शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
4
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
5
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
6
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
7
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
9
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
10
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
11
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
12
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
13
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
14
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
15
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
16
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
17
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
18
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
20
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या

युवा भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी

By admin | Updated: April 18, 2017 02:07 IST

आयपीएलचे दहावे सत्र सुरू होऊन दोन आठवडे झाले, पण अद्यापही कोणता संघ सर्वात पुढे जाईल हे आत्ताच सांगणे कठीण झाले आहे

अयाझ मेमन, संपादकीय सल्लागारआयपीएलचे दहावे सत्र सुरू होऊन दोन आठवडे झाले, पण अद्यापही कोणता संघ सर्वात पुढे जाईल हे आत्ताच सांगणे कठीण झाले आहे. पण गुणतालिका बघता मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स हे टॉप थ्रीमध्ये स्थान टिकवून आहेत. तर रायजिंग पुणे, गुजरात लायन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू हे शेवटच्या तीनमध्ये अडकून पडले आहेत. आजच्या घडीचा मर्यादित षटकांच्या सामन्यातील सर्वोत्कृष्ट समजल्या जाणाऱ्या विराट कोहलीचा आरसीबी संघ गुण तालिकेत तळाला आहे. त्यापाठोपाठ फलंदाजीची मजबूत फळी असणारा सुरेश रैनाचा गुजरातचा संघ शेवटून दोन नंबरवर आहे. त्यानंतर शेवटून तिसऱ्या क्रमांकावर नंबर लागतो तो रायजिंग पुणे संघाचा. या संघात महेंद्रसिंग धोनी, स्टिव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, अजिंक्य रहाणे यासारखे दिग्गज खेळाडू असताना हा संघ फारशी चमकदार कामगिरी करू शकलेला नाही. याच्यावरून संघाचा बॅलन्स किती महत्त्वाचा आहे हे लक्षात येते. फक्त चांगले गोलंदाज आहेत पण फलंदाजी मजबूत नसेल तर विजय मिळणे कठीण जाते. तसेच तुमच्याकडे चांगले फलंदाज असतील आणि गोलंदाजांची वानवा असेल तर तुम्ही जिंकू शकत नाही. आपण पाहिले आहे की, विराट कोहली, ए.बी. डिव्हिलियर्स आणि शेन वॉटसन हे दोघे चांगले खेळत असूनही संघ जिंकू शकत नाही. आयपीएलमधील सगळे संघ जवळ जवळ समान पातळीवरचे आहेत. एखाद्या संघाला थोडा जरी फायदा मिळाला तर तो सामना आपल्या खिशात घालतो. मला यंदा दोन संघांनी सगळ्यात जास्त इम्प्रेस केले आहे, ते म्हणजे, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स. मुंबईचे युवा खेळाडू चांगली कामगिरी करीत आहेत, तर दिल्लीचे सगळेच खेळाडू चमकदार परफॉर्मन्स देत आहेत. मॅक्सवेल, पोलार्ड, बेन स्टोक्स, डेव्हिड वॉर्नर यासारख्या परदेशी खेळाडूंनी आपआपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी केली आहे. भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर नजर टाकली असता मुंबई इंडियन्सच्या नितीश राणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आतापर्यंतच्या सर्व सामन्यात त्याने कामगिरीत सातत्य राखले आहे. तो बेडरपणे खेळतो, त्याच्या फटक्यांचे टायमिंग चांगले आहे. शिवाय फटक्यात ताकद असल्याने धावांची थैली भरत आहे. त्याच्याशिवाय हार्दिक आणि कुणाल पांड्या हे दोघेही मुंबईसाठी चांगला खेळ करीत आहेत. भारतीय गोलंदाजांचा विचार करता फिरकी गोलंदाज विशेषत: यजुवेंद्र चहल हा चांगली कामगिरी करीत आहे. भुवनेश्वर कुमारने दहा बळी मिळवून पर्पल कॅप मिळवली आहे. स्विंग हे त्याचे प्रमुख हत्यार आहे, तो इनस्विंग, आऊटस्विंग तर करतोच शिवाय तो लेट स्विंग करण्यात माहिर आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याने आपली गती वाढवली आहे. त्यामुळे तो धोकादायक बनला आहे. आॅस्ट्रेलियाविरुध्दच्या मालिकेत चांगली कामगिरी करणारा उमेश यादवही चांगली गोलंदाजी करीत आहे. एकंदरीत अनेक भारतीय खेळाडूंना हे सत्र आतापर्यंत चांगले ठरले आहे. पण भारताचे कोहली, धोनी, रैना यांच्यासारखे स्टार खेळाडू पुढे जाऊन मॅचविनिंग परफॉर्मन्स करतात का याकडे सर्वांचे लक्ष आहे.