शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
5
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
6
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
7
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
8
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
9
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
10
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
11
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
12
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
13
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
14
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
15
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
16
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
17
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
18
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
19
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
20
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
Daily Top 2Weekly Top 5

दिसाड दिस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 02:00 IST

-नागनाथ खरातनागनाथ खरात.२३ वर्षांचा हा मुलगा.सभोवतालचं खेड्यापाड्यातलंवास्तव पाहून अस्वस्थ झालेला.त्यानं ठरवलं आपण सिनेमा करू.कथा लिहिली.पैसे हातउसनवार घेतले.मोबाइलवर शूट केलंआणि सांगितली,जागतिकीकरणानंतर बदलत चाललेलीखेड्यापाड्यातली गोष्टफक्त १४ मिनिटांत.आणि आजवर अनेक फिल्म फेस्टिव्हलही या फिल्मनं गाजवले.कसं जमलं त्याला हे?त्याविषयी सांगणारा नागनाथचा हा लेखचार वर्षांपूर्वी सिनेमा बनवायचं, असं जर मी घरी सांगितलं असतं, तर घरच्यांना ...

-नागनाथ खरात

नागनाथ खरात.२३ वर्षांचा हा मुलगा.सभोवतालचं खेड्यापाड्यातलंवास्तव पाहून अस्वस्थ झालेला.त्यानं ठरवलं आपण सिनेमा करू.कथा लिहिली.पैसे हातउसनवार घेतले.मोबाइलवर शूट केलंआणि सांगितली,जागतिकीकरणानंतर बदलत चाललेलीखेड्यापाड्यातली गोष्टफक्त १४ मिनिटांत.आणि आजवर अनेक फिल्म फेस्टिव्हलही या फिल्मनं गाजवले.कसं जमलं त्याला हे?त्याविषयी सांगणारा नागनाथचा हा लेखचार वर्षांपूर्वी सिनेमा बनवायचं, असं जर मी घरी सांगितलं असतं, तर घरच्यांना वेडच लागलं असतं...अकरावी-बारावीत असतानाच वर्तमानपत्रातून- मासिकातून कविता, लेख, छापून आले होते. एका कथेला पारितोषिकही मिळालं होतं. परंतु बोलण्यातला न्यूनगंड, गावाकडून शहरात आल्यामुळे आलेला बुजरेपणा, कोणाजवळही हवं तसं व्यक्त होता न आल्यानं निर्माण झालेली अस्वस्थता. त्यामुळे माणसापेक्षा पुस्तकं, सिनेमागृहं जवळची वाटत...परंतु आईवडिलांनी शेतात राब-राब राबायचं आणि आपण त्याच पैशाचा थेटरात बसून (एसीत) सिनेमा पहायचा, म्हणजे खूप मोठा गुन्हा केल्याचा ‘फील’ यायचा. असे गुन्हे आठवड्याला करत होतो. पण सिनेमा अंगात भिनला होता...शेतीला लागलेला ‘भिरूडा’च्या झळा मला पुण्यात बसायच्याघरची चारबाजूंनी ओढाताण करून असताना मी फिल्मचा विषय काढणं म्हणजे पापच करतो असं वाटायचं. पाठीमागे घराकडे पाहिलं की सगळी फिल्मी स्वप्नं गायीला वेसण घातल्यासारखी आकसून जायची.कुठं तरी नोकरी धरावी म्हणून प्रयत्न करायचो.कामातून एक रुपया कमवायची अक्कल नाही. बºयाचदा मित्राबरोबर केटरिंगच्या वगैरे कामाला जायचो. तिथे जर कोणी कवी म्हणून ओळख करून दिली तर जी घालमेल व्हायची ती शब्दात व्यक्त करण्यापलीकडे आहे.