वैतागलेल्या विद्यार्थ्यांनी दिलेली यादी१) शिक्षक फक्त सिलॅबस पूर्ण करण्याच्या मागे लागतात. मुलांना किती कळतं, हे पाहत नाहीत.२) दोन तासात दोन दोन चॅप्टर संपवतात. नुस्ती पुस्तकं वाचून दाखवतात.३) पिवळ्या पडलेल्या, जुनाट नोट्स वाचूनच शिकवतात. ४) मुलांना झापतात. अपमान करतात. हसतात.५) अत्यंत हळू, कुठंतरीच पाहत, पुस्तकी भाषेत एकसुरी बोलतात.६) काहीजण वर्गात फक्त प्रेझेण्टी मारतात. काहीतरी वाचा असं सांगून वर्गातून निघून जातात.७) ज्युनिअर, नुकतीच पास आउट झालेली मुलं प्राध्यापक म्हणून नेमली जातात. काही बिनपगारी असतात. त्यांनाच विषय समजलेला नसतो, पण ते पुस्तक वाचून शिकवतात.८) पीपीटी करून रटाळ भाषेत विषय मांडतात.९) मुलांशी दोस्ती नसते, त्यामुळे विषयापलीकडचे कनेक्ट होत नाही.१०) प्रयोगशाळा, ग्रंथालयांच्या सोयी नसतात. असल्या तरी अत्यंत वाईट असतात.११) शिकवण्याचं स्किल नसतं, त्यामुळे हुशार व्यक्ती उत्तम शिक्षक असतातच असं नाही. ते फक्त आपलं ज्ञान दाखवतात.१२) मेंदूला काहीच खुराक मिळत नाही.MA+ MSW+B.P.Ed.एवढं करून झाले अंगणवाडी मदतनीसएका खेड्यातून मी एम.ए.चं शिक्षण घेतलं. त्यानंतर गावामध्ये एका प्रायव्हेट शाळेत पाच वर्षे बिनपगारी शिकविण्याचं काम केलं. ज्या शाळेमध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेतलं त्याच प्राध्यापकांसोबत काम करण्याची संधी मिळाली याचा मला आनंद होता. परंतु एक सल मनात होतीच की एम.ए. समाजशास्त्रामध्ये उत्तीर्ण झाले, परंतु चांगले मार्क मिळाले नाही, रॅँक मिळाली नाही. पुढे चांगले गुण नसल्यामुळे चांगली नोकरी मिळू शकली नाही. कारण तेच. तास व्हायचे नाहीत, नोट्स मिळायच्या नाहीत. यातून माझे फार नुकसान झाले. रेग्युलर कॉलेज करूनसुद्धा चांगले मार्क्स मिळवू शकले नाही. पुढे ज्या ठिकाणी इंटरव्ह्यू दिला त्या ठिकाणी गुणाऐवजी पैसा मोजला जायचा. नाहीच बरी नोकरी मिळाली.आता मी एक अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करते आहे. दोन हजार पाचशे रुपयांमध्ये घर चालवते आहे. जिथं मी काम करते तिथं गेले वर्षभर सेविका नाही. तिच्या गैरहजेरीमध्ये घड्याळाचे सेल बदलण्यापासून झाडू मारणं ते खिचडी करणं हे सारं काम मी करते. निदान माझ्या शिक्षणाचा या छोट्या मुलांना लाभ व्हावा म्हणून प्रयत्न करते.पण आपली मुलगी एवढं शिकून चांगली नोकरी मिळवू शकली नाही याचं दु:ख आई-वडिलांना सतत आहेच. यापूर्वी मी प्रायव्हेट कॉन्व्हेंट शाळेत नऊ वर्षे शिकवलं. पाच वर्षं बिनपगारी घालवली. पण त्या शाळेलाही मान्यता मिळाली नाही.लग्नानंतर मी एका खेडेगावामध्ये मदतनीस म्हणून गेली पाच वर्षे काम करते आहे. लग्नानंतर शिक्षणाची आवड असल्यामुळे बी.पी.एड., एम.एस.डब्ल्यू., कॉम्प्युटर शिक्षण पूर्ण केलं. पण चांगली नोकरी नाहीच मिळाली. आता अंगणवाडीत तरी छोट्या मुलांसाठी काम करतेय हीच एक आशा आहे..- एक अंगणवाडी मदतनीस
