शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

जंगलातला सुगंध

By admin | Updated: March 23, 2017 09:22 IST

अगरबत्ती यंत्र आणि महिलांना स्वयंनिर्भर होण्याची संधी

 आदिवासींच्या चरितार्थात बांबूचा वाटा खूप मोठा. या बांबूनं आदिवासी बांधवांच्या आयुष्यात थोडीफार स्थिरताच आणली नाही, तर त्यांच्या पोटापाण्याचाही तो प्रमुख आधार ठरला. वर्षानुवर्षांपासून या बांबूनंच त्यांना तारलं आहे. आजही बांबूनंच त्यांचं ‘पालकत्व’ घेतलं आहे.बांबूपासून टोपल्या विणणं, कलाकुसरीच्या वस्तू बनवणं, बांबूच्या काड्यांपासून अगरबत्त्या तयार करणं.. यांसारख्या छोट्या-मोठ्या कामांतून आपल्या पोटाची खळगी ते भरतात. मात्र यातलं कुठलंही काम करण्यासाठी त्यांना हातातल्या सुरी, कोयता किंवा चाकूसारख्या धारदार हत्यारावर आणि आपल्या शारीरिक श्रमांच्या क्षमतेवर अवलंबून राहावं लागतं.सुरी, कोयत्यानंच बांबू तासणं, त्याच्या लांबच लांब कामट्या काढणं आणि मग हव्या त्या आकारात त्यांचे तुकडे करणं, या साऱ्या कामांत नुसते शारीरिक श्रमच नाहीत, तर धोकाही खूप मोठा आहे.सुरी, कोयते वापरताना थोडं जरी दुर्लक्ष झालं तरी त्यामुळे हात, बोटं कापलं जाणं, जखमी होण्याचे प्रकारही नित्याचे आहेत. हातावर पोट असणाऱ्यांची रोजीरोटीही त्यामुळे बऱ्याचदा हिरावली गेली आहे.बांबूपासून अगरबत्त्या किंवा त्यासाठीचा कच्चा माल, म्हणजे कामट्या, काड्या तयार करण्याचा उद्योग आदिवासी, ग्रामीण भागात खूप मोठ्या प्रमाणावर चालतो. विशेषत: घरातला महिला वर्ग आणि थोड्या कळत्या वयातल्या मुलांचा तर यात खूपच मोठा हातभार आहे. रोजचा घरखर्च चालवण्यात आणि त्याचबरोबर महिलांना स्वयंनिर्भर बनवण्यात या उद्योगाचं योगदान आदिवासी भागासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. मात्र बांबू आणण्यापासून ते अगरबत्ती, इतर वस्तू तयार करण्यापर्यंतचे कष्ट अपरंपार आहेत. आदिवासी लोकांचे हे कष्ट कमी करण्यासाठी एका तरुणानं पुढाकार घेतला.त्याचं नाव परेश पांचाल.गुजरातेतल्या अहमदाबादचा हा तरुण. अगरबत्त्यांची मशीन्स तयार करण्याचा त्यांचा पिढीजात उद्योग आहे. या व्यवसायात त्यांनी चांगलं नावही कमावलं आहे. अर्थात, या उद्योगातही आता मोठ्या प्रमाणात आधुनिकीकरणही झालेलं आहे. सेमी अ‍ॅटोमॅटिक मशीनपासून ते फुल्ल अ‍ॅटोमॅटिक मशीनपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत, पण अशा यंत्रांची किंमत जास्त आणि विजेची गरजही मोठी.फावल्या वेळात हे काम करणाऱ्या गरीब आदिवासी महिलांसाठी यातला कोणताच पर्याय परवडणारा नाही. आणि घरातल्या घरात, हातावर काम करणाऱ्या या कुटुंबांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणंही शक्य नाही. अगरबत्त्यांसाठी मशीन्स तयार करण्याचा घरचा उद्योग होताच. परेशनं मग आणखी अभ्यास केला. आदिवासी, ग्रामीण भागातल्या अडचणी जाणून घेतल्या. विजेची उपलब्धता ही तिथली आणखी एक प्रमुख अडचण. परेशनं या साऱ्या गोष्टी विचारात घेतल्या आणि साधी, सोपी, घरच्या घरी चालवता येऊ शकतील, कमी जागेत बसू शकतील अशी सुटसुटीत काही यंत्रं तयार केली. या यंत्रांचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ही यंत्रं असली तरीहीदेखील हातानंच चालवावी लागतात. विजेची किंवा कोणत्याही ऊर्जेची गरज या यंत्रांना लागत नाही.या यंत्रांत बांबू टाकल्यावर आपल्याला पाहिजे त्या आकाराच्या, जाडीच्या आणि लांबीच्या कामट्या या यंत्रांतून तयार होऊ शकतात. बांबूच्या ठरावीक जाडीच्या कामट्या अगोदर तयार करायच्या आणि नंतर त्याच मशीनच्या साहाय्याने नेमक्या उंचीच्या काड्या तयार करायच्या! यामुळे आदिवासींचे श्रम खूप मोठ्या प्रमाणात वाचले, त्यात अधिक कौशल्यही आले. तयार झालेल्या या काड्या ‘अगरबत्ती रोलिंग मशीन’मध्ये टाकायच्या. त्यातला अगरबत्ती मसाला आपोआप त्या काड्यांना लागतो. झाली सुगंधित अगरबत्ती तयार!आदिवासींच्या जीवनात परिवर्तन घडवू शकणाऱ्या या अगरबत्ती यंत्रांच्या संशोधनासाठीच परेशला गौरविण्यात आलं.