शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

एसटीची डबलबेल मारा आणि चला नव्या प्रवासाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 07:15 IST

मेंदूला खुराक देणार्‍या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या वाटेवर.

ठळक मुद्देआपला मेंदू कायम नवीन काहीतरी शोधत इव्हॉल्व्ह होत असतो. त्याला झकास तजेला मिळेल .

प्राची  पाठक 

शाळेत असेर्पयत चित्र जरा वेगळं असतं. शाळा जवळ असेल तर आपण हौशीनं सायकलनं शाळेत जातो. शाळा घरापासून थोडी लांब, दहा, पंधरा, वीस किलोमीटरवरच्या अंतरवर असेल, तर रोजची व्हॅन, रिक्षा वगैरे लावलेली असते. शाळा संपून कॉलेजात प्रवेश घेतला की मग मात्र आपल्याला नव्या बाइकचे वेध लागतात. सायकल, रिक्षा या गोष्टी कमीपणाच्या वाटायला लागतात. काहीही झालं तरी, कॉलेज अगदी पायी जाण्याच्या, दहा-पंधरा मिनिटांच्या अंतरावर, आई-वडिलांची ऐपत नसली तरी ‘मला बाइकच पाहिजे’ असा हट्ट सुरू होतो. पालक बर्‍याचदा मुलांचा हा हट्ट पुरवतातही; पण तो जर पालकांना पुरवता आला नाही, तर आपले रुसवे-फुगवे सुरू होतात. त्याचा राग शिक्षणावर काढायला सुरुवात होते. ‘मला आता शिकायचंच नाही, गाडी असेल तरच मी कॉलेजला जाणार’ असं सांगून बर्‍याचदा पालकांना ब्लॅकमेलही केलं जातं; पण वेगळ्या पर्यायांचा विचार केला जात नाही. त्यातही एक वेगळा आनंद, शिक्षण आणि अविस्मरणीय अनुभव मिळू शकतो, हे लक्षातच घेतलं जात नाही.  

* काय करता येईल?दर आठवडय़ात किमान एकदा तरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने आपल्याला प्रवास करता येईल. करून तर पाहा. सुरुवातीला जरा बोअरिंग वाटेल, त्रास होईल. दगदग वाटेल, चिडचिड होईल; पण त्याचीही सवय होईल. त्यातली मजा तर कळेलच, पण माणसंही कळायला लागतील.जे अगदी घरापासून गाडी घेऊन रोज बाहेर पडतात, त्यांना आपण सांगू शकतो की दर आठवडय़ात एकदा तरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करून बघा. आपली गाडी आपल्यासाठी उपलब्ध नाहीये, असं समजून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने, बसने, शेअर रिक्षाने, लोकलने कॉलेजला, जॉबवर जाऊन बघा. म्हणजे मुद्दा काय की आपल्या कम्फर्ट झोनमधून जरा बाहेर येऊन पाहा.  

* त्याने काय होईल?1- नेहमीपेक्षा वेगळे ऑप्शन्स काय आहेत, असतात, ते कळेल. 2- आपल्याही नकळत पर्यावरणाचा विचार होईल. 3- आपल्या रोजच्या जाण्यायेण्याच्या रस्त्यावर ‘अरेच्चा, इथे हेही आहे की’ असा साक्षात्कार होईल ! 4- रूटीनला जरा ब्रेक मिळेल. नव्या वाटा कळतील. 5- आपला मेंदू कायम नवीन काहीतरी शोधत इव्हॉल्व्ह होत असतो. त्याला झकास तजेला मिळेल .