शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अजिंक्य रहाणे - फायटर माणसांचं कुल युद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 08:00 IST

शांतपणे, शोशा न करता, स्टाइल न मारता, आक्रमक आहोत, असं न दाखवता केवळ आपली गुणवत्ता, मेहनत आणि संयम या जोरावर जिंकता येतं हे २०२० संपता संपता अजिंक्यने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. नव्या बडबोल्या काळात अजिंक्यचं जिंकणं म्हणूनच जास्त महत्त्वाचं आहे.

-अभिजित पानसे

शांतपणे, शोशा न करता, स्टाइल न मारता, आक्रमक आहोत, असं न दाखवता केवळ आपली गुणवत्ता, मेहनत आणि संयम या जोरावर जिंकता येतं हे २०२० संपता संपता अजिंक्यने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे.

नव्या बडबोल्या काळात अजिंक्यचं जिंकणं म्हणूनच जास्त महत्त्वाचं आहे.

तो मैदानात देहबोलीतून अतिउत्साह, आक्रमकता दाखवत नाही, त्यामुळे त्याच्याकडे स्टारडम नाही. त्याचे टॅण्ट्रम नाही. तो वादग्रस्त बोलत नाही. झंकीफंकी स्टाईल करून कॅमेरे आपल्याकडेच राहतील, असाही तो कधी वागला नाही. यशात त्याचा चेहरा बदलला नाही, अपयशातही नाही. त्याच्या वाट्याला अपमान आणि टीका तर किती आली याचा हिशेब त्यानंही कधी ठेवला नसेल. त्याला सुरुवातीला संघातून बाहेर ठेवलं गेलं, कारण काय पुढे करण्यात आलं तर तो सिंगल रन घेत स्ट्राइक बदलू शकत नाही. तत्कालीन कर्णधारांच्या विशेष आवडत्या खेळाडूंमध्ये तो नसल्याने इतरांप्रमाणे त्याला विशेष प्राधान्य मिळत नसे. तरीही त्याला संधी मिळेल तशी तो तिचं सोनं करत राहिला. कधी त्याला चांगलं खेळता आलं, कधी तो ही ढेपाळला. मात्र, पुढे तो भारतीय टीमचा उपकर्णधार झाला; पण तरीही त्याला टीम मॅनेजमेंटद्वारे त्याला वगळण्याची मालिका सुरूच राहिली. मात्र, क्रिकेटपेक्षा क्रिकेटरचे फॅन असलेल्या क्रिकेटरप्रेमींना स्टारडम नसलेल्या त्याचं हे आतबाहेर होणंही काही फार खुपलं नाही. तसा तो दर आयपीएलमध्ये खोऱ्याने धावा काढणारा. मात्र, मागच्या वर्षी राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन असलेल्या त्याच्याकडे दुबईमध्ये नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये पूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलं. दिल्लीने बराच काळ त्याला नुसता बसवून ठेवला. आणि उतरवला तेव्हा तो चालला नाही, असंही काहीजण म्हणत होतेच. मुद्दा काय त्याच्या क्षमतेबद्दल सतत प्रश्नचिन्हं उभी करण्यात आली आणि तो शांत, गप्प कायमच... तो अर्थातच अजिंक्य रहाणे.

प्रस्तुत ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी मालिकेसाठी रहाणेला उपकर्णधार बनवण्यात आलं. पहिल्या कसोटी सामन्यानंतर विराट कोहली ‘पॅटरनल लिव्ह’मुळे भारतात परत येणार हे ठरलं होतं. त्यामुळे या ऐतिहासिक व अत्यंत खडतर मालिकेत अजिंक्य रहाणे नेतृत्व करणार, हे ठरलं होतं.

३६ धावांत आपली अब्रू वेशीला टांगून संघ परतला ही गोष्टही ठसठसत होतीच. पहिल्या कसोटीत सर्वाधिक धावा काढलेला विराट कोहली परत गेला होता, भारतीय बॉलिंग आक्रमणाचा कणा मोहम्मद शमी जायबंदी होऊन मालिकेतून बाद झाला. तिकडे इंग्लंडचा मायकेल व्हॉन ट्विटरवर सांगत होता की, मी आधीच सांगितलं होतं भारतीय टीम ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार-शून्यने मालिका हरणार. अशा अवस्थेत अजिंक्य रहाणेने संघाची धुरा सांभाळली. भारत टॉस हरला; पण चौथ्या दिवशी मेलबर्न कसोटी जिंकली.