उच्च शिक्षण घेताय ना, मग स्वत: करा जरा अभ्यासशिक्षकांना काय दोष देता?मी एका महाविद्यालयात शिकवतो. मला असं वाटतं की परीक्षेत विद्यार्थ्यांना कमी मार्क्स मिळतात याला ते स्वत:च जबाबदार आहेत. आजच्या मुलांना विषय शिक्षक म्हणजे एक सेलिब्रिटी असावा असं वाटतं. त्यानं आमचं मनोरंजन केलं पाहिजे हीच अपेक्षा. जरा विषयाला हात घातला की त्यांना बोअर होतं. तो विषयच बोअर व्हायला लागतो. आणि दुसरं म्हणजे मार्क्स मिळवणं हे फक्त शिकविणाऱ्यावर अवलंबून नसतं. ते स्वअध्यनावरदेखील अवलंबून आहे. तुम्ही स्वत: किती अभ्यास करता आणि तो विषय तुम्ही किती समजून घेता यावरदेखील तुमचे गुण अवलंबून असतात. त्यामुळे फक्त शिकविण्याला जबाबदार धरू नये.शिकविण्यापेक्षा शिकणारा जास्त जबाबदार आहे. समजा जर एखादा विषय किंवा शिक्षकांचं शिकवणं तुम्हाला खरंच समजत नसेल तर त्या विषयाची पुस्तकंदेखील असतात. आपले आपण समजून घ्या. पण पुस्तक कोण वाचतंय? फुकटचे इंटरनेट आहे ना, पोरं तेच वाचणार आणि त्यावरच लिहिणार! स्वत:हून अभ्यास करणारी जी मुलं असतात ती अशी शिकविणाऱ्याच्या चुका दाखवित नाहीत.- किशोर पाचवणे चोपडा, जळगावआयआयटी करतोय, पण ना शिक्षक, ना उपकरणं. शिकणार कसं?आमची किंमत झिरोआयटीआय. इथं वेगवेगळ्या ट्रेडचं प्रॅक्टिकलसह प्रशिक्षण दिलं जातं. याच प्रशिक्षणाच्या जोरावर विद्यार्थी उद्योग/कंपनीमध्ये नोकरी, उद्योग किंवा व्यवसाय सुरू करतो. कंपनी कामगार गरजा पुरविण्यासाठी शासनाने प्रत्येक तालुक्यासह जिल्ह्यात छोट्या मोठ्या शासकीय आयटीआय सुरू केले आहेत. पूर्वीसारखं आता राहिलं नाही. आयआयटीच्या चांगल्या ट्रेडला प्रवेश घेण्यासाठी चांगले मार्क्स लागतात. पण इतकी मेहनत करून इथं आल्यावर कळतं की, जे वाटलं होतं ते इथं नाहीच. १) पाच विषयांपैकी जेमतेम एकदोन विषयांचे तास होतात. बाकीचे होतच नाहीत. काहींना निदेशक नाही, तर काही असून वर्गात येतच नाहीत.२) काही सर वर्गात येतात कधीतरी. फळ्यावर एक लेसन सुरू करून त्या दिवशी संपवतात. एकाच तासात अन् सांगतात अमुक पुस्तकातून लिहून काढा. पुस्तकच पुस्तक लिहून काढायला सांगतात.३) प्रॅक्टीकलसाठी मटेरिअल्सच नसते. बरेच मशीन्स बंद असतात. धूळ खात असतात. ४) आयटीआयमध्ये थेअरी या विषयाबरोबर गणित, ड्रॉइंग व ईएस हे विषय आहेत. या विषयाचे तासच होत नाहीत. चौकशी केली तर त्या विषयाला शिक्षकच नाही. मग काय शिकणार आम्ही? ५) प्राचार्य, फोरमन कधीतरी सेक्शनला राउंड मारतात. त्यांच्याकडे तक्रार केली तर नाव कमी करून टाकायची धमकी देतात.६) सर्वात मोठी शिक्षा म्हणजे आम्हाला शिक्षक असो नसो, रजेवर असोत नसोत, काही बोललं तर परीक्षेला बसू न देण्याची धमकी.७) ग्रंथालयाच्या नेटसर्व्हरचे आमच्याकडून अॅडमिशनमध्ये पैसे घेतले जातात. परंतु ना ग्रंथालय, ना पुस्तके, ना नेट, ना खेळ.