शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
5
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
6
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
7
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
8
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
9
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
10
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
11
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
12
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
13
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
14
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
15
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
16
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
17
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
18
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
19
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
20
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...

फिरकीने उडवली झिम्बाब्वेची भंबेरी, भारताचा ५४ धावांनी विजय

By admin | Updated: July 17, 2015 20:03 IST

अक्षर पटेल व हरभजन सिंगच्या फिरकीने झिम्बाब्वेच्या फलंदाजांना रोखले असून टी -२० सामन्यात भारताने झिम्बाब्वेवर ५४ धावांनी विजय मिळवला.

ऑनलाइन लोकमत

हरारे, दि. १७ - अक्षर पटेल व हरभनज सिंग या दुकलीच्या फिरकीने झिम्बाब्वेच्या फलंदाजांना रोखले असून पहिल्या टी - २० सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा ५४ धावांनी विजय मिळवला आहे. भारताच्या १७९ धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेला २० षटकांत सात गडी गमावत १२४ धावाच करता आल्या. 

भारत व झिम्बाब्वेमधील दोन टी - २० सामन्यांच्या मालिकेला आज सुरुवात झाली असून वन डेपाठोपाठ टी -२० तही झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरला आहे. कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  सलामीवीर अजिंक्य रहाणे व मुरली विजय या जोडीने भारताला दमदार सुरुवात करुन दिली. अवघ्या ७ षटकांत या जोडीने ६ ६ धावा केल्या. एकेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मुरली विजय (३४ धावा) धावबाद झाला. त्यापाठोपाठ अजिंक्य रहाणेही ३३ धावांवर बाद झाल्याने भारताची स्थिती २ बाद ८२ अशी झाली. मात्र त्यानंतर रॉबिन उथप्पाने ३५ चेंडूत नाबाद ३९ धावा करत भारताला मजबूत स्थितीत आणले. मनिष पांडे १९, केदार जाधव ९ तर स्टुअर्ट बिन्नी ११ धावांवर बाद झाले. हरभजन सिंगने नाबाद ८ धावा केल्या. भारताने २० षटकांत पाच गडी गमावत १७८ धावा केल्या. 

भारताप्रमाणेच झिम्बाब्वेची सुरुवातही चांगली होती. चामू चिभाभा व हॅमिल्टन मसकद्जा या जोडीने संघाला अर्धशतकी सलामी दिली. या जोडीने ८ षटकांत ५५ धावा ठोकल्याने झिम्बाब्वेच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र हरभजन सिंगने चिभाभाला २३ धावांवर बाद करत सलामीची जोडी फोडली. यानंतर हरभजन व अक्षर पटेल यांच्या फिरकीसमोर झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी शरणागतीच पत्कारली. एक बाद ५५ अशा स्थितीत असलेल्या झिम्बाब्वेची अवस्था सात बाद ९८ अशी झाली. हरभजनने दोन तर अक्षर पटेलने तीन विकेट घेतल्या. मोहित शर्माने एक विकेट घेतली. झिम्बाब्वेला २० षटकांत ७ गडी गमावून १२४ धावा केल्या.