शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

सायकल आणि कचरा उचलो अभियान

By admin | Updated: October 6, 2016 17:33 IST

बोरीवलीच्या नॅशनल पार्कमध्ये केलेल्या एका आगळ्या सायकलिंगची गोष्ट.. मला सायकलिंग आवडतं. पण माझा असा वेगळा सायकलिंग ग्रुप वगैरे नाही.

 
बोरीवलीच्या नॅशनल पार्कमध्ये केलेल्या एका आगळ्या सायकलिंगची गोष्ट.. मला सायकलिंग आवडतं. पण माझा असा वेगळा सायकलिंग ग्रुप वगैरे नाही. परंतु एक ट्रेकिंगचा ग्रुप आहे, ज्यांच्या सोबत मी कधीही केव्हाही इन्स्टंट प्लॅन करून बाहेर गड-किल्ल्यांवर भटकायला जाते. याच ग्रुपमधल्या चार जणांनी संजय गांधी नॅशनल पार्क, बोरीवलीला जायचं ठरवलं. तिथे गेल्यावर आम्हाला तिथं चालू केलेल्या सायकलिंगच्या नवीन उपक्र माबद्दल कळले. नॅशनल पार्कमध्ये फिरण्यासाठी आपण भाड्यानं सायकल घेऊ शकतो. फक्त प्रत्येक तासामागे काही विशिष्ट भाडं ते आकारणार. आम्हाला ही कल्पना फारच आवडली. जराही वेळ न दवडता आम्ही थोडे पैसे भरले आणि सायकल घेऊन निघणार तितक्यात एका पोलीसकाकांनी आम्हाला थांबवलं.. आणि एक मोठी पिशवी आमच्याकडे दाखवत त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्हाला सायकलिंग करताना पडलेला प्लॅस्टिकचा कचरा म्हणजेच प्लॅस्टिकच्या बाटल्या, कागदं, पाकिटं गोळा करायला आवडेल का? जर असं केलं तर तुम्हाला भाड्यात विशेष सवलत दिली जाईल. तुम्हाला आवडेल का हे काम करायला? आम्ही जराही मागचा पुढचा विचार न करता अगदी आनंदाने ‘हो’ म्हणालो. सवलत मिळणार म्हणून नाही, आम्हाला स्वत:लाच निसर्गाच्या ठिकाणी कचरा झालेला आवडत नाही आणि आम्ही स्वत:ही कधी करत नाही. काकांकडून ती पिशवी घेतली आणि सायकलिंगला सुरुवात झाली. आणि अर्थात त्याचबरोबर स्वच्छता अभियानाला! भटकत भटकत कन्हेरी गुहांपर्यंत गेलो. त्या चढावरून चढताना इतकी दमछाक झाली. पण खूप मज्जा आली. रस्ता बऱ्यापैकी मोकळा असल्यामुळे मनासारखी सायकल चालवता आली. झाडांच्या सावलीमुळे थकवा जास्त जाणवला नाही. खूप रेफ्रेशिंग वातावरण होते. काकडी-कैऱ्या खात, फोटो काढत खूप छान वाटत होतं. पण हे सगळं करत असताना पोलीसकाकांनी दिलेली पिशवी भरत पण होतो. खूप वेळच्या या भन्नाट सायकल राइडनंतर जेव्हा सायकल परत केली तेव्हा पिशवी बऱ्यापैकी कचऱ्यानं भरली होती. ते काकाही खूश झाले. आम्हालाही काहीतरी चांगलं केल्याचं समाधान मिळालं. अस आमचं हे सायकलिंग! जे फक्त सायकलिंग करायच्या उद्देशाने सुरू झालं, पण ते आमच्याही नकळत स्वच्छता अभियानात छान सहभागी झालं. 
- रुचिता रावल
 
 
सेल्फीवाले
सेल्फीश?
स्वत:च स्वत:चेच, कुठल्याही क्षणांचे फोटो काढून आपण काय मिळवतो?
 
