शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
3
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
4
जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर
5
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
6
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
7
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
8
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
9
"सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’’, काँग्रेसचा सवाल   
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
11
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
12
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
13
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
14
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
15
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
16
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
17
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
18
Y Puran Kumar: वाद आणि संघर्षांनी भरलेली कारकीर्द; कोण होते वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरन?
19
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
20
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट

व्यसनांच्या विरोधात ६० हजार तरुणांची फौज

By admin | Updated: October 20, 2016 17:08 IST

व्यसनांची मागणी कमी झाली,त्याविषयी द्वेष निर्माण झाला तर? त्यासाठीची एक मोहीम..

प्रवीण दाभोळकर
 
भारताला महासत्ता बनवण्याचं स्वप्न एकीकडे आणि त्याचवेळी तारुण्याला पोखरणारी व्यसनांची कीड दुसरीकडे ! हा प्रश्न गंभीर आहे. आपल्या देशात नशा करणाऱ्यांमध्ये अल्पवयीन आणि तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्यांचं प्रमाण जास्त आहे. ज्या वयात शरीर सुदृढ ठेवायचं त्याच वयात व्यसनाच्या विळख्यात ही मुलं ओढली जात आहेत.
तरुणांमधील वाढत्या व्यसनांचं हे प्रमाण लक्षात घेऊन सामाजिक न्याय विभाग आणि नशाबंदी मंडळातर्फे युथ अगेंस्ट लिकर, टोबॅको, ड्रग्ज्सच्या विरोधात (एलटीडी) एक मोहीम उघडण्यात आली आहे. ‘मागणीच बंद केली तर पुरवठाही बंद होईल’ हे ध्यानात ठेवून राज्यातून दरवर्षी ६० हजार विद्यार्थी समाजात व्यसनांसंदर्भात जनजागृती करणार आहेत. 
२०११ साली मुंबई विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू आणि सध्याचे नशाबंदी मंडळाचे अध्यक्ष राजन वेळूकर यांनी ‘यूथ अगेंस्ट एलटीडी’ या मोहिमेची घोषणा केली. मुंबईतल्या महाविद्यालयांपासून या मोहिमेचा श्रीगणेशा झाला. चार वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रातील बहुतांश महाविद्यालयांत विविध उपक्रम राबविण्यात आले. व्यसनमुक्ती करण्याची शपथ घेण्यात आली. व्यसनांबद्दल द्वेष निर्माण झाला तर मागणीही कमी होईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 
महाराष्ट्रातील प. महाराष्ट्र, उ. महाराष्ट्र, कोकण, ठाणे, विदर्भ, मुंबई, मराठवाडा या सात विभागांची निवड करण्यात आली आहे. दहा विद्यापीठांची यासाठी निवड करण्यात आली आहे. त्यातून पंचवीस महाविद्यालये ‘युथ अगेंस्ट एलटीडी’ या प्रकल्पासाठी निवडण्यात येणार आहेत. निवड झालेल्या महाविद्यालयांतून वीस जणांची टीम (सर्व जाती, धर्मातील १० मुले, १० मुली, प्राध्यापक) निवडण्यात येणार आहेत. निवड झालेले विद्यार्थी आणि प्राध्यापकांना रीतसर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पथनाट्य, चित्रपट, चर्चासत्र, मोबाइल मेसेजेसच्या माध्यमातून ही मंडळी समाजापर्यंत पोहोचणार आहेत. स्वत:हून पुढाकार घेणाऱ्या विद्यार्थी, प्राध्यापकांना यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. या चळवळीतले विद्यार्थी आपले महाविद्यालय, सभोवतालचा परिसर, सामाजिक मंडळांमध्ये जाऊन जनजागृती करतील. या संकल्पनेच्या माध्यमातून व्यसनाविरोधातील फ्रेंडशिप डे, व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो. चेहरे रंगवून, पोस्टर्सच्या माध्यमातून सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपुरेंसारख्या लोकप्रिय अभिनेत्यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. 
 
मागणीच नसेल तर पुरवठाही बंद होईल. म्हणून विद्यार्थ्यांद्वारे जनजागृती करून व्यसनांच्या मुळावरच घाव घालण्याचा आमचा मानस आहे. 
- वर्षा विद्या विलास,  सरचिटणीस, नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य 
 
व्यसनांचा धोका
वर्षाला ३३ लाख व्यक्ती दारूमुळे मृत्युमुखी पडतात. भारतात प्रत्येक १६ सेकंदांना एक मूल तंबाखूचे पहिल्यांदा सेवन करते, तर दिवसभरात हा आकडा ५,५०० मुलांपर्यंत जातो. भारतात १४.६ टक्के कुमारवयीन मुले तंबाखूच्या अधीन गेलेली आहेत. १९६० मध्ये दारू पिण्याचे वय २८ वर्षे होते, तर सध्या ते वय १८ वर्षांपर्यंत आले आहे.
 
(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत सहायक उपसंपादक आहेत.)