शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
3
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
4
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
5
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
6
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
7
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
8
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
9
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
10
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
11
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
12
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
13
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
14
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
15
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
16
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
17
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
18
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
19
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
20
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

निरोप10 गोष्टींना

By admin | Updated: December 24, 2015 17:46 IST

जुन्या होत असलेल्या, 2015 नावाच्या वर्षा, आता निघणारच आहेस, निरोप घेणारच आहेस, जायचं म्हणून कॅलेंडर गुंडाळून बॅगेत ठेवणारच आहेस,

 जुन्या होत असलेल्या,

2015 नावाच्या वर्षा,
आता निघणारच आहेस,
निरोप घेणारच आहेस,
जायचं म्हणून कॅलेंडर गुंडाळून बॅगेत ठेवणारच आहेस,
तर तुझ्यासोबत आमच्या काही गोष्टीही प्लीज घेऊन जाशील?
त्या गोष्टींना तुङयासोबतच निरोप  द्यावा म्हणतोय.
कदाचित त्यामुळे,
तुझाच सोबती असलेलं 2016 येईन,
तेव्हा त्या नव्या वर्षाला मी नवा भेटेन, नव्यानं भेटेन.
आणि जगेनही नव्यानं!
तेव्हा माझं हे गाठोडं,
ने तुङया सोबत आणि फेकून दे कुठंतरी 
काळाच्या खोल विवरात त्यानं पुन्हा मला कधीही गाठू नये म्हणून. 
 
 
 
1) मनावरच्या ओझ्याला.
किती ओझं ते मनावर, कसलकसल्या आठवणींचं, कुणी जाणूनबुजून किंवा नकळत केलेल्या अपमानांचं. जमलेल्या गोष्टींचं, पूर्णच न झालेल्या अपेक्षांचं. अपयशाचं आणि यशाचंही! इतकं जड होतं मन की, त्याला नवीन काही सुचूच नये, जरा जागा मिळाली की बुळूबुळू करत एकेक जुन्याच गोष्टी बाहेर येऊन चावू लागतात. नको ते ओझं आता नव्या वर्षात जाताना.
सरळ रिकाम्या मनानं, को:या पाटीनं नवं काहीतरी घडवू. जुनं ओझंच नको कसलंच, सुखाचंही.दु:खाचंही!
जरा वाटू दे ना हलकं, मलाही, मनालाही!
 
2) नको नको ते आकडे.
पाच वर्षापूर्वी एवढं होतं वजन, आता एवढं आहे. मैत्रिणीचं एवढं, माझं तेवढं आहे. पोटाचा घेर, कंबरेचा घेर यांचे आकडे. विसरसलेल्या वाढदिवसांचे, विसरुन जावेत अशा फोन नंबर्सचे, स्वत:च्या न वाढलेल्या आणि इतरांच्या वाढलेल्या पगारांचे, कसकसल्या इएमआयचे. हे सारे आकडे फेर धरुन नाचतात अािण मामाचं पत्र हरवलं खेळल्यासारखे सरळ आपल्याभोवती गोल गोल फिरतात. दुसरं काहीच सुचू देत नाहीत. जरा विसरुन जाता येतील का हे आकडे? वाढलं ते वाढो, घटलं ते घटो.पण जरा आकडय़ांच्या जंजाळातून तर सुटू. मन मोकळं करू.
 
3) आळस, किती तो!
मान्यच करु ना की आहोत आपण आळशी, जरा शिस्त नाही स्वत:ला. पहाटे पाचला उठू असं गेले दहावर्ष ठरवतोय पण नाही जमत. ना व्यायाम जमतो, ना वेळ पाळणं, ना डेडलाईन सांभाळणं ना वेळेवर कुठल्या गोष्टी करणं. यासा:याला जबाबदार कोण? तर आपला आळस. त्या आळसाला एकदाचा निरोपाचा नारळ देऊ. जरा झडझडून उठत कामाला लागूच यंदा.
 
4) जुनंच किती गिरवत राहू.?
यश  मिळालं म्हणून काय झालं, जुनंच किती दिवस गिरवायचं. तेच ते किती काळ करायचं. जे जमतं तेच करत रहायच्या आणि सेफ प्ले करायच्या या जिलबीपाडू वृत्तीलाही निरोप. कशाला तेच ते करायचं. नवीन पाहू की करू, नाहीच जमलं तर अनुभव तरी मिळेल. पण त्याच त्या रेघोटय़ा नको आता.
 
5) ‘डर’ण्याचं काय?
 
सतत भीती वाटते. उद्याची, कालची, आजची, माणसांची, अपयशाची, खडय़ात पडायची, वाईट होण्याची, साडेसातीची, पत्रिकेतल्या ग्रहांची. डर डरके जिएंगे तो क्या खाक जिऐंगे? उद्या जे होईल ते होईल, पण वाईटच होईल या डरण्याला आता बाय म्हणूच.
 
6) आठवणींत कैद
 
आठवणी सुख देतात हे खरं, पण किती आठवायचं? जरा विसरायला शिकू. सततच्या त्या आठवणी, चांगल्या वाईट माणसांच्या, त्यांच्या बरोबर जगल्या क्षणांच्या,त्यांनी दिलेल्या प्रेमाच्या आणि अपेक्षाभंगाच्याही.
त्या आठवणींचं अकाऊण्ट डिलीट करून टाकता येतील.
 
 
7) डाचणारे अनुभव.
एकदाच येतात वाईट अनुभव, पण ते डाचत राहतात. छळत राहतात. सतत. कायम. जरा खपली निघाली की भळभळ रक्त वाहतंच. एकदाच आलेले अनुभव आपल्याभोवतीच रेंगाळतात. एकदाच झालेले अपमान सतत सलत राहतात. हे डाचणारे अनुभव जगू देत नाहीत, त्यांचं एकदा विसर्जन केलेलं बरं. म्हणजे जरा नव्या, सुखाच्या अनुभवांना तरी जागा होईल..
 
 
 
8) छळकुटी माणसं.
काही माणसं छळकुटी. सतत छळतात. आता तर ऑनलाईन जगातही छळतात. पण आपण त्यांना सोडत नाही, त्यांना जा म्हणत नाही किंवा ढकलून बाहेर काढत नाही आयुष्यातून. नातं टिकवायसाठी सारे प्रय} करू. जीवापाड प्रेम देऊ, पण नाहीच जमलं तर छळकूटय़ा माणसांना आपलं आयुष्य का नासवू द्यायचं?
 
 
9) आभासी आनंद? कशाला?
 
किती ते आभासी आनंद? सतत ऑनलाईन असण्याचे आणि लाईक्स, कमेण्टमधे आपलं कर्तृत्व जोखण्याचे. आभासी मित्रंचे? ते आभासी, खोटे आनंद वजा होत जरा प्रेमाची माणसं, त्यांचा सहवास, खरेखुरे आनंदाचे क्षण येऊदेत वाटय़ाला,पण त्यासाठी ऑनलाईन जगाला थोडा निरोप द्यावा लागेल.
 
 
10) लोक काय म्हणतील?
हे तीन शब्द, विसरुन गेलेले बरे. काही करायच्या आतच, लोक काय म्हणतील हा विचार येतो, या तीन शब्दांनाच निरोप दिला तर काहीतरी वेगळं, आपल्या आनंदाचं घडू शकेल , लोक काही का म्हणोनात मग!