शहरं
Join us  
Trending Stories
1
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
2
तामिळनाडूत हिंदी गाणी, चित्रपट आणि जाहिरातींवर बंदी; स्टॅलिन सरकारने आणले विधेयक
3
'निवडणूक आयोगाची वेबसाईट बाहेरुन कोण तर चालवतंय', जयंत पाटलांचा गंभीर आरोप
4
"माझ्या नवऱ्याला मार, नाहीतर मी..."; ५ मुलांच्या आईचा हट्ट, बॉयफ्रेंडपेक्षा १२ वर्षांनी आहे मोठी
5
“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
6
“राहुल गांधींनी मतदारयादीतील घोळ देश पातळीवर मांडला, हे निकोप लोकशाहीला घातक”: थोरात
7
प्रॅक्टिस वेळी 'दादागिरी'; Live मॅचमध्ये आली तोंडावर पडण्याची वेळ! पृथ्वीसह चौघांच्या पदरी भोपळा
8
"पत्नीला म्हणाले, बसमध्ये बसलोय", तो कॉल ठरला शेवटचा, जितेशचा होरपळून गेला जीव; ओळखही पटेना
9
तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी...
10
Pankaj Dhir: 'महाभारत'मधील 'कर्ण' काळाच्या पडद्याआड, अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगानं निधन
11
बाबासाहेब पाटलांनी पालकमंत्रिपद सोडलं, त्यांच्या जागी 'या' नेत्याला मिळाली जबाबदारी
12
दिवाळीपूर्वी 'या' दिग्गज कंपनीचा मोठा झटका! १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार? काय आहे कारण?
13
मोठी रिअल इस्टेट डील; अदानी खरेदी करणार सहाराच्या 88 मालमत्ता; किती कोटींचा व्यवहार?
14
Priyal Yadav : प्रेरणादायी! वडील तिसरी, आई सातवी पास; अकरावी नापास प्रियल कशी झाली डेप्युटी कलेक्टर?
15
'जंगलात जरी बोलवलं तरी गेलो असतो'; पोलिसांना दिलेले वचन CM फडणवीसांनी पूर्ण केले, कार्यक्रम रद्द करुन पोहोचले गडचिरोलीत
16
“...तोपर्यंत निवडणुका घेऊच नका, मतदारयादीची लपवाछपवी का?”; राज ठाकरेंची आयोगाला विचारणा
17
आधी बंपर लॉटरी लावली... आता एलजीच्या एमडींनी हिंदीत भाषण केलं; मन जिंकताच दिग्गज उद्योजकानंही केलं कौतुक
18
प्रशांत किशोर यांचा मोठा निर्णय; बिहार विधानसभा निवडणुकीतून घेतली माघार, कारण काय..?
19
अ‍ॅश्ले टेलिस यांना ट्रम्प भारतात राजदूत बनवणार होते, अचानक हेरगिरी प्रकरणी अटक; चीनशी कनेक्शनचा आरोप
20
एकनाथ शिंदेंचा काँग्रेससह शरद पवार गटाला मोठा धक्का, बडे नेते शिवसेनेत; पक्षाची ताकद वाढली

झिम्बाब्वेचे यश शानदार : आश्विन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 03:13 IST

‘झिम्बाब्वेने श्रीलंकेमध्ये जिंकलेली एकदिवसीय मालिका शानदार यश आहे. अशा अनपेक्षित निकालांमुळे क्रिकेटमध्ये कडवी स्पर्धा कायम राखण्यास मदत मिळेल,’ असे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘झिम्बाब्वेने श्रीलंकेमध्ये जिंकलेली एकदिवसीय मालिका शानदार यश आहे. अशा अनपेक्षित निकालांमुळे क्रिकेटमध्ये कडवी स्पर्धा कायम राखण्यास मदत मिळेल,’ असे वक्तव्य भारताचा अव्वल आॅफस्पिनर रविचंद्रन आश्विन याने केले. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमादरम्यान आश्विनने आपले मत मांडले. आश्विनने सांगितले की, ‘झिम्बाब्वेचा श्रीलंकेविरुध्दच्या विजयाबद्दल सांगायचे झाल्यास, खेळ अशाच प्रकारे चालतो. कोणीही हरु शकतो आणि कोणीही जिंकू शकतो. उद्या अफगाणिस्तानही बलाढ्य संघाला धक्का देऊ शकतो. अशा प्रकारेच खेळ पुढे गेला पाहिजे. खेळातील कडव्या स्पर्धेसाठी हे आवश्यक आहे.’ श्रीलंकेविरुद्धची पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका झिम्बाब्वेने ३-२ अशी जिंकून क्रिकेटविश्वात खळबळ उडवली होती. आगामी २१ जुलैपासून भारताचा श्रीलंका दौरा सुरु होत असून या दौऱ्यात विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ तीन कसोटी, पाच एकदिवसीय आणि एकमेव टी२० सामन्याची मालिका खेळेल. दरम्यान, या दौऱ्यात सुरुवातीला दोनदिवसीय सराव सामनाही खेळविण्यात येणार आहे. दरम्यान, यावेळी आश्विनने नवे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या निवडीवर प्रतिक्रीया देण्यास टाळले. ‘माझ्या मते नवे प्रशिक्षक, नवे सहयोगी स्टाफ माझ्या अधिकार क्षेत्रात येत नसल्याने यावर बोलणे उचित नाही,’ असे आश्विनने यावेळी म्हटले.