शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

दारू, दारूबंदी  आणि काही फॅक्टस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 08:00 IST

दारू पिणं आम आहे, कशाला हवी दारूबंदी असं वाटणाऱ्या तरुण दोस्तांसाठी काही फॅक्ट्स.

- अमृत बंग

दिवाळी, तरुण मुलं, सेलिब्रेशन, पार्टी, सोशल ड्रिंक्स याची चर्चा एकीकडे आणि गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी कायम राहावी म्हणून तरुणांसह स्थानिकांचं आंदोलन दुसरीकडे. निव्वळ वैयक्तिक मतांच्या पलीकडे जाऊन सुशिक्षित वाचकाला विशेषत: तरुणांना दारूप्रश्नाकडे पाहण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन मिळावा म्हणून हा लेख.

 

अ) दारूविषयीचे वैज्ञानिक तथ्य-

१. ‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसिजेस’ हा जगातील सर्वात मोठा पब्लिक हेल्थ अभ्यास सांगतो की मृत्यू व रोग निर्माण करणाऱ्या सर्वात प्रमुख ७ कारणांमध्ये दारू व तंबाखूचा समावेश होतो. जगभरात दरवर्षी दारूमुळे ३३ लाख लोक मृत्यूमुखी पडतात.

 

२. जागतिक आरोग्य संघटनेनुसार भारतातील मद्यपी हे सर्वात जास्त समस्याप्रधान आहेत.

३. ‘लॅन्सेट’ हे वैद्यकीय क्षेत्रातील सर्वाधिक प्रतिष्ठित जर्नल असं म्हणतं की भारतातील २० टक्केपेक्षाही जास्त रुग्णभरती व दवाखान्यात भरती होणाऱ्या ६० टक्के आपात्कालीन दुर्घटना दारूमुळे होतात.

४. ‘लॅन्सेट’मधील अहवाल हेदेखील सांगतो की दारूचे दुष्परिणाम हे गरीब व उपेक्षित घटकांवर जास्त होतात. अर्थात दारू ही आर्थिक विषमता वाढवण्याचे काम करते. दारूचे वाईट परिणाम हे पिणाऱ्यापुरते मर्यादित न राहाता स्रियांवरील अत्याचार, गरिबी वाढणे, वाहतूक दुर्घटना व उत्पादकतेचे नुकसान अशा स्वरुपात व्यापक समाजावरदेखील होतात.

त्यामुळे दारू व तंबाखू हे निव्वळ ‘प्लेझर गुड्स’ नाहीत तर ‘आधुनिक कॉलरा व प्लेग’ आहेत हे वैज्ञानिक सत्य आपण समजून घेतलं पाहिजे.

ब) दारू कंपन्यांचे प्रचारतंत्र :

हे सत्य आपल्यापर्यंत पोहोचू नये म्हणून दारू कंपन्या जिवापाड प्रयत्न करतात. दारूचे दुष्परिणाम ही जणू व्यक्तिगत जबाबदारी आहे असं भासवून त्या स्वतः नामनिराळ्या राहातात व अनेक चुकीच्या गोष्टींचा मोठ्या प्रमाणात प्रचार करतात.

१. दारू पिणे ही अत्यंत सामान्य गोष्ट आहे व एक समकालीन सामाजिक रीत आहे हा गैरसमज पद्धतशीरपणे पसरवला जातो. खरं तर, जगभरात अर्ध्याहून अधिक प्रौढ हे मद्यपान करत नाहीत. त्यामुळे दारू पिणे ही सामान्य गोष्ट आहे हा प्रचार खोटा आहे.

२. दारू कंपन्या असादेखील प्रचार करतात की बहुतांश लोक हे जबाबदारीने मद्यपान करतात व खूप कमी लोक मद्यसेवन ‘हॅंडल’ न झाल्याने दुष्परिणामांना सामोरे जातात. काही मोजक्या लोकांसाठी त्यांच्या ‘दारू पिण्याच्या स्वातंत्र्यावर(?)’ गदा येऊ देणं हे चुकीचं आहे. मात्र ‘लॅन्सेट’मधील अहवाल मात्र हे सांगतो की भारतातील अर्ध्याहून अधिक मद्यपी हे ‘घातक / हझार्डस ड्रिंकिंग’ या गटात मोडतात. त्यामुळे ही फक्त काही निवडक ‘कमकुवत’ लोकांची समस्या आहे, हा प्रचार खोटा आहे.तरुणांनी तर याला मुळीच बळी पडू नये.

३.‘ड्रग अँड अल्कोहोल रिव्ह्यू’ या दारू आणि तंबाखू विषयाला समर्पित जर्नलमधील १० देशांत झालेला एक अभ्यास सांगतो की अर्ध्याहून अधिक दारू ही ‘Harmful Drinking Occasions’ म्हणजे ‘धोकादायक पिण्याचे प्रसंग’ (उदा. ३१ डिसेंबरला खूप पिऊन झिंगणे वा टल्ली होणे) यात प्यायली जाते व अशा प्रसंगांना प्यायल्या जाणाऱ्या अवैध / घरगुती दारूचे प्रमाण हे वैध दारूच्या तुलनेत सांख्यिकीदृष्ट्या लक्षणीयरीत्या कमी आहे.

 

क) दारूबंदी प्रभावी आहे का?

 

१. अमेरिकन इकॉनॉमिक रिव्ह्यू या प्रतिष्ठित जर्नलमध्ये हारवर्ड, पेन्सिल्वेनिया विद्यापीठ व जागतिक बँकेच्या तज्ज्ञांनी भारतातील विविध राज्यांतील दारूबंदीचा अभ्यास प्रकाशित केला आहे. या अभ्यासातून असं दिसतं की दारूबंदीमुळे मद्यसेवन हे ४० टक्के कमी झाले व स्रियांवरील अत्याचार ५०टक्के कमी झाले.

२. आज महाराष्ट्रात (लोकसंख्या १२ कोटी) वर्षाला अंदाजे ५० हजार कोटी रुपयांची वैध दारू खपते. हेच प्रमाण गडचिरोलीला लावल्यास १२ लाख लोकसंख्येमागे दारूबंदी नसताना ५०० कोटी रुपयांची मद्यविक्री व्हायला हवी होती; परंतु २०२० मध्ये गडचिरोलीच्या जिल्हावार शास्रीय सर्व्हेमध्ये असे आढळले की जिल्ह्यात वर्षाला ६४ कोटी रुपयांची दारू खपते. म्हणजे दारूबंदीमुळे ५०० कोटींऐवजी केवळ ६४ कोटींची दारू खपते. दारूबंदीमुळे दारूचा खप ८७% कमी झाला. अशा स्थितीत गडचिरोलीची दारूबंदी अयशस्वी आहे असे कसे म्हणता येईल?

विकासाचा मुक्तिपथ हा मुक्त दारू नसून दारूमुक्ती हा आहे.

 

 

(लेखक गडचिरोलीस्थित निर्माण प्रकल्पाचे संचालक आहेत.)

amrutabang@gmail.com