८) परीक्षेच्या वेळेस मात्र सर लोक धावपळ करून आम्हाला कॉपी पुरवतात, प्राचार्य त्याला फॉर असतात. मग आम्ही त्यातून पास होतो. परंतु कंपनीच्या गेटवर मुलाखत दिल्यानंतर समजतं आपली किंमत कशी झिरो आहे.- सुभाष, पूजा, मनोज, गणेश आयटीआय प्रशिक्षणार्थीडिप्लोमाला ५ वर्षे, डिग्रीला ३, पण शिकलो काय ते विचारा..मेकॅनिकल म्हणजे नक्की काय?मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिकतोय. दहावीनंतर डिप्लोमा केला, आता डिग्री करतोय! मला डिप्लोमा पूर्ण करायला पाच वर्षे लागली. आता डिग्रीच्या तिसऱ्या वर्षाला आहे. पण आतापर्यंत डिप्लोमा आणि डिग्रीच्या कॉलेजने एकदाही एखाद्या गाडीचं किंवा मशीनचं मेंटेनन्स करायला सांगितलं किंवा दाखवलं नाही.खरंच, मेकॅनिकल म्हणजे काय, हे कसं काय कळणार? मला तर असंच वाटतंय की विनाकारण आपली एवढी ७-८ वर्षं बरबाद झाली. वाया गेले दिवस. कारण की आम्ही जे शिकतोय त्याला बाहेरच्या मार्केटमध्ये काहीही किंमत नाही. म्हणून तर दरवर्षी लाखोंच्या संख्येने इंजिनिअरिंगच्या दुकानातून (कॉलेजमधून) बाहेर पडणारी मुलं-मुली नोकऱ्या शोधत फिरतात. काही घरीच बसतात. कारण कंपन्यांना जे स्किल किंवा प्रॅक्टिकल नॉलेज लागतं ते आमच्याकडे नाहीे.काय फायदा आमचा? आम्ही इतकं मन मारून जगतो. रात्रंदिवस सबमिशन, असाईमेंट करतो. जीव तोडून अभ्यास करतो. कॉलेजलाइफ काय असतं ते माहीत नाही. गर्लफ्रेंड काय असते ते माहीत नाही. कारण की मेकॅनिकलमध्ये दुष्काळ पडलेला असतो सगळ्याचाच..- सचिन वानखेडे असोदा, जळगाव पीपीटी आणतात, आणि एका लयीत बडबडतात.. काय कळणार?वर्गातले व्हायरसहो, होतं मला बोअर काही काही लेक्चर्समध्ये. आमच्या कॉलेजमध्ये शिकवण्यासाठी प्रोजेक्टरचा उपयोग करतात, मुलांना अभ्यासक्र म समजून घेण्यास अजून सोयीस्कर व्हावे हा त्यामागचा हेतू. म्हणून सर्व शिक्षक आपापल्या विषयाची पॉवर पॉइंट्स प्रेझेंटेशन बनवून आणतात त्यामुळे फळ्याचा वापर तसा कमीच होतो.आमच्याकडे एक मॅडम आहेत, त्यांच्या लेक्चर्सला खूपच बोअर होतं. पीपीटीचा उपयोग कसा करायचा हेच मुळी माहीत नाही. पीपीटी अत्यंत बोअरिंग असतं. पांढरं फटफटीत. तेच तेच बघून कंटाळा येतो. दुसऱ्या एक मॅडम, त्या मुलांकडे ढुंकून बघत नाहीत. अजून एक मॅडम आहेत त्या लेक्चरमध्ये दोनदा प्रेझेण्टी घेतात. एकदा येताना आणि नंतर जाताना. का तर आम्ही आमच्या फ्रेंडची प्रॉक्सी मारली तर नाही ना हे चेक करायला. असं असताना एक सर आहेत ते एकदम कूल आहेत. ते शिकवताना आमच्यात येऊन बसतात. एकदम फ्रेंडली वातावरण क्रि एट करतात. ते आम्हाला गाइज असं संबोधतात. वर्गात आल्यावर गप्पा मारल्यागत सुरुवात करतात. उगाच किचकट संदर्भ न जोडता सोप्या भाषेत समजून सांगतात. अजून एक मॅम आहेत. त्या तर एकदम भन्नाट आहेत. वर्गात येताना फक्त लॅपटॉप आणि एखादी डायरी आणतात. दहा-वीस वर्षांपूर्वीचा पिवळट पडलेला कागदांचा गठ्ठा (नोट्स) त्यांच्याकडे कधीच नसतो. त्यांच्या लेक्चरला कोणी तीस मिनिटे जरी लेट आलं तरी त्या वर्गात घेतात. कदाचित मिस झालेल्या तीस मिनिटांपेक्षा उरलेल्या तीस मिनिटांचा त्या विचार करत असतील.