शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पोट तरी कशावर भरणार तुम्ही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 15:19 IST

लाखोंनी इंजिनिअर कॉलेजांच्या फॅक्टरीतून टिकल्या छापल्यासारखे बाहेर पडत असताना शिक्षणाला काय किंमत उरणार आहे?

ठळक मुद्देजग उलटेपालटे झाले तरी शाश्वत राहणारी एकच वस्तू आपल्या हातात आहे. ती ओळखा आणि राखा!

- मिलिंद थत्ते

नैसर्गिक साधनसंपत्ती हा सर्वाच्याच जगण्याचा आधार आहे. निसर्गातल्या वेगवेगळ्या वस्तूंवर आधारित पोटापाण्याचे उद्योग लोक करत असतात. पण तो आधार काढूनच घेतला तर? म्हणजे मासेच संपले किंवा मासे पकडण्यावर बंदीच घातली तर मच्छीमारांनी जगायचे कसे? किंवा जमीन नापीक झाली वा त्यावर नांगर धरायची परवानगीच काढून घेतली तर शेतकर्‍यांनी जगायचे कसे?निसर्गाच्या वापराचे कोणते हक्क कोणाकडे आणि कशासाठी आहेत यावर ती माणसं टिकणार का आणि निसर्ग टिकणार का हे अवलंबून असते. समजा एखाद्या जंगलातून इमारती लाकूड काढण्याचे हक्क एखाद्या कंपनीला 10 वर्षांसाठी दिले तर काय होईल? त्या कंपनीला त्याच 10 वर्षात जास्तीत जास्त नफा कमवायचा आहे. ती कंपनी अधिकाधिक लाकूड तोडेल, त्या लाकडाच्या आड येणार्‍या इतर झाडाझुडपांना ‘अडथळा’ मानून नष्ट करेल, 10 वर्षात आणखी लाकूड देतील अशा झाडांची लागवड ‘अडथळा’ साफ केलेल्या जागेवर करेल. अडथळा म्हणून नष्ट केलेल्या झुडपांत काही औषधी वनस्पती असतील. त्या वनौषधींपासून औषध बनवणारा एखादा स्थानिक वैद्य/वैदू असेल. कंपनीने तो ‘अडथळा’ नष्ट केल्यावर या वैदूच्या पोटापाण्याचे काय होईल?जेव्हा जेव्हा नवे तंत्रज्ञान येते, नवे उद्योग येतात, तेव्हा संसाधनांवरचे अधिकार इकडून तिकडे हेलकावे खातात. जेव्हा जेव्हा माणूस निसर्गावर घाला घालतो, तेव्हा तेव्हा तो काही माणसांवरही घाव घालत असतो. अशा स्थितीत ‘बळी तो कान पिळी’ हा कायदा चालतो. मरेनात का दुबळे लोक - असा याचा अर्थ होतो. तसं होणं योग्य नसेल तर आपण भारतीय समाज म्हणून काही काळजी घेणं भाग आहे. आपल्या संविधानात यालाच ‘समान संधीचा अधिकार’ म्हटलं आहे. काळ बदलतो, तंत्रज्ञान बदलतं - तेव्हा मागे राहणार्‍यांना किमान उभं तरी राहता यावं याची काळजी आपण भारतीय म्हणून करतो का?शेकडो वर्षापूर्वी आपल्यापैकी काही लोक शेतीकडे वळले. त्यांना एका जमिनीला धरून राहण्याचं महत्त्व कळलं. नदीकाठच्या सुपीक गाळाच्या जमिनी त्यांनी ताब्यात घेतल्या. आजही आपण असं पाहतो की, तेव्हा जे शेतीकडे वळले नाहीत, शिकार करत राहिले किंवा फळे-कंद गोळा करून पोट भरत राहिले - त्यांना आताही मागास म्हटलं जातं. त्यांच्या हातात सत्ता नाही. वरकस, छोटय़ा तुकडय़ातल्या जमिनी आहेत. किंवा भूमिहीन आहेत. शेकडो वर्षापूर्वी शेतीचं युग सुरू झाले, तेव्हा मागे राहिलेले आपले भाऊबंद आताही मागे आहेत. पुढचे युग यंत्रोद्योगांचे आले. जे यंत्रविद्या व कौशल्य शिकले, त्यांनी यंत्रयुगात विकास साधून घेतला. काही महापुरुषांनी तेव्हाच ‘शहरांकडे चला’ हा मंत्र दिला. पुढचे युग शहरांच्या स्फोटाचे आहे. अतिलोकसंख्येकडे कोलमडणार्‍या शहरांचे आहे.शहरांचे विकेंद्रीकरण हा पुढचा मंत्र सुरू झाला आहे. यंत्र चालवण्यासाठी माणसांची गरज उरलेली नाही. अनेक अवघड कामे करणारे यंत्रमानव तयार होत आहेत. ते संप करत नाहीत, पगारवाढ मागत नाहीत, जातीय गुंडगिरी करत नाहीत. अशा काळात पुन्हा युग बदलत असताना माणसांना नेमके काय काम उरणार आहे? रसायनयुक्त अन्नाने जग त्रासत चालले आहे. नवीन आजार येताहेत, आणि वैद्यक माफियांची चांदी होत आहे. पुन्हा शाश्वत जीवनशैलीकडे, रसायनमुक्त अन्नाकडे जाण्यासाठी पैशाने  पुढारलेले लोक मागे वळू लागले आहेत. शुद्ध अन्न महाग होण्याचा पुढचा काळ आहे.आपण गावातले सामान्य तरुण या उलथापालथीत कशाला धरून राहू शकतो? लाखोंनी इंजिनिअर वगैरे कालेजांच्या फॅक्टरीतून टिकल्या छापल्यासारखे बाहेर पडत असताना शिक्षणाला काय किंमत उरणार आहे? जग उलटेपालटे झाले तरी शाश्वत राहणारी एकच वस्तू आपल्या हातात आहे. ती ओळखा आणि राखा!