणा:या परिणामाचा कसा विचार करता हे तुम्ही सांगितलेल्या उत्तरात तपासलं जातं. निर्णय करताना तुम्ही वेगवेगळे पर्याय कसे तपासले आणि योग्य निष्कर्षावर कसे पोहोचलात हे समजून घेतलं जातं. 
खरं सांगायचं तर आजच्या वर्क कल्चरमध्ये प्रभावी निर्णयक्षमता अतिशय आवश्यक आहे. एखाद्या इमेलला काय उत्तर द्यावं या साध्या प्रश्नावर डोकं खाजवणा:या आणि हातावर हात धरून बसलेल्या अनेक व्यक्ती मी अवतीभोवती बघितल्या आहेत. 
मात्र असे निर्णय न घेतल्यामुळे कामाचं प्रचंड तणाव एखाद्या व्यक्तीवर येऊ शकतो. व्यवसायावर नकारात्मक प्रभाव पडतो तो वेगळा. कर्मचा:यांसाठी एअरलाईनची तिकिटे बुक करणा:या फ्रंट ऑफिसच्या कर्मचा:याने वेळेवर तिकिटे बुक केली नाही.  तर तिकिटांची किंमत दुप्पट द्यावी लागते. एक दिवस निर्णय न घेतल्यामुळे तिकिटांची किंमत वाढीव द्यावी लागते. तोटा होतोच.
प्रत्येक व्यवसायात हा नियम लागू होतो. वेळेवर निर्णय घेणं आणि कामाला लागणं महत्त्वाचं. प्रत्येक व्यक्तीचा वाटा आपल्या परीने असतो. अगदी तळातला कर्मचारीही ब:यापैकी कॉस्ट सेव्ह करू शकतो.
मात्र अनेकजण काही निर्णय घ्यायला, स्वत:चं डोकं चालवून काही काम करायलाच कचरतात. पण तं पाहता या प्रभावी निर्णयक्षमतेचं तंत्र खूप कठीण नाही. 
 मुलाखतीत निर्णयक्षमता जोखणारा एखादा प्रश्न आलाच तर शांतपणो परिस्थिती समजून घ्या. विचार करायला एक छोटासा पॉज घ्या. कदाचित भुतकाळात अशाप्रकारची काही परिस्थिती तुम्ही, तुमच्या मित्रने, आईवडिलांनी हाताळली असेल. याचा विचार करा. वेगवेगळ्या पर्यायाचा विचार करा आणि महत्त्वाचं म्हणजे भविष्यात या पर्यायापैकी कुठला पर्याय प्रभावी ठरू शकेल याचा विचार करून निर्णय घ्या.
उत्तर देतानाही सांगा की, मी अमुक निर्णय घेईन, त्यामागे हे लॉजिक आहे.
बिचकू मात्र नका, निर्णय घेणं तसं काही फार अवघड नसतो, फक्त जबाबदारी घ्यायची तयारी ठेवाच.