शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

खरंच आपण सोशल आहोत?

By admin | Updated: September 11, 2014 17:21 IST

हाय फ्रेण्डस. जरा शांत शांत वाटतंय ना, दहा दिवस चाललेला कल्लोळ संपला

हाय फ्रेण्डस. जरा शांत शांत वाटतंय ना, दहा दिवस चाललेला कल्लोळ संपला, डीजे थंडावले.
आता पंधरा दिवस कानांना विश्रांती, मग आहेच पुन्हा दांडियाचा जल्लोष!
ह्या जल्लोषाच्या धामधुमीत एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेलच, आपण सगळ्यांनीच आपल्या घरच्या डेकोरेशनपासून ते मोदकांपर्यंत आणि  गणपतीसह स्वत:च्या फोटोपासून ते मिरवणूकीत नाचण्यापर्यंत सगळे फोटो काढकाढून आपल्या मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअँपवर टाकले, फेसबूकवर पोस्ट केले.
लाईक-कमेण्टांचा नुस्ता पाऊस पडला. स्वत:चं कौतूक करुन घेण्यासाठी अनेकजणांनी सोशल मीडीयाचा पुरेपूर वापर करुन घेतला.
पण हे करताना तुमच्या एक गोष्ट कदाचित लक्षातही आली नसेल की, सोशल मीडीया ही सोशल शेअरिंगची गोष्ट आहे, पर्सनल शेअरिंगची नाही! म्हणजे काय तर, आपल्याला जाहीरपणे जे लिहावं, बोलावंसं वाटतं त्याच्यासाठी असतो हा सोशल मीडीया. मला सर्दी झालीये आणि मी पावसात भजी खातोय हे सारं सांगत बसायला नाही. कुणी म्हणेल का नाही?
आम्हाला वाटलं ते आम्ही करू, आमचा हक्कच आहे.
आता ही अशी हक्कांची भाषा असेल तर पुढे काय बोलणार?
पण ज्यांना वाटतं की, ही माध्यमं ‘सोशल’ आहेत, ‘मी-मला ’ अशी स्वत:चीच आरती गाणारी चर्चा न करता काहीतरी सामाजिक उपक्रम इथे प्लॅन करता येऊ शकतो, समविचारी माणसं एकत्र येऊ शकतात, सामाजिक प्रश्नांवर चर्चा होऊ शकते. आपल्या मतापेक्षा वेगळी मतं, वेगळ्या बाजू, वेगळ्या पद्धतीची मांडणी समजू शकते. पण हे सारं केव्हा होऊ शकतं?
जेव्हा आपण सोशल मीडीयाचा वापर योग्य पद्धतीने करायला शिकू तेव्हा.
पण तो कसा करायचा?
मुळात सोशल मीडीया वापराचाच विचार कसा करायचा. हेच  सांगणारी एक विशेष चर्चा या अंकात.
आपण जर एकाचवेळी अनेक माणसांशी शेअर करु शकतो, कनेक्ट होऊ शकतो.
तर ते जास्त अर्थपूर्ण, अधिक आनंददायी कसं होईल. ह्याच विषयावरचा संवाद आजच्या अंकात.
वाचून नक्की कळवा.
काय वाटलं तुम्हाला?
पटलं की? आहेत काही वादाचे मुद्दे.?