शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

तुम्ही आळशी आहात की बेजबाबदार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 14:51 IST

आपण ज्या संगणकावर काम करतो, त्यावर साचलेली धूळही अनेकजण पुसत नाहीत, यातून काय दिसतं?

ठळक मुद्देआपल्या कामाकडे पाहण्याची ही नजर आपलं करिअर घडवू शकते.

- विकास बांबल 

मार्चचा शेवटचा आठवडा. टार्गेट डोक्यावर. बरंच बाकी.रोजच्या पेक्षा थोडं सकाळी लवकर निघायचं होतं.म्हणून ड्रायव्हरला सांगितलं उद्या सकाळी 6 वाजताच या म्हणजे लवकर निघता येईल.सकाळी सांगितल्याप्रमाणे गाडी तयार होती.गाडीत बसलो प्रवास सुरू झाला आणि त्याचबरोबर आमचा संवाददेखील सुरू झाला.मी- गाडी सकाळीच पुसून तयार केली वाटते.तो- हो साहेब. तरी आज लवकर लवकर कपडा मारला. मनासारखी पुसता आली नाही.मी- अरे नाही खरंच नेहमीच गाडी स्वच्छ असते तुझी.तो- साहेब ठेवावीच लागते. तिच्या भरवशावर रोजीरोटी आहे. त्यामुळे माझ्यापेक्षा तिची जास्त काळजी घ्यावी लागते. आमच्या कुटुंबाचा गाडा ही गाडीच तर हाकते. हिच्याच भरवशावर आहे..तो बोलत होता आणि त्याचे शब्द आता पुसट पुसट ऐकू येऊन विरून गेले. मी कुठं हरवलो काय माहिती.ते शब्द सारखे पुन्हा पुन्हा माझ्या कानावर येत होते.‘साहेब, या गाडीच्या भरवशावरच तर जीवन आहे, हिची काळजी मी स्वतर्‍पेक्षाही जास्त घेतो.’मीसुद्धा नोकरी करतो. माझं जीवनदेखील मी ज्या कंपनीत काम करतो तिच्या अस्तित्वावर, त्या कामावरच अवलंबून आहे.जेवढी ड्रायव्हर त्याच्या गाडीची काळजी घेतो, तेवढी काळजी मी घेतो का माझ्या कंपनीची. अर्थातच नाही.ड्रायव्हरला सकाळी बोलावलं हजर, रात्री उशीर होतो तरी तोंडातून साधा ब्रदेखील नाही. आणि मला सुटीच्या दिवशी कामाला बोलावलं की मी लगेच कुरकुर करतो.बोलून दाखवत नाही; पण मनात कुठेतरी दुर्‍ख असतं की आज सुटीच्या दिवशीदेखील बोलावलं.केवढा मोठा फरक आमच्या दोघांत होता. आपल्या कामावर, आपण जिथं काम करतो त्या संस्थेवर आपण जिवापाड प्रेम करतो का? आज सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे मोठय़ा प्रमाणावर खासगीकरण होत आहे. नुकतीच भारतीय दूरसंचार निगम कंपनीची बातमी वाचली ज्यात ती कंपनी आर्थिक दुष्काळात सापडली. कर्मचार्‍यांचे पगार देण्याची ताकदही आता कंपनीची राहिली नाही हे आपण वाचलं.नवीन जागांची भरती तर दूरच उलट आहेत  त्या सरकारी नोकर्‍या कमी होत आहेत. उद्या माझ्या कंपनीवरदेखील ही परिस्थिती ओढावू शकते तर त्या परिस्थितीला किमान मी तरी जबाबदार राहू नये एवढी तरी काळजी मी घ्यायला हवी.प्रश्न हा आहे की ती मी घेतो का?आज या कंपनीमुळे समाजात मला वेगळं स्थान आहे, या नोकरीने मला मान, सन्मान आर्थिक स्थैर्य, उज्ज्वल भविष्य दिलं,त्याबदल्यात मी माझे शंभर टक्के देतो का?हे प्रश्न आपणच आपल्याला विचारले पाहिजेत.माझ्या वडिलांनी मला सांगितलेली एक गोष्ट आठवली, मनुष्य जेवढा त्याच्या हक्काबद्दल जागरूक असतो तेवढाच तो आपला कर्तव्याविषयी असला तर त्याला हक्क मागण्यासाठी ओरड करावी लागत नसती.एक घटना आठवतेय. एकदा मी वैयक्तिक कामानिमित्त एका सरकारी ऑफिसमध्ये गेलो असता, संगणकावर धूळ साचलेली होती, ज्या संगणकावर आपण रोज काम करतो ती संगणकसुद्धा स्वच्छ, व्यवस्थित ठेवू नये एवढी उदासीनता कर्मचारी यांची का असावी?एखाद्या ठिकाणी मला माझ्या कंपनीचे चार पैसे वाचवता येत असेल तर का वाचवू नयेत? उलट आपल्या घरचं काय जातं, आपण कशाला करा या वृत्तीचंच दर्शन जास्त घडतं. गाडी जसा ड्रायव्हर स्वच्छ ठेवतो, तिला जपतो तसा मी माझ्या कंपनीच्या प्रतिमेला जपतो का? माझ्यामुळे कंपनीचे नाव खराब होणार नाही याची काळजी मी घेतो का?आपल्याच ऑफिसच्या भिंतींवर पान-गुटखा खाऊन पिचकार्‍या मारणारे दिसतात, त्यांना काय म्हणावे?कार्यालय सोडण्यापूर्वी जाताना दिवे, पंखे, संगणक, सर्व ऊर्जेची उपकरणे व्यवस्थित बंद करून जाणं ही कुणाची जबाबदारी? आपली नव्हे का? की तेवढय़ासाठी शिपायाची वाट पाहायची?जवळ जवळ अर्धा तास मी विचार करत होतो.तेवढय़ात साहेब ऑफिस आलंय, या आवाजानं माझी विचारांची तंद्री तुटली.आणि मी गाडीतून उतरलो.पण त्यादिवशी ड्रायव्हरने बरंच काही शिकवलं होतं. आपल्या कामाकडे पाहण्याची ही नजर आपलं करिअर घडवू शकते, आपल्याला समाधान आणि आनंद देते, हे लक्षात ठेवलं तरी बदल घडेल!