शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

पोट तरी कशावर भरणार तुम्ही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 15:19 IST

लाखोंनी इंजिनिअर कॉलेजांच्या फॅक्टरीतून टिकल्या छापल्यासारखे बाहेर पडत असताना शिक्षणाला काय किंमत उरणार आहे?

ठळक मुद्देजग उलटेपालटे झाले तरी शाश्वत राहणारी एकच वस्तू आपल्या हातात आहे. ती ओळखा आणि राखा!

- मिलिंद थत्ते

नैसर्गिक साधनसंपत्ती हा सर्वाच्याच जगण्याचा आधार आहे. निसर्गातल्या वेगवेगळ्या वस्तूंवर आधारित पोटापाण्याचे उद्योग लोक करत असतात. पण तो आधार काढूनच घेतला तर? म्हणजे मासेच संपले किंवा मासे पकडण्यावर बंदीच घातली तर मच्छीमारांनी जगायचे कसे? किंवा जमीन नापीक झाली वा त्यावर नांगर धरायची परवानगीच काढून घेतली तर शेतकर्‍यांनी जगायचे कसे?निसर्गाच्या वापराचे कोणते हक्क कोणाकडे आणि कशासाठी आहेत यावर ती माणसं टिकणार का आणि निसर्ग टिकणार का हे अवलंबून असते. समजा एखाद्या जंगलातून इमारती लाकूड काढण्याचे हक्क एखाद्या कंपनीला 10 वर्षांसाठी दिले तर काय होईल? त्या कंपनीला त्याच 10 वर्षात जास्तीत जास्त नफा कमवायचा आहे. ती कंपनी अधिकाधिक लाकूड तोडेल, त्या लाकडाच्या आड येणार्‍या इतर झाडाझुडपांना ‘अडथळा’ मानून नष्ट करेल, 10 वर्षात आणखी लाकूड देतील अशा झाडांची लागवड ‘अडथळा’ साफ केलेल्या जागेवर करेल. अडथळा म्हणून नष्ट केलेल्या झुडपांत काही औषधी वनस्पती असतील. त्या वनौषधींपासून औषध बनवणारा एखादा स्थानिक वैद्य/वैदू असेल. कंपनीने तो ‘अडथळा’ नष्ट केल्यावर या वैदूच्या पोटापाण्याचे काय होईल?जेव्हा जेव्हा नवे तंत्रज्ञान येते, नवे उद्योग येतात, तेव्हा संसाधनांवरचे अधिकार इकडून तिकडे हेलकावे खातात. जेव्हा जेव्हा माणूस निसर्गावर घाला घालतो, तेव्हा तेव्हा तो काही माणसांवरही घाव घालत असतो. अशा स्थितीत ‘बळी तो कान पिळी’ हा कायदा चालतो. मरेनात का दुबळे लोक - असा याचा अर्थ होतो. तसं होणं योग्य नसेल तर आपण भारतीय समाज म्हणून काही काळजी घेणं भाग आहे. आपल्या संविधानात यालाच ‘समान संधीचा अधिकार’ म्हटलं आहे. काळ बदलतो, तंत्रज्ञान बदलतं - तेव्हा मागे राहणार्‍यांना किमान उभं तरी राहता यावं याची काळजी आपण भारतीय म्हणून करतो का?शेकडो वर्षापूर्वी आपल्यापैकी काही लोक शेतीकडे वळले. त्यांना एका जमिनीला धरून राहण्याचं महत्त्व कळलं. नदीकाठच्या सुपीक गाळाच्या जमिनी त्यांनी ताब्यात घेतल्या. आजही आपण असं पाहतो की, तेव्हा जे शेतीकडे वळले नाहीत, शिकार करत राहिले किंवा फळे-कंद गोळा करून पोट भरत राहिले - त्यांना आताही मागास म्हटलं जातं. त्यांच्या हातात सत्ता नाही. वरकस, छोटय़ा तुकडय़ातल्या जमिनी आहेत. किंवा भूमिहीन आहेत. शेकडो वर्षापूर्वी शेतीचं युग सुरू झाले, तेव्हा मागे राहिलेले आपले भाऊबंद आताही मागे आहेत. पुढचे युग यंत्रोद्योगांचे आले. जे यंत्रविद्या व कौशल्य शिकले, त्यांनी यंत्रयुगात विकास साधून घेतला. काही महापुरुषांनी तेव्हाच ‘शहरांकडे चला’ हा मंत्र दिला. पुढचे युग शहरांच्या स्फोटाचे आहे. अतिलोकसंख्येकडे कोलमडणार्‍या शहरांचे आहे.शहरांचे विकेंद्रीकरण हा पुढचा मंत्र सुरू झाला आहे. यंत्र चालवण्यासाठी माणसांची गरज उरलेली नाही. अनेक अवघड कामे करणारे यंत्रमानव तयार होत आहेत. ते संप करत नाहीत, पगारवाढ मागत नाहीत, जातीय गुंडगिरी करत नाहीत. अशा काळात पुन्हा युग बदलत असताना माणसांना नेमके काय काम उरणार आहे? रसायनयुक्त अन्नाने जग त्रासत चालले आहे. नवीन आजार येताहेत, आणि वैद्यक माफियांची चांदी होत आहे. पुन्हा शाश्वत जीवनशैलीकडे, रसायनमुक्त अन्नाकडे जाण्यासाठी पैशाने  पुढारलेले लोक मागे वळू लागले आहेत. शुद्ध अन्न महाग होण्याचा पुढचा काळ आहे.आपण गावातले सामान्य तरुण या उलथापालथीत कशाला धरून राहू शकतो? लाखोंनी इंजिनिअर वगैरे कालेजांच्या फॅक्टरीतून टिकल्या छापल्यासारखे बाहेर पडत असताना शिक्षणाला काय किंमत उरणार आहे? जग उलटेपालटे झाले तरी शाश्वत राहणारी एकच वस्तू आपल्या हातात आहे. ती ओळखा आणि राखा!