प्रत्येक शिक्षक आपापल्या पद्धतीने शिकवत असतो. आम्हाला मात्र एका दिवसात तासातासाला त्यांच्या त्या पद्धतींशी जुळवून घ्यावं लागतं. सगळीच मुलं ‘तारे जमीं पर’ मधील इशान अवस्थी नसली, तरीही सगळ्यांना एकदा तरी राम निकुंभला भेटण्याची इच्छा असते. पण बहुतांश मुलांना राम निकुंभपेक्षा व्हायरसच जास्त भेटतात. त्याला काय करणार?- विशाखा पाडावेशिक्षक नुस्ते थिअरी वाचून दाखवतात, जी त्यांनाच धड कळलेली नसते, आम्हाला काय कळणार?रट्टा मारतो, म्हणून तरतो..मी बीएस्सीची विद्यार्थिनी आहे. मलाही लेक्चर्स बोअर होतात कारण शिक्षक तितका इंटरेस्ट घेऊन शिकवत नाहीत. निर्जीव थिअरी वाचून दाखवतात. क्वचितच काही शिक्षक असतात जे उत्सुकतेने शिकवतात. अनेकदा शिक्षकांना तर टॉपिक व्यवस्थित समजलेलाच नसतो. त्यामुळे कसबसं वाचून वेळ मारून नेली जाते. काही शिक्षक वर्षानुवर्षे एखादा विषय शिकवत असतात. त्यामुळे ते स्वत:च्या स्पीडमध्ये शिकवत असतात. सरांच्या स्पीडमध्ये शिकण्यात अडचण होते. समजतच नाही काय चाललंय. काही टीचर्स मुद्दाम एखाद्या अॅव्हरेज विद्यार्थ्याला उभं करून प्रश्न विचारतात. त्याची सर्व क्लाससमोर टिंगल करतात. हसू होतं इतरांना. काहीजण अपमानास्पद बोलतात. क्लासमध्ये सिगरेट ओढतात. मोबाइलवर बोलतात. हे सगळं कुणाला सांगणार? मग मुलं ट्युशन क्लासेसकडे वळतात. आजकाल कोचिंग क्लासेसचे टीचर्सही फार प्रोफेशनल झाले आहेत. फक्त हुशार विद्यार्थ्यांकडेच जास्त लक्ष दिलं जातं. विद्यार्थिसंख्या जास्त असल्याने सर्व विद्यार्थ्यांकडे पुरेसं लक्ष कोण देणार? मग विषय न समजल्यानं विद्यार्थी रट्टा मारतात. ऐन वेळेवर जेवढं आठवतं त्यापुरतेच मार्क मिळतात.प्रयोगशाळेमध्ये पण काहीसं तसंच वातावरण असतं. साहित्य तुटलेलं, बिघडलेलं असतं. काहीतरी जोडजाड करून पुन्हा बनवली जातात उपरकणं. त्यामुळे रीडिंग घेणं कठीण होतं. अनेकदा थिअरीच न समजल्याने प्रयोग समजत नाही. त्यामुळे ग्रुपमधील एखाद्या मुलाचे रीडिंग पाहून उतरवली जातात.अमुक सर फार बोअर शिकवतात, तमुक सरांचं फिजिक्स खूप चांगलं समजतं अशी वाक्यं आपण अनेकदा ऐकली आहेत. एखादे सर चांगले शिकवतात याचा अर्थ ते हसत-खेळत सर्व विद्यार्थ्यांना समजेल त्या स्पीडमध्ये प्रोत्साहित करून शिकवतात. विचारलेल्या सर्व प्रश्नांचे निरसन करतात. त्यांच्या लेक्चर्सला स्वत:हून यावंसं, शिकावंसं वाटतं.हे एवढं जरी झालं तरी आम्हाला वाटेल की, बसावं लेक्चरला!