शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

बाइकवरून पडल्यावर...

By admin | Updated: November 17, 2016 17:04 IST

वाटत होतं सैन्यात जावं, पण बाइकवर बसलो, अपघात झाला आणि स्वप्नासह एक पायही गमावला...

- प्रभाकर पाटील

माझ्यावर जी वेळ आली, तशी कुणावर येऊ नये. म्हणून हा अनुभव लिहितो आहे. शहादा शहराच्या जवळ असलेलं माझं गाव सुलतानपूर. वयाच्या बाराव्या वर्षापासून वाटायचं की सैन्यात जावं. लहानपणी सातवीत असतानाच घरचे मला सांगायचे की तू सैनिक हो. वडिलांचं पण स्वप्न तेच होते की, एका तरी मुलानं सैन्यात जावं. जळगावला मी शाळेत होतो, एनसीसीत होतो. जळगावमध्ये घेतल्या जाणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी व्हायचो. खो-खो, कबड्डी, व्हॉलिबॉल, क्रिकेट शाळेकडून खेळायचो. अभ्यासातही हुशारच होतो. दहावीनंतर मी जळगाव सोडलं अन् शहाद्यात आलो. लोणखेडा येथे अकरावीला प्रवेश घेतला. एनसीसीच्या माळी मॅडम, भालेरावसरांनी सांगितलं होतं की व्यायाम सुरू ठेव. एनसीसीचं प्रमाणपत्र मिळालं. एका नॅशनल ट्रेकिंग कॅम्पसाठी निवडही झाली. सैन्यात जायची इच्छा अधिक तीव्र होत होती. पण एकदा कॉलेजमधून माझ्या मित्रांसोबत बाइकवर घरी जायला निघालो, नेमकं मीच त्याच्याकडून बाइक चालवायला घेतली. आम्ही गप्पा करत घरी जात होतो, कॉलेजपासून ५ कि.मी. अंतरावर दरा फाटा म्हणून एक स्टॉप आहे, तिथं अचानक एक कुत्र्याचं छोटं पिल्लू मोटारसायकलच्या पुढच्या चाकात आलं. मला ते समोरून दिसलंच नाही. मी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला अन् माझ्याकडून बाइकचा पुढचा ब्रेक दाबला गेला. खूप जोरात पडलो. जबरदस्त मुक्का मार पायाला बसला. तेवढं बरं की माझ्या मागे बसलेला माझा मित्र पंकज त्याने साइडला उडी टाकली. त्याला काहीच लागलं नाही. त्यानं माझ्या पायावरची बाइक उचलून साइडला केली अन् १०८ अ‍ॅम्ब्युलन्सला फोन केला व घरी फोन केले. शहाद्याला मला खासगी रुग्णालयात दाखल केलं. पायाला मोठी दुखापत झाली होती. पुढं नाशिकला दवाखान्यात हलवलं. पायाचं आॅपरेशन करावं लागलं. अनेक उपचार, शस्त्रक्रिया झाल्या. खूप शर्थीचे प्रयत्न केले डॉक्टरांनी. पण शेवटी जीव वाचवण्यासाठी पाय कापावा लागला. या वर्षीच मार्चमधली, महाशिवरात्रीचीच ही गोष्ट. त्या दिवशीच माझ्या पायाचं शेवटचं आॅपरेशन झालं, पाय कापला गेला. पाय तर गेलाच, माझं स्वप्नही कायमचं पुसलं गेलं. वाटलं, वाचलो नसतो तरी बरं झालं असतं यापेक्षा. घरचे पण खूप रडायचे. त्यांचं दु:ख पाहून जे वाटायचं ते मी कुठल्याच शब्दात सांगू शकत नाही. घरच्यांनी, डॉक्टरांनी मला खूप समजावलं. धीर दिला. मीही पुन्हा स्वत:चं आयुष्य नव्यानं सुरू करायचं असं ठरवून घरी आलो. आता गेले काही महिने बरा होतोय. माझा लहान भाऊ माझ्यासाठी मोठा ‘आधार’ आहे. तो म्हणतो, मी आता तुझ्या जागेवर आलो. मी तुझा मोठा भाऊ आहे. त्याचं नाव महेंद्र. तो बारावीला आहे, एनसीसीत आहे. सैन्यात जाण्याची त्याची पण इच्छा आहे. वाटतं की, तो माझं स्वप्न पूर्ण करेल. मी पण घरी बसून आता स्पर्धा परीक्षांची तयारी करतोय. संघर्ष सुरूच आहे. पाय गमावलाय हिंंमत गमावलेली नाही. हे सारं माझी कहाणी सांगायला लिहिलं नाही. मला माझ्या साऱ्या दोस्तांना एकच सांगायचं आहे की, बाइकवर बसण्यापूर्वीच जरा विचार करा. वेगावर नियंत्रण ठेवा. जपून चालवा. हेल्मेट घाला. संकट एका क्षणाचं असतं, अपघात एका क्षणात होतो; पण त्याची किंमत जबर मोजावी लागते. आपल्यालाही, आपल्या घरच्यांनाही. अपघातानं जे माझ्या वाट्याला आलं, ते तुमच्या वाट्याला येऊ देऊ नका. आजही मी वेगात, बुंगाट गाडी चालवणारे तरुण पाहतो, तेव्हा काळीज धडधडतं माझं. मोटारसायकल चालवू नका असं नाही, पण आपलं ध्येय काय, आपण ते कसं जगणार हे कायम डोळ्यांसमोर ठेवा. अपघातानं जी स्वप्न चक्काचूर होतात, त्याची किंमत मी काय वेगळी सांगू आणखी.. तुमचं तसं होऊ नये म्हणून म्हणतो, काळजी घ्या.. प्लीज.

- लेखक सुलतानपूर, नंदुरबार येथील आहेत.

 ‘त्या’ अपघाताची कहाणी..

प्रभाकरचं हे पत्र वाचलंत? बाइक चालवताना तो पडला आणि त्यात त्याचा पाय गमवावा लागला.. जीव वाचला ते महत्त्वाचं.. पण काही दुर्दैवी तर अशा रस्ते अपघातात जीव गमावतात.. रोज आपण अशा बातम्या वर्तमानपत्रात वाचतो.. रस्ते अपघातात बळी जाणाऱ्यांचं प्रमाण या देशात सर्वाधिक आहे.. हेल्मेट न वापरण्यापासून ते अतिवेगात गाडी चालवणं, वाहतुकीचे नियम न पाळणं ते रस्त्यांची दुर्दशा अशी अनेक कारणं यामागे आहेतच.. पण अपघात किती मोठा आघात करतो, एका क्षणात होत्याचं नव्हतं होतं.. तुम्ही गेलाय अशा अनुभवातून? गाडी चालवण्याचं पॅशन, ते त्याच गाडीचा अपघात? बाइकवरचं प्रेम ते त्यामुळे जगण्यावर ओढावलेलं संकट? त्यातून कमावलेली हिंंमत आणि पुन्हा नव्यानं सुरू केलेलं आयुष्य? लिहाल त्या अनुभवाविषयी? त्या अपघाताची कहाणी..

 अंतिम मुदत- २८ नोव्हेंबर २०१६