शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कृत्रिम बुद्धिमत्ता

By admin | Updated: June 21, 2016 08:42 IST

५० वर्षांपूर्वी केवळ अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी विज्ञानाने आज सिद्ध करून दाखवल्या. माणूस म्हणून तो जे काही करतो, ते तंत्रज्ञान करू लागले.

- गजानन दिवाण

तुम्हाला माहिती आहे काही यासंदर्भात,हे वाचा..५० वर्षांपूर्वी केवळ अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी विज्ञानाने आज सिद्ध करून दाखवल्या. माणूस म्हणून तो जे काही करतो, ते तंत्रज्ञान करू लागले. काही वर्षांपर्यंत मेंदूचे काम तेवढे बाकी होते. आता तेही जवळपास केले जात आहे. वातावरण, त्यावेळच्या किंवा आधीच्या घडामोडी, परिस्थिती या साऱ्या गोष्टीचा परिणाम एकवेळ माणसाच्या मेंदूवर होऊ शकतो. या यंत्रावर तसा कुठलाही परिणाम होणार नाही. तो होईल तरी कसा?पण या यंत्रांकडे बुद्धिमत्ता आली तर? सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता याविषयावर जगभरात चिंतन सुरू आहे. सगळ्याच गोष्टी यंत्राच्या सहाय्याने होत गेल्या तर मग माणसाचा उपयोग तो काय? त्याची खरंच गरज राहील काय?विख्यात प्रोग्रामर्स, तत्वज्ञ आणि उद्योजकांना याबाबत काय वाटतं? याचा हा आढावा..........सॅम अल्तमनकृत्रिम बद्धिमत्तेचा विकास हाच अल्तमनचा अभ्यासाचा विषय आहे. काही मोजक्या लोकांना सध्या या कृत्रिम बद्धिमत्तेचा लाभ घेता येतो. तो सर्वांना मिळायला हवा, यासाठी अल्तमन झटत आहे. ३० वर्षीय कॉम्प्यूटर प्रोग्रामर असलेला अल्तमन स्टार्टअप इन्क्युबेटर वाय कॉम्बिनेटरचा अध्यक्ष आहे. या तंत्रज्ञानामुळे माणसाची बुद्धिमता काही दशकांनी पुढे नेता येईल. मात्र ते काही लोकांसाठी न राहता सर्वांनाच उपलब्ध व्हायला हवे, असे तो म्हणतो. .....निक बोस्ट्रोम आॅक्सफोर्ड फ्यूचर अ‍ॅण्ड ह्युमॅनिटी इन्स्टीट्यूटचा संचालक असलेल्या ४२ वर्षीय निकने आपल्या ‘२०१४ बुक सुपरइंटेलिजन्स’ पुस्तकात कृत्रिम बद्धिमत्तेचा मानवजातीला प्रचंड धोका असल्याचे म्हटले आहे. तो म्हणतो, ‘या बुद्धिमत्तेमुळे आर्थिक प्रगती होईल. तंत्रज्ञानदखील कुठल्या कुठे पोहचेल. मात्र त्याचा उपयोग करून घेण्यासाठी कोणी माणूस शिल्लक राहणार नाही. म्हणजेच मुलांशिवाय डिस्नेलॅण्ड असा प्रकार होईल.’.........बिल गेट्समायक्रोकॉफ्टचे सहसंस्थापक ६० वर्षीय बिल गेट्स म्हणतात, ‘सर्वत्र कमी भासणाऱ्या मजुरांची ती योग्य रिप्लेसमेंट असेल. हे तंत्रज्ञान योग्यच आहे. त्याचा वापर फक्त सकारात्मक विचारातून व्हायला हवा. आगामी काही दशकांत हे तंत्रज्ञान सर्वत्र दिसेल तेव्हा चिंताही वाढलेली असेल.’ ..........स्टीफन हॉकींगसैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ, लेखक आणि कृष्णविवर भौतिकशास्त्र प्रणेते स्टीफन यांना हा मानवी इतिहासातील सर्वात मोठा इव्हेंट असल्याचे वाटते. या माध्यमातून युद्ध, रोगराई आणि गरिबीवर मात करता येईल. यामुळे आयुष्याला एक प्रचंड गती येईल. आर्थिक बाजार, मानवी संशोधन, शस्त्रास्त्रांचा विकास समजण्यापलिकडे झालेला असेल. यातील धोके कसे टाळायचे हे जर आम्ही समजून नाही घेतले तर मानवी इतिहासातील तो शेवटचा इव्हेंट असेल, असा इशाराही ते देतात.................मिशीयो काकूबेस्टसेलर लेखक आणि सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ ६९ वर्षीय काकू यांच्या मते या हा शतकातील अडचणींचा शेवट असेल. ...............रे कर्झवेलगुगलमधील अभियांत्रिकी विभागाचे संचालक ६८ वर्षीय रे यांच्या मते २०२९पर्यंत आपण हे यश मिळविलेले असेल. रोगराई आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी याची मोठी मदत होईल. ...............इलोन मस्कटेस्टा मोटर्सचा सीईओ आणि ४४ वर्षीय उद्योजक इलोन म्हणतो, हा अनुभवातून घेतलेला सर्वात मोठा धोका असेल. प्रगतीच्या नावाखाली आपण काही वेडेपणाचे पाऊल तर उचलत नाही ना याचाही विचार करायला हवा. अर्थात याचा वापर चांगल्या हेतूतूनच व्हायला हवा. ............