शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
4
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
5
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
6
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
7
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
8
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
9
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
10
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
11
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
12
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
13
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
14
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
15
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
16
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
17
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
18
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
19
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
20
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी

तरुण मुलं बेजबाबदार आहेत का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 18:06 IST

आपल्या कपडय़ांची इस्री मोडायला नको म्हणून घरकामात अंग चोरणारी, जिममध्ये घाम गाळणारी आईवडिलांना कामात मदतच न करणारी तरुण मुलं बेजबाबदार आहेत का?

ठळक मुद्देही तरुण मुलं ‘आळशी’ झालेली आहेत का? 

- विकास बांबल

जिममध्ये मरेस्तोवर घाम गाळतात आणि घरकामात अंग चोरतात. हे असं ऐकलंय का तुम्ही? म्हणजे असा शेरा, राग वडीलधार्‍यांच्या तोंडून निघतोच आताशा! आज आपली पिढी तब्येतीबाबत  सजग झालेली दिसून येते. ती चांगलीच गोष्ट आहे. अगदी खेडय़ातील मुलंमुलीसुद्धा हल्ली राहणीमानाच्या बाबतीत चोखंदळ झालेली आहेत. छान दिसणं, नीटनेटकं राहणं हे चांगलंच आहे आणि प्रत्येकानं तसं असावंदेखील; परंतु या राहणीमानाच्या चोखंदळपणात आपली कर्तव्य, जबाबदार्‍या यांचा विसर पडता कामा नये.छानछोकी आणि मोबाइल यात तरुण मुलंमुली असे गुरफटू लागलेत की त्यांना आईच्या कंबरेवरचा पाण्याचा हंडा किंवा वडिलांच्या हातातील पिठाचा डबापण दिसत नाही.असं होतंय का?घरकाम करणं, आईवडिलांसोबत राबणं आपल्याला कमीपणाचं वाटतं का? घरात इकडची काडी तिकडे न करणं हे योग्य आहे का?एकीकडे आईवडील रक्ताचं पाणी करून, हाल अपेष्टा सहन करून, उसनवार पैसे घेऊन मुलांमुलींचं शिक्षण पूर्ण करतात. आपली जिंदगी बर्बाद झाली; पण आपल्या मुलांची व्हायला नको म्हणून माझी मुलं शिकली पाहिजेत असा हट्ट करतात. मला जे नाही मिळालं ते सर्व मी माझ्या  मुलांना मिळावं म्हणून राबतात; पण बर्‍याच मुलांना याची जाणीवच नसते.काहीजण तर स्वच्छ सांगतात,   ‘मायबापाचं ते कर्तव्यच असतं, असं काय मोठं केलं!’ मात्र त्यांच्याकडून अपेक्षा ठेवताना आपली कर्तव्य आपण विसरतोय का, याचा विचार कुणी करायचा? काही मुलं तर बापाला नुसता भाजीवरील भाकर समजतात. चारचौघात बसलेले असले की बापाच्या नावाने एकमेकांना हाक मारतील, चेष्टा करतील. कट्टय़ावर तर बाप हा वाटेल तसा छळला जातो, हातावर तंबाखू मळावा तसा चोळला जातो, मळला जातो.कालपरवा मी कार्यालयीन कामानिमित्त बाहेरगावी गेलो होतो. जातांना वाटेत एक आलिशान जीम दिसलं. मुलं व्यायाम करत होती. सायंकाळी जेव्हा घरी आलो तेव्हा  त्याच भागातल्या स्त्रिया हातपंपावरून पाणी भरताना दिसल्या. त्यांची मुलं समोरच्याच मैदानात खेळत होती. कुणी चौकात गप्पागोष्टी करत होती.आपल्या कपडय़ांची इस्री मोडायला नको म्हणून घर कामात थोडाही हातभार न लावणारी, ही तरुण मुलं ‘आळशी’ झालेली आहेत का? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत म्हणतात,

असेल कुस्तीमाजी बरवा परि जो प्रसंगी कामी न यावा तो मल्ल म्हणोनि गौरवावा कोणत्या न्याये ?? 

कपडय़ास न पडावी वळी 7म्हणोनि दुरूनीच सांभाळी कामे करिती माणसे सगळी 7परी तो जागचा हालेना 

हाते घेवोनि दंड मारणे त्याहुनि उत्तम पाणी ओढने दळणे, फोडणे, जमीन खोदणेआरोग्यदायी..

हे सारं तरुण मुलांना खरंच कळत नसेल का?