शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

बाइकवरून पडल्यावर...

By admin | Updated: November 17, 2016 17:04 IST

वाटत होतं सैन्यात जावं, पण बाइकवर बसलो, अपघात झाला आणि स्वप्नासह एक पायही गमावला...

- प्रभाकर पाटील

माझ्यावर जी वेळ आली, तशी कुणावर येऊ नये. म्हणून हा अनुभव लिहितो आहे. शहादा शहराच्या जवळ असलेलं माझं गाव सुलतानपूर. वयाच्या बाराव्या वर्षापासून वाटायचं की सैन्यात जावं. लहानपणी सातवीत असतानाच घरचे मला सांगायचे की तू सैनिक हो. वडिलांचं पण स्वप्न तेच होते की, एका तरी मुलानं सैन्यात जावं. जळगावला मी शाळेत होतो, एनसीसीत होतो. जळगावमध्ये घेतल्या जाणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी व्हायचो. खो-खो, कबड्डी, व्हॉलिबॉल, क्रिकेट शाळेकडून खेळायचो. अभ्यासातही हुशारच होतो. दहावीनंतर मी जळगाव सोडलं अन् शहाद्यात आलो. लोणखेडा येथे अकरावीला प्रवेश घेतला. एनसीसीच्या माळी मॅडम, भालेरावसरांनी सांगितलं होतं की व्यायाम सुरू ठेव. एनसीसीचं प्रमाणपत्र मिळालं. एका नॅशनल ट्रेकिंग कॅम्पसाठी निवडही झाली. सैन्यात जायची इच्छा अधिक तीव्र होत होती. पण एकदा कॉलेजमधून माझ्या मित्रांसोबत बाइकवर घरी जायला निघालो, नेमकं मीच त्याच्याकडून बाइक चालवायला घेतली. आम्ही गप्पा करत घरी जात होतो, कॉलेजपासून ५ कि.मी. अंतरावर दरा फाटा म्हणून एक स्टॉप आहे, तिथं अचानक एक कुत्र्याचं छोटं पिल्लू मोटारसायकलच्या पुढच्या चाकात आलं. मला ते समोरून दिसलंच नाही. मी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला अन् माझ्याकडून बाइकचा पुढचा ब्रेक दाबला गेला. खूप जोरात पडलो. जबरदस्त मुक्का मार पायाला बसला. तेवढं बरं की माझ्या मागे बसलेला माझा मित्र पंकज त्याने साइडला उडी टाकली. त्याला काहीच लागलं नाही. त्यानं माझ्या पायावरची बाइक उचलून साइडला केली अन् १०८ अ‍ॅम्ब्युलन्सला फोन केला व घरी फोन केले. शहाद्याला मला खासगी रुग्णालयात दाखल केलं. पायाला मोठी दुखापत झाली होती. पुढं नाशिकला दवाखान्यात हलवलं. पायाचं आॅपरेशन करावं लागलं. अनेक उपचार, शस्त्रक्रिया झाल्या. खूप शर्थीचे प्रयत्न केले डॉक्टरांनी. पण शेवटी जीव वाचवण्यासाठी पाय कापावा लागला. या वर्षीच मार्चमधली, महाशिवरात्रीचीच ही गोष्ट. त्या दिवशीच माझ्या पायाचं शेवटचं आॅपरेशन झालं, पाय कापला गेला. पाय तर गेलाच, माझं स्वप्नही कायमचं पुसलं गेलं. वाटलं, वाचलो नसतो तरी बरं झालं असतं यापेक्षा. घरचे पण खूप रडायचे. त्यांचं दु:ख पाहून जे वाटायचं ते मी कुठल्याच शब्दात सांगू शकत नाही. घरच्यांनी, डॉक्टरांनी मला खूप समजावलं. धीर दिला. मीही पुन्हा स्वत:चं आयुष्य नव्यानं सुरू करायचं असं ठरवून घरी आलो. आता गेले काही महिने बरा होतोय. माझा लहान भाऊ माझ्यासाठी मोठा ‘आधार’ आहे. तो म्हणतो, मी आता तुझ्या जागेवर आलो. मी तुझा मोठा भाऊ आहे. त्याचं नाव महेंद्र. तो बारावीला आहे, एनसीसीत आहे. सैन्यात जाण्याची त्याची पण इच्छा आहे. वाटतं की, तो माझं स्वप्न पूर्ण करेल. मी पण घरी बसून आता स्पर्धा परीक्षांची तयारी करतोय. संघर्ष सुरूच आहे. पाय गमावलाय हिंंमत गमावलेली नाही. हे सारं माझी कहाणी सांगायला लिहिलं नाही. मला माझ्या साऱ्या दोस्तांना एकच सांगायचं आहे की, बाइकवर बसण्यापूर्वीच जरा विचार करा. वेगावर नियंत्रण ठेवा. जपून चालवा. हेल्मेट घाला. संकट एका क्षणाचं असतं, अपघात एका क्षणात होतो; पण त्याची किंमत जबर मोजावी लागते. आपल्यालाही, आपल्या घरच्यांनाही. अपघातानं जे माझ्या वाट्याला आलं, ते तुमच्या वाट्याला येऊ देऊ नका. आजही मी वेगात, बुंगाट गाडी चालवणारे तरुण पाहतो, तेव्हा काळीज धडधडतं माझं. मोटारसायकल चालवू नका असं नाही, पण आपलं ध्येय काय, आपण ते कसं जगणार हे कायम डोळ्यांसमोर ठेवा. अपघातानं जी स्वप्न चक्काचूर होतात, त्याची किंमत मी काय वेगळी सांगू आणखी.. तुमचं तसं होऊ नये म्हणून म्हणतो, काळजी घ्या.. प्लीज.

- लेखक सुलतानपूर, नंदुरबार येथील आहेत.

 ‘त्या’ अपघाताची कहाणी..

प्रभाकरचं हे पत्र वाचलंत? बाइक चालवताना तो पडला आणि त्यात त्याचा पाय गमवावा लागला.. जीव वाचला ते महत्त्वाचं.. पण काही दुर्दैवी तर अशा रस्ते अपघातात जीव गमावतात.. रोज आपण अशा बातम्या वर्तमानपत्रात वाचतो.. रस्ते अपघातात बळी जाणाऱ्यांचं प्रमाण या देशात सर्वाधिक आहे.. हेल्मेट न वापरण्यापासून ते अतिवेगात गाडी चालवणं, वाहतुकीचे नियम न पाळणं ते रस्त्यांची दुर्दशा अशी अनेक कारणं यामागे आहेतच.. पण अपघात किती मोठा आघात करतो, एका क्षणात होत्याचं नव्हतं होतं.. तुम्ही गेलाय अशा अनुभवातून? गाडी चालवण्याचं पॅशन, ते त्याच गाडीचा अपघात? बाइकवरचं प्रेम ते त्यामुळे जगण्यावर ओढावलेलं संकट? त्यातून कमावलेली हिंंमत आणि पुन्हा नव्यानं सुरू केलेलं आयुष्य? लिहाल त्या अनुभवाविषयी? त्या अपघाताची कहाणी..

 अंतिम मुदत- २८ नोव्हेंबर २०१६