शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
3
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
6
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
7
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
8
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
9
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
10
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
11
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
12
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
13
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
14
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
15
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
16
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
17
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
18
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
19
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
20
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण

..सुखाचं माप

By admin | Updated: October 27, 2016 16:10 IST

आशीर्वाद मोजू म्हणता, पण कसे मोजू? त्याचं माप काय? चिमूटभर, ओंजळभर, मनभर काय मापानं मोजले तर आशीर्वादाचं भरभरून मिळणारं दान ओसंडून वाहतंय हे आपलं आपल्यालाच कळेल!!

आशीर्वाद मोजू म्हणता, पण कसे मोजू? त्याचं माप काय? चिमूटभर, ओंजळभर, मनभरकाय मापानं मोजले तर आशीर्वादाचं भरभरून मिळणारं  दान ओसंडून वाहतंय हे आपलं आपल्यालाच कळेल!!कळेल, कळतं!त्यासाठी खरंतर कुठलं तागडं नकोय.आपलं मनच पुरेसं आहे, आपलं सुख तोलायला!रोज केल्या ना काही गोष्टी, तर सुखाची गिनती सोपी होते,आणि दु:खाची टोचणी तर उरतही नाही काळजात..त्यासाठीचा हा एक छोटुकला फॉर्म्युला* सकाळी जाग येताच क्षणभर डोळे मिटा..आणि आपल्याकडे चांगलं चांगलं काय काय आहे, ते आठवा..आठवत नाही फार काही तर निदान रात्रभर आपल्याला अंग टाकायला निवारा होता, याचे तर आभार माना..पहा, एकेक करत किती सुखं दिसतील समोर उभी..* कुणीतरी असेलच ना जिवाभावाचं, आदल्या दिवशी तुमच्यासाठी मायेनं काही करणारं, तुम्हाला आवडणारं, त्याला एक फोन करा.. सहज.. एक मेसेज.. सहज..मनातली माया त्या व्यक्तीपर्यंत पोहचली की इकडे दुप्पट होते ती..* देवाला मनापासून हात जोडा. म्हणा की, हे जे आयुष्य दिलंय ते सुंदर करण्याचा पूर्ण प्रयत्न करीन मी! आणि देवच मानत नसाल तरी मनातल्या मनात असालच ना कशाविषयी तरी कृतज्ञ..* वाईट नेहमीच आठवता, पण चांगलं काही आठवायची, पुन्हा पुन्हा आठवायची सवय लावावी लागते मनाला..* जे जे चांगलं, सुंदर, आवडतं ते ते मनाशी घट्ट धरा.. आणि मग लागा कामाला, त्या दिवसात सारं चांगलं घडेल.. सुंदरही!!