शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Car Blast: अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध EDची कारवाई, ओखला-जामिया नगरसह २५ ठिकाणी छापे
2
Mumbai: अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, डॉक्टरांकडून ५ लाखांत विकण्याचा प्रयत्न, ५ जणांवर गुन्हा दाखल
3
दोन PAN Card ठेवल्यास ₹१०,००० दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा; 'या' सोप्या पद्धतीने सरेंडर करा दुसरे कार्ड!
4
नवी मुंबईत शिवरायांचा पुतळा पुन्हा झाकला; नुकतेच अमित ठाकरेंनी आंदोलन करत केले होते अनावरण
5
शेअर बाजारातील 'जॅकपॉट' स्टॉक्स : १० महिन्यांत ₹१०००० चे झाले ₹५ लाख; पैशांचा वर्षाव करताहेत ‘हे’ ४ स्टॅाक
6
श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
7
Mumbai: मुंबईत कांदा स्वस्त होणार की महागणार? पावसामुळे मोठे नुकसान; उत्पादनाचा अंदाज येईना
8
धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
9
Mumbai: शाळेच्या कॅन्टीनमधील समोसा खाल्ल्याने २० विद्यार्थ्यांना विषबाधा, तेलात कापूर पडल्याची माहिती
10
Stock Market: उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण! सेन्सेक्स १९५ अंकांनी घसरला; Nifty २६०००० च्या खाली, 'या' स्टॉक्सवर नजर
11
Mumbai: घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील भ्रष्ट कारभाराची चौकशी सुरू; आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप
12
सुनेसोबत अनैतिक संबंध, मुलाला मार्गातून हटवण्यासाठी बाप झाला हैवान, मग रचलं असं नाटक
13
"बिहारच्या निकालानंतर काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलाच असेल तर..."; उद्धवसेनेचे शालजोडे
14
दिल्लीतील स्फोटापूर्वी रेकॉर्ड केलेला डॉ. उमरचा व्हिडिओ आला समोर; 'सुसाइड बॉम्बर'चा उल्लेख
15
सारा तेंडुलकर काशी विश्वनाथ मंदिरात, भक्तीभावाने झाली नतमस्तक, साधेपणाने जिंकलं मन, PHOTOS
16
झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी
17
आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी
18
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येण्याआधी मंत्री जयशंकर मॉस्कोत, काय झाली चर्चा?
19
Raigad: रायगडमधील १० नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झुंबड!
20
Mumbai: दहिसर-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर सुपरवायझरचा मृत्यू; कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड!
Daily Top 2Weekly Top 5

तरुण मुलं बेजबाबदार आहेत का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 18:06 IST

आपल्या कपडय़ांची इस्री मोडायला नको म्हणून घरकामात अंग चोरणारी, जिममध्ये घाम गाळणारी आईवडिलांना कामात मदतच न करणारी तरुण मुलं बेजबाबदार आहेत का?

ठळक मुद्देही तरुण मुलं ‘आळशी’ झालेली आहेत का? 

- विकास बांबल

जिममध्ये मरेस्तोवर घाम गाळतात आणि घरकामात अंग चोरतात. हे असं ऐकलंय का तुम्ही? म्हणजे असा शेरा, राग वडीलधार्‍यांच्या तोंडून निघतोच आताशा! आज आपली पिढी तब्येतीबाबत  सजग झालेली दिसून येते. ती चांगलीच गोष्ट आहे. अगदी खेडय़ातील मुलंमुलीसुद्धा हल्ली राहणीमानाच्या बाबतीत चोखंदळ झालेली आहेत. छान दिसणं, नीटनेटकं राहणं हे चांगलंच आहे आणि प्रत्येकानं तसं असावंदेखील; परंतु या राहणीमानाच्या चोखंदळपणात आपली कर्तव्य, जबाबदार्‍या यांचा विसर पडता कामा नये.छानछोकी आणि मोबाइल यात तरुण मुलंमुली असे गुरफटू लागलेत की त्यांना आईच्या कंबरेवरचा पाण्याचा हंडा किंवा वडिलांच्या हातातील पिठाचा डबापण दिसत नाही.असं होतंय का?घरकाम करणं, आईवडिलांसोबत राबणं आपल्याला कमीपणाचं वाटतं का? घरात इकडची काडी तिकडे न करणं हे योग्य आहे का?एकीकडे आईवडील रक्ताचं पाणी करून, हाल अपेष्टा सहन करून, उसनवार पैसे घेऊन मुलांमुलींचं शिक्षण पूर्ण करतात. आपली जिंदगी बर्बाद झाली; पण आपल्या मुलांची व्हायला नको म्हणून माझी मुलं शिकली पाहिजेत असा हट्ट करतात. मला जे नाही मिळालं ते सर्व मी माझ्या  मुलांना मिळावं म्हणून राबतात; पण बर्‍याच मुलांना याची जाणीवच नसते.काहीजण तर स्वच्छ सांगतात,   ‘मायबापाचं ते कर्तव्यच असतं, असं काय मोठं केलं!’ मात्र त्यांच्याकडून अपेक्षा ठेवताना आपली कर्तव्य आपण विसरतोय का, याचा विचार कुणी करायचा? काही मुलं तर बापाला नुसता भाजीवरील भाकर समजतात. चारचौघात बसलेले असले की बापाच्या नावाने एकमेकांना हाक मारतील, चेष्टा करतील. कट्टय़ावर तर बाप हा वाटेल तसा छळला जातो, हातावर तंबाखू मळावा तसा चोळला जातो, मळला जातो.कालपरवा मी कार्यालयीन कामानिमित्त बाहेरगावी गेलो होतो. जातांना वाटेत एक आलिशान जीम दिसलं. मुलं व्यायाम करत होती. सायंकाळी जेव्हा घरी आलो तेव्हा  त्याच भागातल्या स्त्रिया हातपंपावरून पाणी भरताना दिसल्या. त्यांची मुलं समोरच्याच मैदानात खेळत होती. कुणी चौकात गप्पागोष्टी करत होती.आपल्या कपडय़ांची इस्री मोडायला नको म्हणून घर कामात थोडाही हातभार न लावणारी, ही तरुण मुलं ‘आळशी’ झालेली आहेत का? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत म्हणतात,

असेल कुस्तीमाजी बरवा परि जो प्रसंगी कामी न यावा तो मल्ल म्हणोनि गौरवावा कोणत्या न्याये ?? 

कपडय़ास न पडावी वळी 7म्हणोनि दुरूनीच सांभाळी कामे करिती माणसे सगळी 7परी तो जागचा हालेना 

हाते घेवोनि दंड मारणे त्याहुनि उत्तम पाणी ओढने दळणे, फोडणे, जमीन खोदणेआरोग्यदायी..

हे सारं तरुण मुलांना खरंच कळत नसेल का?