शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

तुम्ही आळशी आहात की बेजबाबदार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 14:51 IST

आपण ज्या संगणकावर काम करतो, त्यावर साचलेली धूळही अनेकजण पुसत नाहीत, यातून काय दिसतं?

ठळक मुद्देआपल्या कामाकडे पाहण्याची ही नजर आपलं करिअर घडवू शकते.

- विकास बांबल 

मार्चचा शेवटचा आठवडा. टार्गेट डोक्यावर. बरंच बाकी.रोजच्या पेक्षा थोडं सकाळी लवकर निघायचं होतं.म्हणून ड्रायव्हरला सांगितलं उद्या सकाळी 6 वाजताच या म्हणजे लवकर निघता येईल.सकाळी सांगितल्याप्रमाणे गाडी तयार होती.गाडीत बसलो प्रवास सुरू झाला आणि त्याचबरोबर आमचा संवाददेखील सुरू झाला.मी- गाडी सकाळीच पुसून तयार केली वाटते.तो- हो साहेब. तरी आज लवकर लवकर कपडा मारला. मनासारखी पुसता आली नाही.मी- अरे नाही खरंच नेहमीच गाडी स्वच्छ असते तुझी.तो- साहेब ठेवावीच लागते. तिच्या भरवशावर रोजीरोटी आहे. त्यामुळे माझ्यापेक्षा तिची जास्त काळजी घ्यावी लागते. आमच्या कुटुंबाचा गाडा ही गाडीच तर हाकते. हिच्याच भरवशावर आहे..तो बोलत होता आणि त्याचे शब्द आता पुसट पुसट ऐकू येऊन विरून गेले. मी कुठं हरवलो काय माहिती.ते शब्द सारखे पुन्हा पुन्हा माझ्या कानावर येत होते.‘साहेब, या गाडीच्या भरवशावरच तर जीवन आहे, हिची काळजी मी स्वतर्‍पेक्षाही जास्त घेतो.’मीसुद्धा नोकरी करतो. माझं जीवनदेखील मी ज्या कंपनीत काम करतो तिच्या अस्तित्वावर, त्या कामावरच अवलंबून आहे.जेवढी ड्रायव्हर त्याच्या गाडीची काळजी घेतो, तेवढी काळजी मी घेतो का माझ्या कंपनीची. अर्थातच नाही.ड्रायव्हरला सकाळी बोलावलं हजर, रात्री उशीर होतो तरी तोंडातून साधा ब्रदेखील नाही. आणि मला सुटीच्या दिवशी कामाला बोलावलं की मी लगेच कुरकुर करतो.बोलून दाखवत नाही; पण मनात कुठेतरी दुर्‍ख असतं की आज सुटीच्या दिवशीदेखील बोलावलं.केवढा मोठा फरक आमच्या दोघांत होता. आपल्या कामावर, आपण जिथं काम करतो त्या संस्थेवर आपण जिवापाड प्रेम करतो का? आज सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे मोठय़ा प्रमाणावर खासगीकरण होत आहे. नुकतीच भारतीय दूरसंचार निगम कंपनीची बातमी वाचली ज्यात ती कंपनी आर्थिक दुष्काळात सापडली. कर्मचार्‍यांचे पगार देण्याची ताकदही आता कंपनीची राहिली नाही हे आपण वाचलं.नवीन जागांची भरती तर दूरच उलट आहेत  त्या सरकारी नोकर्‍या कमी होत आहेत. उद्या माझ्या कंपनीवरदेखील ही परिस्थिती ओढावू शकते तर त्या परिस्थितीला किमान मी तरी जबाबदार राहू नये एवढी तरी काळजी मी घ्यायला हवी.प्रश्न हा आहे की ती मी घेतो का?आज या कंपनीमुळे समाजात मला वेगळं स्थान आहे, या नोकरीने मला मान, सन्मान आर्थिक स्थैर्य, उज्ज्वल भविष्य दिलं,त्याबदल्यात मी माझे शंभर टक्के देतो का?हे प्रश्न आपणच आपल्याला विचारले पाहिजेत.माझ्या वडिलांनी मला सांगितलेली एक गोष्ट आठवली, मनुष्य जेवढा त्याच्या हक्काबद्दल जागरूक असतो तेवढाच तो आपला कर्तव्याविषयी असला तर त्याला हक्क मागण्यासाठी ओरड करावी लागत नसती.एक घटना आठवतेय. एकदा मी वैयक्तिक कामानिमित्त एका सरकारी ऑफिसमध्ये गेलो असता, संगणकावर धूळ साचलेली होती, ज्या संगणकावर आपण रोज काम करतो ती संगणकसुद्धा स्वच्छ, व्यवस्थित ठेवू नये एवढी उदासीनता कर्मचारी यांची का असावी?एखाद्या ठिकाणी मला माझ्या कंपनीचे चार पैसे वाचवता येत असेल तर का वाचवू नयेत? उलट आपल्या घरचं काय जातं, आपण कशाला करा या वृत्तीचंच दर्शन जास्त घडतं. गाडी जसा ड्रायव्हर स्वच्छ ठेवतो, तिला जपतो तसा मी माझ्या कंपनीच्या प्रतिमेला जपतो का? माझ्यामुळे कंपनीचे नाव खराब होणार नाही याची काळजी मी घेतो का?आपल्याच ऑफिसच्या भिंतींवर पान-गुटखा खाऊन पिचकार्‍या मारणारे दिसतात, त्यांना काय म्हणावे?कार्यालय सोडण्यापूर्वी जाताना दिवे, पंखे, संगणक, सर्व ऊर्जेची उपकरणे व्यवस्थित बंद करून जाणं ही कुणाची जबाबदारी? आपली नव्हे का? की तेवढय़ासाठी शिपायाची वाट पाहायची?जवळ जवळ अर्धा तास मी विचार करत होतो.तेवढय़ात साहेब ऑफिस आलंय, या आवाजानं माझी विचारांची तंद्री तुटली.आणि मी गाडीतून उतरलो.पण त्यादिवशी ड्रायव्हरने बरंच काही शिकवलं होतं. आपल्या कामाकडे पाहण्याची ही नजर आपलं करिअर घडवू शकते, आपल्याला समाधान आणि आनंद देते, हे लक्षात ठेवलं तरी बदल घडेल!