- गौरी मोहोडशिक्षक रटाळ विद्यार्थी खट्याळक्लासमध्ये ‘ते’ येणार, पुस्तक नुस्तं वाचून दाखवणार आणि मग विचारणार, समजलं? काय डोंबलं समजणार आम्हाला ! गेली कित्येक वर्षं (किमान ५) जर अभ्यासक्र म फारसा काही बदललेला नाही तरीही प्राध्यापकांना पुस्तक वाचायची गरजच का पडावी? (तीव्र प्रज्ञेचं काय?) मुळात प्रश्न असा येतो की, मी एखाद्या विषयात नेट-सेट करतो, पास होतो आणि चिकटतो प्राध्यापक म्हणून; पण म्हणून जो विषय समजला आहे तो तितक्याच प्रतिभेने, चांगल्या रीतीने शिकवता, समजवता येईल असे नाही ! तेव्हा प्राध्यापक म्हणून रु जू करतानाच ते किती शिकले आहेत यापेक्षा जेवढं शिकले आहेत तेवढं ते किती चांगल्या रीतीने शिकवू शकतात हे पाहण्यात यावं !मुद्दा काय, पुस्तकात जे दिलं आहे ते आम्ही घरीदेखील वाचू शकतो. पण प्राध्यापकांकडून अपेक्षा अशी असते की त्यांनी त्याव्यतिरिक्त, त्या विषयाशी संलग्न बाबी आम्हाला सांगाव्यात अथवा त्या भागाचे सार (मोराल) उदाहरणं देऊन पटवून द्यावं. मुख्य गोष्ट अशी असते की, मुलांचा त्या विषयातला इंटरेस्ट वाढवणं ! तो जर का वाढला नाही किंवा नसेलच तर आपोआप त्या विषयाकडे दुर्लक्ष होतं आणि त्याचा परिणाम नक्कीच आपल्या मार्कावर पडलेला दिसून येतो ।ही झाली एक बाजू. पण टाळी एका हाताने वाजते का? तर नाही ! यात आपणही दोषी आहोतच. झोपाळलेले तोंड घेऊन क्लासमध्ये जाणं, कमेंट्स करणं यामुळे त्या प्राध्यापकांनाही इच्छा असूनदेखील चांगला शिकवायचा कंटाळा येत असावा. चुकतंय बरंच सध्या, हे नक्की!- पुष्कर आगाशे अकोलाप्रॅक्टिकल शिकवा, थिअऱ्या नकोत..मी एक ई. अॅण्ड टी. सी. इंजिनिअर आहे. तीन वर्षं डिप्लोमा आणि चालू इंजिनिअरिंगचं शिक्षण घेताना असं लक्षात आलं की, जे शिक्षण मी कॉलेजमध्ये घेतलं आणि घेतोय ते फक्त मी इंजिनिअर आहे इतकीच ओळख करून देणारं आहे. शिक्षण संपल्यानंतर नोकरीच्या मुलाखतीला आणि पुढे नोकरीला जातो तेव्हा समजतं की आपण जे शिकलो ते सगळं फक्त बेसिक होतं. गरज आहे ते अॅडव्हान्स असण्याची. मग पुन्हा कोर्सेस करावे लागतात. तिथे भरमसाठ फी भरावी लागते, तेव्हा कुठे नोकरी लागते. याचं कारण काय तर आपण घेत असलेलं शाळा-कॉलेजातलं शिक्षण!शिक्षक फक्त पोर्शन पूर्ण करायचा म्हणून शिकवतात. माझं एक उदाहरण सांगतो, जेव्हा मी डिप्लोमाचं शिक्षण घेत होतो तेव्हा आम्हाला मायक्रो कण्ट्रोलर नावाचा एक विषय होता. तेव्हा माझ्या एका सरांनी तो मायक्रो कण्ट्रोलर कसा काम करतो हे आम्हाला प्रत्यक्ष दाखवलं. अभ्यासक्रमात नव्हतं तरी. कारण ते म्हणत की इंडस्ट्रीत काम करताना हे तुम्हाला जमायला हवं. ते इतकं आनंदानं शिकवायचे की त्या सेमिस्टरला आमची सर्वांची त्या विषयाला शंभर टक्के प्रेझेण्टी होती. सरांची भेट चुकवू नये असं वाटायचं. हे असे शिक्षक आणि प्रॅक्टिकल असेल तर का आम्ही विद्यार्थी म्हणू की, शिक्षण बोअर होतं म्हणून..- जितेंद्र कोल्हेउल्लेखनीय प्रतिसाद‘लेक्चर बोअर होतंय?’ - या विषयावर भरभरून लिहिणाऱ्या साऱ्यांचेच आभार. त्या पत्रांत ज्यांचे लेखही उत्तम होते, त्यांची ही एक नोंद..रेणुकादास हरिशंकर मुक्कावार- पुणे, महादेव जायभाये- काकडिहरा, बीड. स्नेहल- सांगली, अरुण पवार, शुभम पार्टे, आकाश करवा