शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

झिम्बाब्वेचे यश शानदार : आश्विन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 03:13 IST

‘झिम्बाब्वेने श्रीलंकेमध्ये जिंकलेली एकदिवसीय मालिका शानदार यश आहे. अशा अनपेक्षित निकालांमुळे क्रिकेटमध्ये कडवी स्पर्धा कायम राखण्यास मदत मिळेल,’ असे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘झिम्बाब्वेने श्रीलंकेमध्ये जिंकलेली एकदिवसीय मालिका शानदार यश आहे. अशा अनपेक्षित निकालांमुळे क्रिकेटमध्ये कडवी स्पर्धा कायम राखण्यास मदत मिळेल,’ असे वक्तव्य भारताचा अव्वल आॅफस्पिनर रविचंद्रन आश्विन याने केले. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमादरम्यान आश्विनने आपले मत मांडले. आश्विनने सांगितले की, ‘झिम्बाब्वेचा श्रीलंकेविरुध्दच्या विजयाबद्दल सांगायचे झाल्यास, खेळ अशाच प्रकारे चालतो. कोणीही हरु शकतो आणि कोणीही जिंकू शकतो. उद्या अफगाणिस्तानही बलाढ्य संघाला धक्का देऊ शकतो. अशा प्रकारेच खेळ पुढे गेला पाहिजे. खेळातील कडव्या स्पर्धेसाठी हे आवश्यक आहे.’ श्रीलंकेविरुद्धची पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका झिम्बाब्वेने ३-२ अशी जिंकून क्रिकेटविश्वात खळबळ उडवली होती. आगामी २१ जुलैपासून भारताचा श्रीलंका दौरा सुरु होत असून या दौऱ्यात विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ तीन कसोटी, पाच एकदिवसीय आणि एकमेव टी२० सामन्याची मालिका खेळेल. दरम्यान, या दौऱ्यात सुरुवातीला दोनदिवसीय सराव सामनाही खेळविण्यात येणार आहे. दरम्यान, यावेळी आश्विनने नवे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या निवडीवर प्रतिक्रीया देण्यास टाळले. ‘माझ्या मते नवे प्रशिक्षक, नवे सहयोगी स्टाफ माझ्या अधिकार क्षेत्रात येत नसल्याने यावर बोलणे उचित नाही,’ असे आश्विनने यावेळी म्हटले.