शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
2
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
3
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
4
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
5
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
6
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
7
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
8
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
9
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
10
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
12
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
13
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
14
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
15
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
16
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
17
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
18
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
19
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
20
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन

युवा भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी

By admin | Updated: April 18, 2017 02:07 IST

आयपीएलचे दहावे सत्र सुरू होऊन दोन आठवडे झाले, पण अद्यापही कोणता संघ सर्वात पुढे जाईल हे आत्ताच सांगणे कठीण झाले आहे

अयाझ मेमन, संपादकीय सल्लागारआयपीएलचे दहावे सत्र सुरू होऊन दोन आठवडे झाले, पण अद्यापही कोणता संघ सर्वात पुढे जाईल हे आत्ताच सांगणे कठीण झाले आहे. पण गुणतालिका बघता मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स हे टॉप थ्रीमध्ये स्थान टिकवून आहेत. तर रायजिंग पुणे, गुजरात लायन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू हे शेवटच्या तीनमध्ये अडकून पडले आहेत. आजच्या घडीचा मर्यादित षटकांच्या सामन्यातील सर्वोत्कृष्ट समजल्या जाणाऱ्या विराट कोहलीचा आरसीबी संघ गुण तालिकेत तळाला आहे. त्यापाठोपाठ फलंदाजीची मजबूत फळी असणारा सुरेश रैनाचा गुजरातचा संघ शेवटून दोन नंबरवर आहे. त्यानंतर शेवटून तिसऱ्या क्रमांकावर नंबर लागतो तो रायजिंग पुणे संघाचा. या संघात महेंद्रसिंग धोनी, स्टिव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, अजिंक्य रहाणे यासारखे दिग्गज खेळाडू असताना हा संघ फारशी चमकदार कामगिरी करू शकलेला नाही. याच्यावरून संघाचा बॅलन्स किती महत्त्वाचा आहे हे लक्षात येते. फक्त चांगले गोलंदाज आहेत पण फलंदाजी मजबूत नसेल तर विजय मिळणे कठीण जाते. तसेच तुमच्याकडे चांगले फलंदाज असतील आणि गोलंदाजांची वानवा असेल तर तुम्ही जिंकू शकत नाही. आपण पाहिले आहे की, विराट कोहली, ए.बी. डिव्हिलियर्स आणि शेन वॉटसन हे दोघे चांगले खेळत असूनही संघ जिंकू शकत नाही. आयपीएलमधील सगळे संघ जवळ जवळ समान पातळीवरचे आहेत. एखाद्या संघाला थोडा जरी फायदा मिळाला तर तो सामना आपल्या खिशात घालतो. मला यंदा दोन संघांनी सगळ्यात जास्त इम्प्रेस केले आहे, ते म्हणजे, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स. मुंबईचे युवा खेळाडू चांगली कामगिरी करीत आहेत, तर दिल्लीचे सगळेच खेळाडू चमकदार परफॉर्मन्स देत आहेत. मॅक्सवेल, पोलार्ड, बेन स्टोक्स, डेव्हिड वॉर्नर यासारख्या परदेशी खेळाडूंनी आपआपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी केली आहे. भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर नजर टाकली असता मुंबई इंडियन्सच्या नितीश राणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आतापर्यंतच्या सर्व सामन्यात त्याने कामगिरीत सातत्य राखले आहे. तो बेडरपणे खेळतो, त्याच्या फटक्यांचे टायमिंग चांगले आहे. शिवाय फटक्यात ताकद असल्याने धावांची थैली भरत आहे. त्याच्याशिवाय हार्दिक आणि कुणाल पांड्या हे दोघेही मुंबईसाठी चांगला खेळ करीत आहेत. भारतीय गोलंदाजांचा विचार करता फिरकी गोलंदाज विशेषत: यजुवेंद्र चहल हा चांगली कामगिरी करीत आहे. भुवनेश्वर कुमारने दहा बळी मिळवून पर्पल कॅप मिळवली आहे. स्विंग हे त्याचे प्रमुख हत्यार आहे, तो इनस्विंग, आऊटस्विंग तर करतोच शिवाय तो लेट स्विंग करण्यात माहिर आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याने आपली गती वाढवली आहे. त्यामुळे तो धोकादायक बनला आहे. आॅस्ट्रेलियाविरुध्दच्या मालिकेत चांगली कामगिरी करणारा उमेश यादवही चांगली गोलंदाजी करीत आहे. एकंदरीत अनेक भारतीय खेळाडूंना हे सत्र आतापर्यंत चांगले ठरले आहे. पण भारताचे कोहली, धोनी, रैना यांच्यासारखे स्टार खेळाडू पुढे जाऊन मॅचविनिंग परफॉर्मन्स करतात का याकडे सर्वांचे लक्ष आहे.