शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

अहमदपूर, पुणे आणि दिल्ली

By admin | Updated: June 1, 2017 11:28 IST

बुलढाणा जिल्ह्यातून लातूर जिल्ह्यात मी स्थलांतर केलं. वय वर्षे १५. तेव्हा कळलं पाणीप्रश्न काय असतो ते. वीस दिवस पाणी यायचं नाही, १०-१० दिवस अंघोळ नाही, खाण्याचे हाल. पण तरी तगलो..कारण जगण्याची ऊर्मी साऱ्याला पुरून उरते..

बुलढाणा जिल्ह्यातलं मेहकर तालुक्यातलं, हिरवळीनं सजलेलं माझं गाव.. देऊळगाव माळी.
दहावी पास झालो आणि घराबाहेर पडलो. २००८ ची गोष्ट.
लातूर जिल्ह्यात अहमदपूर येथे अकरावीसाठी प्रवेश मिळाला.
अहमदपूर. गाव तसं जास्त मोठंही नाही आणि जास्त छोटंही नाही. मात्र गावात शैक्षणिक वातावरण. कॉलेज होतं. त्यामुळे रूम, मेस आणि दुकानं तशी बरीच. घरभाडं परवडणारं असल्यामुळे खिसाही जास्त रडत नसे. 
या गावात मला दोन वर्षांत अनेक अनुभव आले. जिवाला जीव देणारे मित्र मिळाले. उत्तम शिकवणारे शिक्षक भेटले. आपण काही करू शकतो हा आत्मविश्वास मिळाला. आणि वय वर्षे ५ ते १८ वर्षांपर्यंतचे विविध विद्यार्थीही पाहता आले.
मात्र तसे नमुनेही बरेच भेटले. भाडं दोन रूमचं घेत, पण राहावं एकाच खोलीत लागे. घराचं बांधकाम सुरू आहे असं सांगून तसं राहायला भाग पाडणारा घरमालक आम्ही इथेच अनुभवला. उन्हाळ्यात सुट्या नसल्यानं पहिल्यांदा पाणीप्रश्न जवळून पाहिला. २१ दिवसांनी पाणी यायचं. तोपर्यंत आम्हाला पाणी जपून वापरायला लागायचं. आम्ही १०-१० दिवसांनी अंघोळ करायचो. घरमालकीण बार्इंनी संडासला लावलेलं कुलूप पण आम्ही इथेच बघितलं. पाण्याच्या टँकरचा उत्तम व्यवसायसुद्धा असतो हे मला इथंच कळलं.
त्याच काळात प्रत्येक महिना-दोन महिन्यांनी बदललेल्या मेस अजून आठवतात. प्रत्येक मेसला मिळणारी सोडायुक्त चपाती आणि त्यामुळे होणारे पोटाचे आजारही मी तिथे पचवले. (जे कधीच पचायचे नाही.) 
माझ्या काखेत गाठ वाढली होती. त्यात पू झाला होता. तेव्हा माझा पार्टनर मला सोडून दुसऱ्याच्या रूमवर झोपायला गेला. आणि नेमकं वाढदिवसाच्या दिवशी आॅपरेशन झालं, तर दवाखान्यात माझा बर्थडे साजरे करणारे मित्रही इथंच भेटले. माझी दुसरी आईच म्हणजे माझ्या मित्राची मामी. जिला आम्ही ताई म्हणतो. तिनं प्रत्येक आजारात मला घरचं जेवण दिलं. माया लावली. अहमदपूरने मला दिलेलं सर्वात सुंदर गिफ्ट आहे. 
अहमदपूरहून मी थेट दाखल झालो स्वप्नांच्या आणि शिक्षणाच्या पंढरीत म्हणजे पुण्यात! 
पुणे तिथे काय उणे. पुणेरी पाट्या, खमंग मिसळ आणि खास कितीतरी वैशिष्ट्य असलेलं हे शहर. पुण्यात मी कृषी महाविद्यालयात पदवीला प्रवेश घेतला. 
इथे सुरुवातीला झालेलं थोडंसं रॅगिंग, कॉलेजबाहेर मिळणारी मिसळ, भेळ आणि भुर्जीच्या गाड्या, शिवाजीनगर आणि राहुल थिएटर हे आमचे सुरुवातीचे सोबती.
इथेसुद्धा अनेक बरे-वाईट, मठ्ठ, लठ्ठ, अवली मित्र भेटले. ती दोस्ती मोलाची. आता सारे पांगले. मी सध्या दिल्लीला पुढील शिक्षणासाठी आलो आहे. इथेही तशाच गमतीजमती! 
या शैक्षणिक वाटचालीत गेल्या नऊ वर्षांत मी वेगवेगळी शहरं जवळून पाहिली. प्रत्येकाची एक शैली आहे. खूप भरभरून जगलो. पण एक कळलं की आपला महाराष्ट्र, आपला देश खूप सुंदर आणि वैविध्यपूर्ण आहे. ते आपण जपायला हवं. त्या साऱ्या रंगांची रंगपंचमी ही आपली पुंजी आहे. 
 
- स्वप्नीलकुमार सूर्यकांत वऱ्हाडे
मु. पो. देऊळगाव-माळी 
ता. मेहकर, जि. बुलढाणा 
 
 
छोटीशी गावं. त्यापेक्षा मोठी; पण छोटीच शहरं. या शहरात राहणारी जिद्दी मुलं. आपल्या स्वप्नांचा हात धरून, संधीच्या शोधात मोठ्या शहरांकडे धावतात. काय देतात ही मोठी शहरं त्यांना? कसं घडवतात-बिघडवतात? आणि जगवतातही..? - ते अनुभव शेअर करण्याचा हा नवा कट्टा. तुम्ही केलाय असा प्रवास? आपलं छोटंसं गाव, घर सोडून मोठ्या शहरात गेला आहात शिकायला? मोठ्या शहरात? दुसऱ्या राज्यात? परदेशातही? काय शिकवलं या स्थित्यंतरानं तुम्हाला? काय अनुभव आले? कडू-वाईट? हरवणारे-जिंकवणारे? त्या अनुभवांनी तुमची जगण्याची रीत बदलली का? दृष्टिकोन बदलला का? त्या शहरानं आपलं मानलं का तुम्हाला? तुम्ही त्या शहराला? की संपलंच नाही उपरेपण? या साऱ्या अनुभवाविषयी लिहायचंय? तर मग ही एक संधी ! लिहा तुमच्या स्थलांतराची गोष्ट.
१. लिहून पाठवणार असाल, तर पाकिटावर ‘वन वे तिकीट’ असा उल्लेख करा.
सोबत तुमचा फोटो आणि पत्ता-फोन नंबरही जरूर लिहा..
पत्ता- शेवटच्या पानावर, तळाशी.
२. इ-मेल- oxygen@lokmat.com