अजिंक्य रहाणेने जे नेतृत्व केले ते हृदय जिंकणारे होते. संपूर्ण संघ मोकळ्या मनाने खेळताना, वावरताना दिसला. संघात दोन खेळाडू कसोटी कारकीर्दीची सुरुवात करणारे होते, त्यांना कॅप्टन राहणेने सांभाळून घेतलं. सतत डीआरएससाठी विचारणा करणाऱ्या उत्साही मोहम्मद सिराजला त्याने स्लिपमध्ये उभं राहून नीट हाताळलं. रवीचंद्रन अश्विन जो काही वर्षांपासून टीम मॅनेजमेंटद्वारे नीट हाताळल्या न गेल्याने दडपणाखाली खेळताना वावरताना दिसत होता, तो मेलबर्न कसोटीमध्ये अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मोकळेपणाने खेळताना दिसला. त्याच्या बॉलिंगमध्ये तो शार्पनेस तर जाणवलाच शिवाय

कसोटीमध्ये तो एक्स्प्रेसिव्ह दिसला. जसप्रीत बुमराहला पहिल्या इनिंगमध्ये एकदा सलग तीन मोठे शॉट्स लगावल्यावर रवी अश्विन त्याला समजावताना दिसला. असं चित्र याआधी कधी दिसलं का! पहिल्या दिवशी कसोटी क्रिकेटमध्ये आगमन करणाऱ्या मोहम्मद सिराजने अव्वल दर्जाची बॉलिंग केल्यावर पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यावर कॅप्टन रहाणेने त्याला पुढे करून त्याच्या मागून सर्व संघ मैदानाबाहेर गेला. या छोट्या गोष्टीमुळे सिराजचा आत्मविश्वास तर वाढलाच शिवाय ऑस्ट्रेलियाच्या मीडियाने देखील कॅप्टन राहणेच्या या कृतीचे कौतुक केले. संपूर्ण संघ अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली एकजूट होऊन खेळला आणि सामना जिंकला.

अजिंक्य रहाणे कॅप्टन म्हणून चांगला आहे, हे दिसत होतंच; पण एक प्रमुख कसोटी होती ती अजिंक्य रहाणे एक बॅट्समन म्हणून कसा खेळणार! जबाबदारी पडल्यावर कोणी तुटतात तर कोणी उठून उभे राहतात. अजिंक्य रहाणेने जबाबदारी घेत चौथ्या नंबरवर बॅटिंग करायला येऊन त्याने थ्रिलिंग झुंझार शतक झळकवले. जणुकाही तो स्वतःची संहिता स्वतः लिहीत होता. शतक पूर्ण केल्यावर त्याने काहीही हावभाव न दर्शवत संयतपणे शतक साजरं केलं. त्याच्या आदल्या दिवशी सकाळी रवींद्र जडेजाच्या चुकीच्या कॉलमुळे धावबाद झाला असता त्याने जडेजावर न रागावता सकारात्मक मुद्रा दर्शवली. ह्या सर्व गोष्टींमुळे अजिंक्य रहाणेने क्रिकेट रसिकांची मने जिंकली.

अर्थात त्याची परीक्षा अद्याप संपली नाही, कारण अजून दोन कसोटी बाकी आहेत.

मात्र, शांतपणे, शोशा न करता, स्टाइल न मारता, आक्रमक आहोत असं न दाखवता केवळ आपली गुणवत्ता, मेहनत आणि संयम या जोरावर जिंकता येतं हे २०२० संपता संपता अजिंक्यने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. नव्या बडबोल्या काळात अजिंक्यचं जिंकणं म्हणूनच जास्त महत्त्वाचं आहे.

( अभिजित ब्लॉगर आहे.)

abhijeetpanse.flute@gmail.com