शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

दिवाळी नंतर बोअर होतंय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 16:42 IST

दिवाळी धडाक्यात साजरी होते. रुटिनही सुरू होतं. पण मग कंटाळा, थकवा, आळस डोकं वर काढतात. इतकी सुट्टी मिळून, इतकं सेलिब्रेशन होऊनसुद्धा ‘बोअर’ होणं’ थांबत नाही. का?

ठळक मुद्दे नव्यानं वेगळं काय मजेदार घडणार आयुष्यात आणि सततच कसं घडत राहणार?

- प्राची पाठक

‘दिवाळीची काय खरेदी?’, ‘सुटीत कुठे जाणार फिरायला?’, ‘काय मग यंदाच्या दिवाळीला काय स्पेशल?’,  ‘पुढच्या दिवाळीर्पयत तरी करा लग्न, उडवून टाका बार.’,  ‘या दिवाळीत तरी वाढणार का पॅकेज?’ या आणि अशा स्वरूपाच्या असंख्य प्रश्नांनी आपण घेरलेलो असतो. एकीकडे आपल्यालासुद्धा सणावारी काहीतरी ग्रेट घडावं असं वाटत असतं आणि दुसरीकडे इतरांचे असे प्रश्न. कोणी या दिवाळीत काय भन्नाट गोष्ट केली, याच्या चर्चा आजूबाजूला होत असतात. बाजारात नवनवीन प्रॉडक्ट्स आलेले असतात. डिस्काउण्ट, व्हरायटी, ऑफर्स, खरेदीची रेलचेल आणि नुसती स्पर्धा. सगळे काहीतरी मिळवण्यासाठी धावताय. इतरांपेक्षा वेगळे असे काहीतरी हवेच आहे प्रत्येकाला.त्यात आताशा सोशल मीडियाचं प्रेशर. सगळे आपले हॅपी हॅपी नटले-सजले फोटो टाकतात सगळीकडे. ‘मी भारी’, ‘आम्ही आणखीन भारी’ अशी ही धावपळ. इतरांना सारखं काहीतरी दाखवायचं आहे. आपणही या स्पर्धेतल्या कशाला बळी पडलेलो असतो. काही जिद्दीने नाकारलेले असते. इतरांच्या सेलिब्रेशनचे ताणतणाव कळत-नकळत आपल्यावर प्रभाव टाकत असतात. कोणी नुकतेच नोकरीला लागलेले असते आणि आपण मनात आशा लावून बसलेलो असतो. कोणी सुट्टीत झकास ट्रीपला जातात. महागडे टूर्स बुक करतात. कोणी एखादा कोर्स करतात. आपल्याला तो परवडत नसतो, त्याबद्दल नाही म्हटले तरी किंचित वाईट वाटत असते. कधी आपल्याला तशी आवडच नसते. पण ‘तो/ती बघ कसे मार्गाला लागले. तुम्ही बसा आळसात लोळत’, असे सल्ले अंगावर भिरकावले जातात. त्यात घरात साफसफाई, खरेदी, फराळ बनवण्याची धावपळ. येणारे जाणारे. थकवा तर येतोच. दिवाळी तर आनंदात पार पडते. सेल्फीचा क्लिकक्लिकाट होतो. ग्रुप फोटो निघतात. पाटर्य़ा, भेटीगाठी, फराळाचे राउण्ड्स सगळं साग्रसंगीत पार पडतं. आपल्या मनातली हुरहूर त्यात दडपली जाते. पण एकदा का दिवाळी संपली की जणू रबराचा ताण सोडल्यासारखे सैरभैर व्हायला होतं. समोर एकदम काहीच दिसत नसतं धमाकेदार. रुटिन सुरू करायचा कंटाळा आलेला असतो. फेस्टिव्ह मूड जाता जात नसतो. थोडा आळस साठतो. आधी कशाच्या तरी निमित्ताने ‘हे करू की ते करू’ प्लॅन्स बनवणार्‍या आपल्या शरीर-मनाला पुढचं नेमकं  असं टार्गेटच मिळत नाही. मग कंटाळा, थकवा, आळस डोकं वर काढतात. इतकी सुट्टी मिळून, इतकं सेलिब्रेशन होऊनसुद्धा ‘बोअर’ होणं ेथांबत नाही. आणखीन चेंज हवाच आहे, असं वाटत राहतं. परत नव्यानं वेगळं काय मजेदार घडणार आयुष्यात आणि सततच कसं घडत राहणार? दिवाळीनंतर अशी फेज अनेकांच्या वाटय़ाला येते. कळत नाही करायचं काय.त्यावर हे काहीसे साधेसोपे उपाय.1. एकतर अशावेळी आपलं रुटिन चटकन सुरू करायचा प्रय} करायचा. आपली सणासुदीची उत्सुकतादेखील घालवायची नाही आणि एकदम ताण सुटल्यासारखं आळशीसुद्धा व्हायचं नाही.2. गाडीचं कसं सव्र्हिसिंग करतो, देखभाल करतो आणि मग जोमाने ती वापरतो, तसंच शरीर मनाचं सव्र्हिसिंग फेस्टिव्ह मूडमध्ये झालेलं आहे, असे समजायचं. यापुढे तर आणखीन झकास गिअर टाकत, तजेलदार होत पुढचे प्लॅन्स बनवायचे आहेत, हे स्वतर्‍ला बजावायचं.3. रुटिनमधला असा आनंददायी असा कोणताही ब्रेक नव्याने आयुष्याला सामोरे जायला वापरून घेतला पाहिजे. दिवाळी येणार, येणार करत जो उत्साह मनात होता, तोच उत्साह दिवाळी सरल्यावरदेखील टिकवता आला पाहिजे. फारतर, थोडा थकवा जाणवेल नव्याने रुटिन सुरू करायला. त्यात फराळाची हाय कॅलरी मेजवानी झोडलेली असते. त्यानंही एक जडपणा आलेला असतो. म्हणूनच, आपला सणावाराचा ताण एकदम सुटणार आहे/सुटला आहे आणि त्याचा वेगळा आळस आपल्यात भरून राहणार आहे, हे आधीच स्वतर्‍ला सांगून ठेवायचं.4. छोटे छोटे का होईना, नवीन प्लॅन्स दिवाळीनंतरच्या काळात आखून ठेवायचे. व्यायाम सुरू करायचा. त्यानुसार अगदी शंभर टक्के जमलं नाही, तरी हळूहळू काम सुरू करायचं. उत्साहाने डोंगर चढलेली गाडी डोंगर उतरल्यावर पायथ्याशी पडीक ठेवायची नाही. हळूहळू पुढचे प्रवास आखायला सुरू करायचे. त्या दिशेने जात राहायचं. पुन्हा नव्यानं आणि  जोरदार प्रवास करण्यासाठी. असं केल्यानं दिवाळीचा थकवा तर जाणवणार नाहीच, उलट नवा उत्साह येईल पुढच्या प्रगतीसाठी. ट्राय तर करा..