मग तेही बंद केलं......असा सगळ्याच बाजूंनी अंधार पसरलाय असं वाटायचं. आहे ती गावाकडची दहा एकर जमीन विकावी आणि इकडे यावं असं वाटायचं.जीव भयाण उदास व्हायचा......इकडे दुसºया बाजूला ‘स्मार्ट सिटी’ च्या घोषणा होत होत्या, मेट्रोचा धुराळा उडतोय, नुस्ताच टोलेजंग झगमगाट निर्माण होतोय, मीडियादेखील या डोळे टिपणाºया विकासाचा देखावा निर्माण करतोय. पण दुसºया बाजूला ६० टक्के लोक स्वप्नांना मारून जगण्यासाठीच संघर्ष करताहेत.. याची दखल कोणालाच कशी नाही?कवी पाश म्हणतो ना ‘सबसे खतरनाक होता है, सपनो का मर जाना! आज देशातील युवकांची काय अवस्था आहे? पुण्या-मुंबईत येणारे लोंढेच्या लोंढे या देशातील सरकारी धोरणाचीच प्रचिती आहे.‘दिसाड दिस’ या माझ्या शॉर्टफिल्मचं बीज इथेच आहे’. अर्थातच ती काही वरील मुद्द्यांना धरून केलेली फिल्म नाही. ती विद्रोह करत नाही. टीका करत नाही.ती फक्त गोष्ट सांगते..दूरपर्यंत पसरलेली माळराने, कोणीतरी पाठीमागून हंडा घेऊन चाललेली म्हातारी, समकालीन राजकीय, सामाजिक स्थितीचे चित्रण. यात कोणावर टीका नाही, थेटपणे भाष्य नाही. आहे ते अशोक, अब्बास आणि शीतल या माझ्याच जगण्याचं प्रतिबिंब घेऊन आलेल्या तीन लहान मुलांची कथा. ते अप्रत्यक्षरीत्या बºयाचशा बाबींवर भाष्य करतात. जागतिकीकरणानंतर बदललेलं शेतकरी तरुणाचं, गावखेड्याचं एक चित्र सांगतात...चार-साडेचार महिन्यांत पटकथा लिहिली. पण निर्माता मिळणं अवघडच होतं. तीन-चार वर्षे जागतिक सिनेमाशी थोडाफार संबंध आल्यामुळे काहीसा आत्मविश्वास होताच. पण कोणत्याही प्रकारचा ‘कोर्स’ वगैरचं माझ्याकडे प्रमाणपत्र नव्हतं. त्यामुळे कोणी विश्वास ठेवणं दुरापास्त होतं. ‘परंतु आता थांबलो तर आपली फिल्म मरून जाईल’ असं वाटायला लागलं. पुण्यातील एका शिक्षकाकडून दहा हजार रुपये घेतले. दीपक शिंदे नावाच्या मित्राला बरोबर घेऊन मी माझ्या गावी गेलो. (फेब्रुवारी २०१६ मध्ये)‘‘कॉलेजचा १५ मार्कांचा प्रोजेक्ट असल्याचं आणि त्यासाठी आपल्या गावचं शूटिंग करून न्यायचं आहे’’ अशी थाप मी घरी हाणली. कारण फिल्मशूट करायला आलोय असं सांगितलं, असतं तर डोंब उठला असता...सगळं झालं होतं; पण कॅमेरा हवा तसा मिळत नव्हता... मी घाईवर आलो होतो. सगळं गुंडाळून पुण्याला माघारी जावं लागू नये एवढंच वाटत होतं...शेवटी मोबाइलवरच चित्रित करायचा निर्णय घेतला...मोटेवाडीच्या ज्या माळरानातून टिटव्या, पखुर्ड्या, होल्यांची कोटी (घरटी) शोधत लहानपणी फिरायचो, तिथलं चित्रीकरण केलं. शीतल मोटे, दीपक वायदंडे, महादेव खरात या गावातीलच त्या बालकलाकारांनी कामं केली.संकलन झाल्यानंतर पुढचा फिल्म पोहचविण्याचा टप्पा ही तितकाच अवघड होता.टीव्हीवर ज्या लोकांना ऐकायचो, पाहायचो किंवा ज्याचं काम पाहत फिल्म शिकलो, त्यांनीच दिलेल्या प्रतिक्रिया खूप उत्साह वाढवणाºया होत्या. माझ्या नावासकट देशा-परदेशातील महोत्सवात झळकली हाच मोठा दिसाड दिस कडून मिळालेला अवॉर्ड होता.अर्थातच काटेरी वाटेवरचा संघर्ष संपला अशातला भाग नाही. अजून लय लांबचा पल्ला गाठायचाय. परंतु समकालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती मला सतत अस्वस्थ करत असते.रोजगार शून्य विकासाचे इमले उभे राहताहेत. तरुण धड शेतीही करत नाही नोकरीतही तगत नाही. सामान्य माणसे किड्या-मुंगीसारखी कुचलेली जात आहे...दिसाड दिस मधला अब्बास स्थलांतर करतो, हे त्याचेच प्रतीक आहे...अजून काय सांगू, दिसाड दिस जाताहेत, इतकंच..