शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
2
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
3
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
4
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
5
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
6
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
7
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
8
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
9
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
10
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
11
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
12
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
13
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
14
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
15
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
16
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
17
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
18
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
19
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
20
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?

जिथं समस्या आहेत तिथं जा, पैशासाठी स्वत:ला विकू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 07:40 IST

माणसं असं स्वत:च्याच विशीकडे वळून पाहतात तेव्हा त्यांना फक्त आपल्या वयाचं नाही तर त्या वेळच्या आणि आजच्या समाजाचं आणि भोवतालातल्या बदललेल्या वास्तवाचंही बरंच काही सापडत जातं. ते सापडावं म्हणून हा ऑक्सिजनचा विशेष अंक 

ठळक मुद्देआपल्याला आपल्या विशीत परत जाता आलं तर?  

- डॉ. अभय बंग

अभय,वीस वर्षाच्या अभयशी बोलायचं ही गोष्टच मोठी कल्पनारम्य आहे. त्यामुळे त्याच्याशीच नाही तर त्याच्या वयाच्या, आज विशीत असलेल्या मुला-मुलींशीच थेट बोलायला मला आवडेल.एक अगदी सुरुवातीला सांगतो, तू अतिशय भाग्यवान आहेस की तुला हे आयुष्य मिळालं आहे.  त्यामुळे मी आजवर माझ्या आयुष्यात केलेल्या चुका तू जरूर कर; पण  लवकर कर. चुका करण्यात साहस असतं. चुका होण्याच्या भीतीने जी माणसं ‘अचूक’ राहण्याचा प्रय} करतात ती दगड बनतात. त्यामुळे चुका करा, भरपूर चुका करा. त्यातून भरपूर शिका. भीत भीत जगू नका. जगायचं तर सिंहासारखं जगावं.आयुष्य एकदाच मिळतं हे लक्षात घ्या. त्याला वन्समोअर नाही. आणि जर ते एकदाच मिळणार असेल तर ‘जगायचं कशासाठी?’ हा प्रश्न स्वतर्‍ला विचारा आणि त्याचं उत्तर विचारपूर्वक ठरवा.मला वयाच्या 13 व्या वर्षी या प्रश्नाचं उत्तर सापडलं. ग्रामीण भागातलं आारोग्यमान सुधारण्यासाठी आपण काम करायचं हे माझं उत्तर होतं. त्या एका उत्तरानं माझ्या आयुष्याचं सोनं होऊन गेलं. हे जगण्याचं उद्दिष्ट मिळालं नसतं तर माझं काय झालं असतं? करिअरच्या, बाजाराच्या रानात भरकटलो असतो.आयुष्य इतकं अमूल्य आहे की ते पैशासाठी विकू नका. आयुष्य एकच आहे, पैसा जगात भरपूर आहे. अनेकांकडे आहे. ठरवलं तर कमावताही येतो; पण पैशासाठी आयुष्य विकायचं हा ‘मूर्ख सौदा’ आहे. अर्थप्राप्तीसाठी जगू नका. अर्थपूर्ण जगा. सार्थक जगा. आता तू विचारशील की हा असा जीवनाचा अर्थ कुठं शोधायला जाऊ?- तर त्याचं उत्तर एकच, गो व्हेअर द प्रॉब्लेम्स आर, नॉट व्हेअर द फॅसिलिटीज आर.जिथं समस्या आहेत तिथं कुणी जात नाही; जिथं सुविधा आहेत तिथं गर्दी आहे. त्या गर्दीत मलाही घ्या म्हणून अर्ज घेऊन त्या रांगेत शेवटी उभं राहणं म्हणजे आयुष्य वाया घालवणं आहे.बघा एमपीएससीची तयारी सहा लाख मुलं करतात, दरवर्षी दोन-तीनशे जागा भरल्या जातात; पण सगळ्यांना तिथं जायचं, कारण प्रत्येकजण सरकारी खुर्चीवर बसू इच्छितो. खूर्ची म्हणजे सुविधा. त्या सुविधेसाठी स्पर्धा असते, इच्छुकांची गर्दी असते. मग आपण तिथं जावं जिथं कुणी जाऊ इच्छित नाही. तिथं गर्दी नाही.पण त्या समस्या शोधणार कशा?काही समस्या दूरच्या असतात, काही जवळच्या. आव्हानं पाहा, आवतीभोवती भरपूर आहेत.शेतकरी आत्महत्या, कुपोषण, बालमृत्यू, छुपी बेरोजगारी, प्लॅस्टिक प्रदूषण, व्यसनं किती म्हणाल तेवढे आहेत. सगळे प्रॉब्लेम्स आपली वाट पाहत आहेत.आणि काही तर आपल्या आतमध्ये आहेत. आपल्यात दडलेत.आपण आणि अन्य हे कोण ठरवतं? आपल्या मनात आपण दुसर्‍यांना ‘अन्य’ ठरवतो. परक्यांचा द्वेष करतो. धर्मद्वेष आज पसरवला जातोय. इतर धर्मीय शत्रू आहेत असं वातावरण निर्माण केलं जातंय. दरी निर्माण केली जाते आहे. ते भयंकर विष आहे. त्यातून तरुणांना स्वतर्‍लाच मुक्त करावं लागेल. आपल्या मनातून बाहेर काढावे लागतील हे भेद.तिकडं ती ग्रेटा जगभरातल्या नेत्यांना जाब विचारते आहे, 16 वर्षाची मुलगी. पृथ्वी नावाचं जहाज बुडतंय. आणि आपण विचारतो सुरुवात कुठून करू?या प्रश्नाचं एकच उत्तर सांगतो. जे उत्तर त्या म्हातार्‍याने कधीच देऊन ठेवलंय. त्याचीच आपण 150 वी जयंती साजरी केली. महात्मा गांधी म्हणत,  बी द चेंज युवरसेल्फ यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड.हेच ते उत्तर. करा सुरुवात स्वतर्‍पासून. बी द चेंज युवरसेल्फ!

( ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते)