शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

भर पावसात बाइकवर बुंगाट

By admin | Updated: June 16, 2016 12:28 IST

पावसात बाइकवर बुंगाट फिरायचं प्लॅनिंग तुम्ही करत असाल, पण तुमची बाइक त्यासाठी तयार आहे का?

 - जयेश भंडारी (द हायकर क्लब)

 

 

हे सारं कितीही रोमॅण्टिक वाटत असलं, तरी पावसाळ्यात आपल्या गाडीची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे. पावसाळ्याअगोदर जसे आपण आपले ठेवणीतले छत्र्या, रेनकोट वगैरे व्यवस्थित आहे की नाही ते तपासून घेतो व त्यांची दुरुस्ती करतो, तसंच गाडीचीही काळजी घेणं गरजेचं आहे.कारण पाऊस कितीही रोमॅण्टिक वाटत असला तरी पावसात बाइक चालवणं हे तसं धोक्याचं असतंच. पावसाच्या माऱ्यात समोरचं कमी दिसतं, रस्त्यात खड्डे, त्यात साचलेलं पाणी, गाडी स्लिप होण्याची शक्यता या साऱ्यानं वाढतेच.त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी (खरंतर गाडी वापरताना नेहमीच) तिची नियमित सर्व्हिसिंग करून घेणं गरजेचं आहे. बहुतकेदा गाडीची काळजी घेताना गाडीच्या चाकांकडे आपलं दुर्लक्ष होतं. वापर होऊन होऊन झिजल्यामुळे टायर्स गुळगुळीत होतात. असे टायर्स पावसाळ्यात ओल्या रस्त्यावर घसरून अ‍ॅक्सिडेंट व्हायची शक्यता असते. त्यामुळे टायर्स जास्त झिजले असल्यास पावसाळा सुरू होण्यापूर्वी बदलून घेणे आवश्यक ठरते.दुसरी एक सहसा दुर्लक्षित होणारी गोष्ट म्हणजे स्पार्क-प्लग कॅप. बरेचदा ही कॅप सैल असल्यामुळे पावसाचे पाणी जाऊन प्लग शॉट होण्याच्या घटना घडतात. म्हणून पावसाळ्यापूर्वी ही कॅप चेक करून घ्यावी.अशाच प्रकारे इतरही काळजी घेत आणि पावसाळ्याच्या स्वागताला आपली गाडी सज्ज ठेवू शकतो.१) इंजिन आॅइल लेव्हलतुमच्या गाडीला चेनगार्ड असलं तरीही पावसाळ्यात, गाळ-चिखलात चेन लवकर खराब होतेच. त्यातून तुमच्या अ‍ॅव्हरेजवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे चांगलं चेन क्लीनर आणाच. पण त्याआधी इंजिन आॅइल लेव्हल तपासून घ्या. चांगल्या कंपनीचं आॅइल वापरा. त्यामुळे गाडीची तब्येत धडधाकट राहील.२) ओपन वायरिंगगाडीच्या काही वायरी लोंबत असतील, बाहेर असतील तर त्याभोवती इलेक्ट्रिक टेप गुंडाळा. पावसाळ्यात या वायरींना पाणी लागतंच. त्यातून शॉर्टसर्किट होऊ शकतं. त्यामुळे या उघड्यावाघड्या वायरींचं काम आधी करा.३) व्हील अलाइनमेण्टज्यांच्या जिवावर तुम्ही बुंगाट निघता ते हे टायर्स. त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यायला हवं. २५ ते ३० हजार किलोमीटर गाडी फिरली असेल किंवा गाडी घेऊन पाच वर्षे होत आली असतील तर तुम्ही नवीन टायर्स घ्या. जर घासून घासून टायर गुळगुळीत झालेले असतील तर ग्रीप कमी होते, गाडी स्लिप होऊ शकते. त्यामुळे हे व्हील अलाइनमेण्टही एकदा करून घ्या. ४) ब्रेकगाडीचे ब्रेक तर उत्तम हवेतच. ब्रेक पॅड, लायनर्स तपासून आवश्यक असल्यास बदलून घ्या. काही होत नाही म्हणत ब्रेक नसलेली गाडी अजिबात चालवू नका.५) बॅटरी चार्जिंगबॅटरी चार्ज आहे की नाही हे पाहणं महत्त्वाचं. अनेकांच्या गाड्या पावसाळ्यात त्रास देतात. स्टार्ट होत नाही. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी बॅटरी चार्जिंग करून घेणं महत्त्वाचं.१) गाडीचे आरसे चांगले आहेत की नाही ते तपासा. तेच हेल्मेटचंही. त्याच्या काचेतून चांगलं दिसेल ना पावसात हे एकदा तपासून घ्या.२) मडगार्ड, एअर फिल्टर, प्लग इथं चिखल बसला असेल तर तो रोजच्या रोज काढा.