शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
3
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
4
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
5
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
6
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
7
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
8
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
9
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
10
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
11
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
12
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
13
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
14
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
15
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
16
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
17
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
18
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
19
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
20
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी

दर तासाला 16 माणसांचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 18:00 IST

येत्या 18 तारखेला ‘द वर्ल्ड डे ऑफ रीमेंबरन्स फॉर ट्राफिक व्हिक्टिम्स.’ त्याची थिम आहे, ‘रोड्स हॅव स्टोरीज !’

ठळक मुद्देगाडी ठोकल्याच्या, बुंगाट गाडी चालवण्याच्या पागलपणाच्या आणि अपघाताच्या या कथा कशा टाळता येतील?

मनीषा म्हात्रे

रोज सकाळी वर्तमानपत्रं उघडलं की रस्ते अपघाताची बातमी कळते. तरुण कुणीतरी त्यात जीव गमावून बसलेलं असतं. कुणीतरी त्यात आपला मित्र असतो, कुणी सगासोयरा. जीव कळवळतो. आयुष्यभरासाठी माणसांना गमावून बसण्याची आफत ओढावते. आणि हळहळ करण्यापलीकडे हातात काहीही उरत नाही. जगभरात हे चित्र आहेच; पण भारतात ते अधिक विदारक आहे.येत्या 18 तारखेला जगभर या रस्ते अपघात जनजागृतीसाठी एक दिवस साजरा केला जाणार आहे. गेली 10 वर्षे जगभरातले अनेक देश संयुक्त राष्ट्रसंघाच्या उपक्रमांतर्गत यादिवसानिमित्त जनजागृती करतात. ‘द वर्ल्ड डे ऑफ रीमेंबरन्स फॉर ट्राफिक व्हिक्टिम्स.’ असं या दिवसांचं नाव. आणि त्याची थिम आहे, ‘रोड्स हॅव स्टोरीज !’अशा अनेक रस्ताकथा आपल्या सगळ्यांकडे असतात, गाडी ठोकल्याच्या, बुंगाट गाडी चालवण्याच्या पागलपणाच्या आणि अपघाताच्या.त्या टाळता येतील का?टाळायला हव्यात कारण या देशातली रस्ते अपघातांची आकडेवारी डोळ्यात अंजन घालणारी आहे.

महाराष्ट्रात चित्र काय?

वाहनचालकांच्या निष्काळजीमुळे राज्यात 2017 मध्ये 35, 853 अपघात झाले.

 12,264 जणांना त्यात जीव गमवावा लागला.  20,465 जण गंभीर जखमी झाले.

 जानेवारी ते मार्च  2018 या केवळ तीन महिन्यांत 9264 अपघात झाले.3361 जणांचे मृत्यू झाले. यातील ग्रामीण भागातील अपघातांचे प्रमाण शहरी भागातील अपघातांच्या जवळपास तिप्पट असल्याचे आकडेवारीवरून दिसते. घडलेले सर्व अपघात वाहनचालकांची निष्काळजी, धोकादायक ओव्हरटेक व अविचार, हयगयीने वाहन चालवल्यामुळे झाले आहेत. केंद्र सरकारने निश्चित केलेल्या निकषांनुसार राज्यात 1 हजार 324 अपघातग्रस्त ठिकाणं असल्याची लेखी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानमंडळात दिली होती. 

2017 साली भारतात 4,64, 910रस्ते अपघात झाले.

1,47, 913लोकांनी त्यात आपलेजीव गमावले.

405 माणसंदर दिवशी देशात सरासरीरस्ते अपघातात बळी पडतात.

1,290 माणसं रोज अपघातात जखमी होतात. 

16माणसं दर तासालारस्ते अपघात मरतात.