शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
3
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
4
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
5
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
6
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
7
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
8
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
9
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
10
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
11
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
12
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
13
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
14
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
15
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
16
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
17
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
18
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
19
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
20
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना 3 इंटर्नशीप मस्ट!

By meghana.dhoke | Updated: August 2, 2017 17:53 IST

येत्या शैक्षणिक वर्षापासून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना इण्टर्नशिप करणं सक्तीचं असून, त्यांना योग्य इण्टर्नशिप मिळावी म्हणून प्रयत्न करणं महाविद्यालयं आणि शिक्षणसंस्थांसाठीही बंधनकारक.

ठळक मुद्देफक्त 1 % मुलं करतात इण्टर्नशिप, बाकीचे सुटीत आराम करतात.इंजिनिअर्सची रोजगारक्षमता वाढून कौशल्यविकासासाठी प्रत्यक्ष अनुभवाची गरज.इंजिनिअर्सची गुणवत्ता वाढावी म्हणून सरकारचा प्रयत्न

दरवर्षी 8 लाख तरुण इंजिनिअरिंगची पदवी घेवून नोकरीच्या बाजारात उतरतात. आणि त्यापैकी फक्त 40%  इंजिनिअर्सना नोकर्‍या मिळतात. आणि दुर्देवानं 60 %  इंजिनिअर्स बेरोजगार राहतात. हे आपल्या देशातलं वास्तव सरकारनेही मान्य केलं असून या इंजिनिअर्सची गुणवत्ता वाढावी, त्यांचे स्किल्ससेट उत्तम व्हावेत आणि त्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा म्हणून येत्या शैक्षणिक वर्षापासून इंजिनिअरिंग करणार्‍या सर्व विद्याथ्र्याना प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेणं अर्थात इण्टर्नशिप करणं शासनानं सक्तीचं केलं आहे. पदवीच्या प्रवासात किमान तीन वेळा 6 ते 8आठवडय़ांची ही इण्टर्नशिप करणं प्रत्येक विद्याथ्र्याला सक्तीचं करण्यात आलं आहे. आज देशात फक्त 1 % तरुण समर इण्टर्नशिप करतात, बाकीचे मोठी सुटी घरात आरामात बसून काढतात आणि नोकरीच्या बाजारात उतरले की त्यांना ना-लायक ठरवून कंपन्या नोकर्‍या देत नाहीत.

देशभरातल्या कॉलेजातून बाहेर पडणार्‍या इंजिनिअर्सची गुणवत्ता हा मोठा चिंतेचा विषय आहे. सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारनेही हे मान्य केलं आहे की, इंजिनिअर्सची गुणवत्ता ही अत्यंत कमी असून ती वाढावी यासाठी निश्चित आणि नियोजित प्रयत्न करणं गरजेचं आहे. केंद्रिय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी 24 जुलै 2017 रोजी संसदेत केलेल्या निवेदनानुसार येत्या म्हणजेच 2017-18 याच शैक्षणिक वर्षापासून विद्याथ्र्याना इण्टर्नशिप करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. मुख्य म्हणजे मुलांनीच काय ती इण्टर्नशिप शोधावी असं सरकारला अपेक्षित नाही. उलट याकामी सर्व महाविद्यालयांना जबाबदार धरण्यात येणार असून आपल्या विद्याथ्र्याना चांगल्या इण्टर्नशिप मिळाव्यात,त्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा म्हणून महाविद्यालयं आणि संस्थांनाही विद्याथ्र्याना इण्टर्नशिप मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणंही बंधनकारक करण्यात आलं आहे.

ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेकिAलक एज्युकेशन  म्हणजेच एआयसीटीई या तांत्रिक शिक्षणासाठी सर्वोच्च असलेल्या संस्थेनंही याप्रकारच्या इण्टर्नशिपची गरज व्यक्त केली आहे.  एआयसीटीई स्वतर्‍ संस्थांना योग्य कंपन्यात इण्टर्नशिप मिळवून देण्यासाठीचे प्रयत्न करत आहे. त्यासाठीच्या व्यवस्था तयार करण्यात येत आहेत.  लिंकडीन, इण्टर्नशाळा यासारख्या समाजमाध्यमांना, पोर्टल्सना त्यात सहभागी करुन घेतलं जात आहे.

 एआयसीटीईच्याच 2016 या शैक्षणिक वर्षाच्या आकडेवारीनुसार देशभरात 10,328 तंत्रशिक्षण संस्था असून   15.87 लाख विद्यार्थी तिथं शिकतात. त्यापैकी फक्त 6.96लाख विद्याथ्र्यानाच कॅम्पस मुलाखतींमध्ये नोकर्‍या मिळाल्या.

 एआयसीटीईच्या वार्षिक अहवालानुसार पंतप्रधान कौशल विकास योजनेंतर्गत तंत्रशिक्षण संस्थांमध्ये विविध कौशल्य विकास कार्यक्रम राबवले जाणार आहेत. इंजिनिअर्सची गुणवत्ता वाढीस लागावी आणि त्यांना अधिक नोकरीक्षम बनवावे, अधिक रोजगार उपलब्ध व्हावेत म्हणून हे प्रयत्न केले जात असल्याचे  एआयसीटीईचे म्हणणे आहे.

 एआयसीटीईचा अहवाल म्हणतो की, येत्या 3 वर्षात किमान 10 लाख उत्तम तरुण इंजिनिअर्स तयार करणं हा या योजनेचा भाग आहे. आणि त्याचा पहिला टप्पा म्हणजे प्रत्यक्ष कामाचा अनुभव.  कौशल्य विकास आणि इण्टर्नशिपमुळे मिळणारा औद्योगिक कामाचा अनुभव हे सारं तरुण इंजिनिअर्ससाठी महत्वाचं ठरेल अशी आशा आहे.