एका बातमीनं अस्वस्थच झालो.
‘सेल्फी काढताना तरु णाचा मृत्यू’..
वयाच्या अठराव्या वर्षी मृत्यू कारण काय तर सेल्फीचा नाद...
या वयात मुलं कॉलेजला जातात, मजा करतात, प्रेमात पडतात..
पण एका सेल्फीच्या नादात त्याचा घात झाला आणि सर्व स्वप्नंही बुडाली त्याच्याबरोबरच.. ऐन तारु ण्यात.
सेल्फी या विषयावर लिखाण करण्यासाठी मी सहज गूगलवर फनी इंडियन सेल्फी म्हणून सर्च केलं तर भराभर फोटो ओपन झाले. कोणी मयताला खांदा देताना, तर कोणी खोल दरीच्या टोकावर, कोणी दर्शनाच्या रांगेतून, तर कोणी अपघाताच्या ठिकाणाहून. या सर्व अमानुषपणाचा कळस म्हणून एका मरणासन्न व्यक्तीला मदत न करता त्याच्यासोबत सेल्फी घेणारा महाभागही मला या फोटोच्या गर्दीत आढळला.
या सेल्फीमुळे तरु णाई सेल्फीश होताना दिसून येते. पूर्वीच्या काळी तरु ण विविध विचारांच्या आणि विचारधारांच्या मुद्द्यांवर चर्चा करताना दिसत होते. पण आजची तरु णाई आपल्या सेल्फीला जास्त लाइक कसे मिळतील याचा विचार करते. या सर्व प्रकारचा कळस म्हणजे नारळपाणी, ज्यूस इ. पिताना सेल्फी (ड्रिंकिंग ज्यूस, फीलिंग कूल) अरे काय हा मूर्खपणा? तू ज्यूस पितो, हे जगाला का सांगतो? तू काय असा तीर मारला? मित्राचा मोबाइल हाताळत असताना मी त्यात एक सेल्फी बघितला. सेल्फीत सगळे छान दिसत होते. हसत होते. ‘कुठला रे हा?’ मी सहज त्याला विचारले. ‘गर्लफ्रेंडचा वाढदिवस’ जरा नाराजीने त्यानं उत्तर दिलं. क्षणभर मला त्याचा हेवा वाटला. पण तो परत नाराजीने सांगू लागला, कसला एन्जॉय यार? एन्जॉय कमी सेल्फी जास्त, गप्पा कमी अपलोडिंग जास्त. फक्त एका तासात हिनं पन्नास सेल्फी सोशल साइट्सवर टाकले. जरा रागातच बोलला तो.
- सेल्फीच्या नावानं हे असं का होतंय आपलं, मी उत्तर शोधतोय..
- चेतन चौधरी
आपण खरंच आधुनिक आहोत?
ब्रॅण्डेड कपडे आणि उत्तम राहणीमान म्हणजे मॉडर्न असणं का?
 
‘मॉडर्न’ म्हणजे काय?
आधुनिक..
पण म्हणजे काय? फक्त वरकरणी दिसणारं राहणीमान?
‘ब्रॅण्डेड’ कपडे, घड्याळ, गॉगल्स हे सर्वच वापरणं म्हणजेच मॉडर्न असणं का? ही झाली राहणीमानातली आधुनिकता. पण विचारांचे काय? 
विचार कधी होणार आधुनिक? परखडपणे सांगायचं झालंच तर इमारतींमधली बंद दारांची घरं, त्यात सुंदर असे इंटेरिअर, चार चाकी वाहनं, भाषेत इंग्रजीचा वापर हे एवढंच म्हणजे आधुनिक असणं नव्हे असं मला वाटतं. राहणीमानाच्या दर्जात खूप झपाट्याने वाढ झाली असली तरी माणसाच्या विचारसरणीतला पुरोगामीपणा, त्यातला मोकळेपणा फारसा वाढलेला नाही. किती बोलतो आपण स्त्रीपुरुष समानतेविषयी..
आहे का ती समाजात?
कोणी स्त्री-पुरुष एकमेकांशी थोडं मनमोकळे बोलताना दिसले तरी अजूनही लोकांच्या मनात संशयाची पाल चुकचुकल्याशिवाय राहत नाही. बाकी कामांची वाटणी तर अजून ‘जैसे थे’च ! जातीपातीचे घोळ तर वाढतच चाललेत. मग कसले आपण मॉडर्न झालो?
झालोय का?
- प्रियंका दाभाडे