शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

पैसे मोजून जॉब विकत घेताय?

By admin | Updated: April 2, 2015 18:22 IST

सध्या देशभर गाजत असलेला रेल्वे नोकरी घोटाळा! धाडसत्र, अटकसत्र, आरोपसत्र सगळं सरसकट सुरू आहेत; या घोटाळ्यात महाराष्ट्रातले ४0 तरुणही हातोहात फसवले गेले.

 सध्या देशभर गाजत असलेला रेल्वे नोकरी घोटाळा!

धाडसत्र, अटकसत्र, आरोपसत्र सगळं सरसकट सुरू आहेत; या घोटाळ्यात महाराष्ट्रातले ४0 तरुणही हातोहात फसवले गेले.
आणि तेही बेमालूम.
फसवणूक करणार्‍या टोळीने तरुणांना रेल्वे भरतीचं आमिष दाखवलं, नुस्ते ऑफर लेटरच नाही तर काहींना तर अपॉइण्टमेण्ट लेटर्सही मिळाले आणि काहींनी तर म्हणे बिहारमधल्या लहानसहान स्टेशनवर प्रशिक्षणही पूर्ण केलं.
आणि मग कळलं की, काही लाख रुपये या मुलांकडून उकळून एक बडं रॅकेट परागंद झालं.
- अर्थात ही झाली ताजी बातमी.
पण या अशा बातम्या, असे घोटाळे आपल्या देशात नवीन नाही, बेरोजगार तरुणांची फसवणूक, त्यांना लागणारं लाखो रुपयांचं चंदन हे सारंही काही नवीन नाही!
अशा बातम्या सतत प्रसिद्ध होतात आणि अकुशल, अर्धकुशल, कमी शिकलेल्या तरुणांसह अनेक उच्चशिक्षितही त्यात अडकतात!
मुळात कुणी आपल्याकडे नोकरी लावून देण्यासाठी पैसे मागतं असेल तर अशा ठिकाणी आपणच ‘लाच’ देऊन नोकरी मिळवावी का, हा खरं तर कॉमनसेन्सचा प्रश्न आहे.
पण आपल्या देशात नोकरीची आशा अनेकांच्या कॉमनसेन्सलाही डोकं वर काढू देत नाही.
तरुण मुलं वडीलधार्‍यांशी भांडून लाखो रुपये भरतात आणि फसतात.
काहीजण देशात फसतात, काहीजण विदेशात जायचं हे स्वप्न विकत घेऊन फसतात.
गर्तेत अडकतात, काहींना फक्त विदेशात नोकरी या दोन शब्दांचंच इतकं आकर्षण की, त्यापायी ते काहीही करायला तयार होतात.
हे असं सारं तुमचं किंवा तुमच्या मित्रांचं होत असेल तर तुम्ही जरा तरी सावध व्हावं, पुढच्यास ठेच, मागचा शहाणा न्यायानं का होईना खबरदारी बाळगावी म्हणून या अंकात ही विशेष चर्चा.
नोकरीच्या घोटाळ्यांपासून स्वत:ला वाचवण्याची,
भामट्यांनी आपल्याला मूर्खात काढून नये म्हणून कानाला खडा लावत, काही गोष्टी समजून घ्यायलाच हव्यात!