शहरं
Join us  
Trending Stories
1
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
3
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
4
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
5
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
6
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
7
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
8
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
9
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
10
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
11
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
12
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी
13
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
14
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
15
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
16
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
17
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
18
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
19
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
20
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   

युवा भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी

By admin | Updated: April 18, 2017 02:07 IST

आयपीएलचे दहावे सत्र सुरू होऊन दोन आठवडे झाले, पण अद्यापही कोणता संघ सर्वात पुढे जाईल हे आत्ताच सांगणे कठीण झाले आहे

अयाझ मेमन, संपादकीय सल्लागारआयपीएलचे दहावे सत्र सुरू होऊन दोन आठवडे झाले, पण अद्यापही कोणता संघ सर्वात पुढे जाईल हे आत्ताच सांगणे कठीण झाले आहे. पण गुणतालिका बघता मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स हे टॉप थ्रीमध्ये स्थान टिकवून आहेत. तर रायजिंग पुणे, गुजरात लायन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू हे शेवटच्या तीनमध्ये अडकून पडले आहेत. आजच्या घडीचा मर्यादित षटकांच्या सामन्यातील सर्वोत्कृष्ट समजल्या जाणाऱ्या विराट कोहलीचा आरसीबी संघ गुण तालिकेत तळाला आहे. त्यापाठोपाठ फलंदाजीची मजबूत फळी असणारा सुरेश रैनाचा गुजरातचा संघ शेवटून दोन नंबरवर आहे. त्यानंतर शेवटून तिसऱ्या क्रमांकावर नंबर लागतो तो रायजिंग पुणे संघाचा. या संघात महेंद्रसिंग धोनी, स्टिव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, अजिंक्य रहाणे यासारखे दिग्गज खेळाडू असताना हा संघ फारशी चमकदार कामगिरी करू शकलेला नाही. याच्यावरून संघाचा बॅलन्स किती महत्त्वाचा आहे हे लक्षात येते. फक्त चांगले गोलंदाज आहेत पण फलंदाजी मजबूत नसेल तर विजय मिळणे कठीण जाते. तसेच तुमच्याकडे चांगले फलंदाज असतील आणि गोलंदाजांची वानवा असेल तर तुम्ही जिंकू शकत नाही. आपण पाहिले आहे की, विराट कोहली, ए.बी. डिव्हिलियर्स आणि शेन वॉटसन हे दोघे चांगले खेळत असूनही संघ जिंकू शकत नाही. आयपीएलमधील सगळे संघ जवळ जवळ समान पातळीवरचे आहेत. एखाद्या संघाला थोडा जरी फायदा मिळाला तर तो सामना आपल्या खिशात घालतो. मला यंदा दोन संघांनी सगळ्यात जास्त इम्प्रेस केले आहे, ते म्हणजे, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स. मुंबईचे युवा खेळाडू चांगली कामगिरी करीत आहेत, तर दिल्लीचे सगळेच खेळाडू चमकदार परफॉर्मन्स देत आहेत. मॅक्सवेल, पोलार्ड, बेन स्टोक्स, डेव्हिड वॉर्नर यासारख्या परदेशी खेळाडूंनी आपआपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी केली आहे. भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर नजर टाकली असता मुंबई इंडियन्सच्या नितीश राणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आतापर्यंतच्या सर्व सामन्यात त्याने कामगिरीत सातत्य राखले आहे. तो बेडरपणे खेळतो, त्याच्या फटक्यांचे टायमिंग चांगले आहे. शिवाय फटक्यात ताकद असल्याने धावांची थैली भरत आहे. त्याच्याशिवाय हार्दिक आणि कुणाल पांड्या हे दोघेही मुंबईसाठी चांगला खेळ करीत आहेत. भारतीय गोलंदाजांचा विचार करता फिरकी गोलंदाज विशेषत: यजुवेंद्र चहल हा चांगली कामगिरी करीत आहे. भुवनेश्वर कुमारने दहा बळी मिळवून पर्पल कॅप मिळवली आहे. स्विंग हे त्याचे प्रमुख हत्यार आहे, तो इनस्विंग, आऊटस्विंग तर करतोच शिवाय तो लेट स्विंग करण्यात माहिर आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याने आपली गती वाढवली आहे. त्यामुळे तो धोकादायक बनला आहे. आॅस्ट्रेलियाविरुध्दच्या मालिकेत चांगली कामगिरी करणारा उमेश यादवही चांगली गोलंदाजी करीत आहे. एकंदरीत अनेक भारतीय खेळाडूंना हे सत्र आतापर्यंत चांगले ठरले आहे. पण भारताचे कोहली, धोनी, रैना यांच्यासारखे स्टार खेळाडू पुढे जाऊन मॅचविनिंग परफॉर्मन्स करतात का याकडे सर्वांचे लक्ष आहे.