शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

अडचण असेल तर मोफत घ्या ! - औरंगाबादच्या भाजी विक्रेत्या तरुणाची दिलदार गोष्ट  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 18:13 IST

भाजीच्या ठेल्यावरचा हा बोर्ड आणि भाजी विक्रेत्या तरुणाचा हा फोटो खूप व्हायरल झाला. ‘ऑक्सिजन’ने त्या तरुणाला शोधलं. तो राहुल. त्याचा मित्र मनीष आवटेने ती पोस्ट लिहिली होती, तो म्हणाला, सोशल मीडियात काय चाललंय मला माहितीपण नाही!’ त्याला म्हटलं तू लिहून दे, तुला का वाटलं, हा बोर्ड लावून भाजी विकावं? तर त्यानं मनोगत लिहून पाठवलं, ते त्याच्याच शब्दात.

ठळक मुद्देछोटय़ा मदतीनं कुणाच्या घरी चूल पेटली, तर मी काय एवढं मोठं केलं?

राहुल लबडे  

घरची परिस्थिती अशी की मला खूप लवकर जॉब करावा लागला. त्यात घरात मी मोठा. जॉब करून शिक्षण सुरूहोतं. बाबा खूप वर्षापासून भाजीपाला विकण्याचा धंदा करतात. मी शिकलो, जॉबला पण लागलो. पण आता कोरोना संकटात माझा जॉबही गेला. घरी मी, माझा एक भाऊ , दोन बहिणी आणि आई-बाबा. एवढय़ा कुटुंबाचा उदरनिर्वाह बाबा एकटे भाजीपाला विकून करत होते. मीही ठरवलं त्यांना मदत करायची. मी ही त्यांच्यासोबत भाजीपाला विकू लागलो. भाजीची गाडी लावली.मनात तर फार होतं वेगळं काहीतरी करु. तशी जिद्द होती. पण तशी परिस्थिती कधी निर्माणच झाली नाही. मलापण माहितीये की परिस्थिती मनासारखी निर्माण होत नाही ती निर्माण करावी लागते. मात्र सध्या परिस्थितीत मी भाजीची गाडी लावून काम करत होतं.लॉकडाउनमध्ये एक दिवस, एक आजी चौकात काहीतरी ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत होती.पण त्यांचं कोणीच ऐकत नव्हतं. मी जवळ जाऊन आजीला त्यांची अडचण विचारली. ती आजी भराभरा सांगायला लागली, ‘मला नंदनवन कॉलनीमधे जायचं आहे.  तिथे मी एका घरी काम केलं आहे. त्या कामाचे माझे  50 रूपये त्यांच्याकडे आहे. मला ते आणायला जायचं आहे.  गाडी नाही, मला कोण तिथं सोडणार, मला चालवत पण नाही.  पन्नास रुपयात माझा भाजीपाला तरी येईल. घरात काहीच नाही. सामान पण आणायचे आहे. आता  फक्त 51 रूपये आहेत.’ आजीच्या भुकेल्या पोटासाठी ते कुठं अडकलेले 50 रुपये पन्नास हजारासारखे होते. मी मनात विचार केला. फक्त 50 रुपयात आजी हे सगळं कसं करणार ?  मी आजीला म्हटलं तुला हवा तो भाजीपाला घे. आजी खूप खूष झाल्या. खरं सांगतो, त्यांच्या चेहऱ्यावरचं ते सुख पाहून मला जितकं सुख वाटलं,तेवढं कधी वाटलं नव्हतं.  त्यान आजीनं मला पाच रूपये दिले. डोक्यावर हात ठेवलं नी  म्हणाल्या ,  ‘मला पाच रुपयात हे सगळं कुणीच दिलं नसतं. मी कधीतरी राहिलेले पैसे तुला नक्की आणून देईल!’ माझ्या  डोक्यावर हात ठेवून आजी निघून गेल्या.असे खूप मोलमजुरी करणारे कुटुंब आहेत, जे रोज कमावतात आणि रोज खातात. मी ही त्याच गरीब गरजू समाजातला आहे. मला वाटलं, आपल्याला जे जमेल तेवढं आपण केलं तर?मी  ठरवलं अडचणीत असणाऱ्याना मोफत भाजी द्यायची.  एक उपाशी पोटच दुसऱ्याची भूक समजू शकतं.मी म्हणून गाडीवर पाटी लावली की अडचणीत असाल तर  मोफ त घ्या, भाजी.ज्यांच्याकडे पैसे होते त्यातल्या काहींनी तर मला भाजीचे कधी जास्त पैसेही दिले, ती पाटी पाहून.ज्यांच्याकडे नव्हते, त्यांनी थोडीच भाजी मोफत घेतली, पोटापुरती.मला नाही वाटत की, मी हे गरजूंना  ‘दान’ म्हणून काही दिलं, हा त्यांच्या कष्टाचा  ‘वाटा’ आहे, या भावनेनं वाटलं म्हणून घ्या म्हणालो, एवढंच. देश मजुरांच्या पायावर उभा आहे. हा पाया उपाशी राहिला तर देश कमजोर नाही का होणार?मग या छोटय़ा मदतीनं कुणाच्या घरी चूल पेटली, तर मी काय एवढं मोठं केलं?