शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
9
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
10
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
11
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
12
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
13
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
14
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
15
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
16
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
17
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
18
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
19
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
20
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
Daily Top 2Weekly Top 5

cognitive flexibility- ‘हे’ कौशल्य तुमच्या रिझ्युमेवर नोंदवून ठेवा, मग पहा जादू! तेवढे जास्त टिकू.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 07:15 IST

कॉग्निटिव्ह फ्लेक्झिबिलिटी म्हणजे वैचारिक लवचीकपणा. माझंच खरं असं म्हणण्याचा काळ गेला; उलट जितक्या नव्या गोष्टी शिकू, तेवढे जास्त टिकू.

ठळक मुद्देजॉब टिकवणं आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे यशस्वी करिअर करणं हे एक आव्हान असू शकतं. ते आव्हान स्वीकारायचं तर आपल्याकडे काही खास कौशल्यं हवीत? तेच  सांगणारा  ऑक्सिजनचा  विशेष  अंक 

अतुल कहाते,  डॉ. यश वेलणकर

उद्याच्या जगात एकसुरी पद्धतीनं विचार करणं किंवा फक्त आखून दिलेल्या मार्गावरून चालत राहाणं परवडण्यासारखं नसेल. एकाच वेळी निरनिराळ्या पर्यायांचा विचार करणं, त्यांची तुलना करणं, त्यामधला योग्य पर्याय निवडणं आणि त्यानुसार पुढे जाणं यासारख्या गोष्टी खूप गरजेच्या असतील. परिस्थिती सतत बदलणारी असू शकेल. समज, विचार, तंत्नज्ञान हे सगळं विलक्षण वेगानं बदलत गेल्यामुळे त्यानुसार आपल्यात बदल करणं प्रत्येकाला गरजेचं ठरणार आहे.अशा प्रकारे आपला विचार लवचीक असावा यासाठी काय करता येईल? पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण कुणाबरोबरही संवाद साधतो किंवा आपल्याला माहीत असलेल्या गोष्टींविषयी बोलतो तेव्हा आपल्या मनात कोणते विचार येतात किंवा येत नाहीत, याकडे आपण बारीक लक्ष दिलं पाहिजे. काही संशोधक याखेरीज आपण आपल्या मेंदूमधल्या स्मृतीचे निरनिराळे कप्पे करावेत असं सुचवतात. म्हणजे आपण काहीही वाचत किंवा समजून घेत असताना ते कशाशी संबंधित आहे हे ठरवून एका वेगळ्या कप्प्यात साठवत असल्याची कल्पना करावी असं ते म्हणतात. अनेक गोष्टी आपण प्रत्यक्ष करून बघितल्या किंवा खोलात जाऊन समजून घेतल्या तरच आपल्याला त्यांचं खरं आकलन होतं. यामुळे नुसतं वरवर काहीतरी समजून घेण्याचे प्रसंग शक्य तितके टाळावेत. सातत्यानं नवनवी कौशल्यं शिकण्यामुळे आपली विचारक्षमता लवचीक आणि समृद्ध होते असं आढळून आलं आहे. उदाहरणार्थ नव्या भाषा शिकणं, कोडी सोडवणं, ज्या गोष्टी आपण उजव्या हातानं करतो त्या डाव्या हातानं करणं असे पर्याय तज्ज्ञ मंडळी शिकवतात. याखेरीज शारीरिक कष्ट घेणं, व्यायाम करणं, नेहमी करत असलेल्या गोष्टी सोडून वेगळं काहीतरी करणं असेही पर्याय यासाठी सुचवले जातात. यामुळे आपल्या मेंदूंमधल्या न्यूरॉन्सनाही सतत खुराक मिळत जातो आणि ते कार्यरत राहातात. आपण एकूणच आपल्या मेंदूच्या क्षमतेच्या अगदी किरकोळ प्रमाणाचा वापर करतो असं म्हटलं जातं. त्यातच आपण एकसुरी आयुष्य जगत राहिलो तर ते प्रमाण अजूनच कमी होतं.या सगळ्याचा मुख्य फायदा म्हणजे अनपेक्षित प्रसंगांना तोंड देण्याची तयारी केलेली असल्यामुळे आपला मेंदू आता या मोक्याच्या क्षणी निरनिराळे पर्याय तपासून बघू शकतो. एकाच वेळी तो अनेक गोष्टींचा विचार करून न थकता त्यामधले बारकावे तपासू शकतो. आपली निर्णयक्षमता त्यामुळे खूप समृद्ध होत जाते. या उलट एकसुरी विचार करणार्‍या लोकांना अपरिचित किंवा अप्रिय प्रसंगांचा सामना करायला लागल्यावर मानसिक ताण-तणाव आणि चिंता अशा गोष्टींचा सामना करावा लागतो. हे लोक एकाच विचाराच्या चक्र ामध्ये अडकतात आणि  ते त्यातच फिरत राहातात. अशा प्रकारच्या चक्र व्यूहामध्ये अडकू नये यासाठी प्रयत्न करणार्‍या लोकांची म्हणूनच सरशी होते.

त्यासाठीची मानसिक कौशल्यं  कशी कमवायची?1. केवळ ठोकळेबाज विचार न करता अनेक शक्यता असू शकतात याची जाणीव म्हणजे विचारांची लवचीकता होय.2. रोजच्या आयुष्यातदेखील आपले अनेक समज असतात, मात्न ते समज नेहमी सत्य असतीलच असे नाही. ते गृहीत धरून चालणार नाही. एखाद्या घटनेच्या पाठीमागे अनेक शक्यता असू शकतात याचे भान आपला दुराग्रह आणि असहिष्णुता कमी करतो.3. हे कौशल्य विचारांची सजगता याचा सराव केल्याने वाढते. ‘आत्ता माझ्या मनात हा विचार आहे’ असे त्या विचारापासून अलग होऊन आपण पाहू शकतो. आपण विचारांच्या प्रवाहात वाहत जात असू तर हे शक्य होत नाही. मनातील विचार हेच सत्य आहे असे वाटू लागते. मात्न कोणताही विचार हे सत्य असत नाही.4. माझ्या मनात आलेला विचार म्हणजे सत्य नाही याचे भान विचारांच्या सजगतेने वाढते. हे भान म्हणजेच विचारांची लवचीकता. ती नसेल तर रिजेक्शन, राग, उदासी अशा त्नासदायक भावना अकारण मनात घर करून बसतात.5. आत्ता या क्षणी माझ्या मनात आलेला विचार ही एक शक्यता आहे हे लक्षात घेऊन आणखी कोणकोणत्या शक्यता असू शकतात, असा विचार केला की विचारांची लवचीकता वाढते.

टॅग्स :Career Guidanceकरिअर मार्गदर्शन