शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

युवा भारतीय संघाचा तिरंगी विजय

By admin | Updated: November 30, 2015 00:56 IST

गोलंदाज मयंक डागर (३२ धावांत ३ बळी) याची सुरेख गोलंदाजी आणि सर्फराज खान (नाबाद ५९) याची जबरदस्त अर्धशतकी खेळी या बळावर भारतीय संघाने रविवारी

कोलकाता : गोलंदाज मयंक डागर (३२ धावांत ३ बळी) याची सुरेख गोलंदाजी आणि सर्फराज खान (नाबाद ५९) याची जबरदस्त अर्धशतकी खेळी या बळावर भारतीय संघाने रविवारी येथे बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात तब्बल २१९ चेंडू राखून सात विकेट्सने विजय मिळवताना विजेतेपद पटकावले.राहुल द्रविडच्या मार्गदर्शनात जबरदस्त कामगिरी करताना भारतीय संघाने प्रतिस्पर्धी बांगलादेशकडून मिळालेले ११७ धावांचे सहज लक्ष्य २१९ चेंडू बाकी असताना १३.३ षटकांत ३ गडी गमावून सहज पूर्ण केले आणि ही मालिका जिंकली. लक्ष्याचा पाठलाग करताना सर्फराज खान आणि कर्णधार रिकी भुई यांनी चौथ्या गड्यासाठी ७५ धावांची मॅचविनिंग भागीदारी केली.सर्फराजने २७ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ५९ धावा केल्या, तर रिकीने २0 चेंडूंत ४ चौकारांसह नाबाद २0 धावांचे योगदान दिले. त्याआधी सलामीवीर वॉशिंग्टन सुंदरने १२ व रिषभ पंतने २६ धावा केल्या. अमनदीप खरे शून्यावर बाद झाला. बांगलादेशकडून सईद सरकारने २३ व मेंहदी हसन व सालेह अहमद शावोन याने प्रत्येकी १ गडी बाद केला.त्याआधी बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला; परंतु भारतीय संघाच्या जबरदस्त गोलंदाजीसमोर यजमान संघ ३६.५ षटकांत फक्त ११६ धावांत गारद झाला. त्यांच्या चार फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही व एकूण सात फलंदाज दुहेरी आकडी धावसंख्याही पार करू शकले नाहीत.बांगलादेशकडून नजमुल हुसैन शांतो याने ६६ चेंडूंत ५ चौकार, एका षटकारासह सर्वाधिक ४५ धावांची खेळी केली. याशिवाय जयराज शेखने २८ व जाकर अलीने २४ धावा केल्या.भारताकडून डागरने ९ षटकांत ३२ धावा देत नजमल हुसैन (४५), मेहदी हसन (0) आणि मोहम्मद सैफद्दीन (0) यांना बाद केले. त्याला अन्य गोलंदाज शुभम मावी, महिपाल लोमरोर यांनी प्रत्येकी २ तर अवेश खान, खलील अहमद यांनी प्रत्येकी १ गडी बाद करीत साथ दिली. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक : बांगलादेश : ३६.५ षटकांत सर्वबाद ११६. (नजमुल हुसैन ४५, जयराज शेख २८, जाकर अली २४. मयंक डागर ३/३२, महिपाल रोमरोर २/११, शुभम मावी २/२१).भारत : १३.३ षटकांत ३ बाद ११७. (सर्फराज नाबाद ५९, रिषभ पंत २६, रिकी भुई २0)द्रविड प्रशिक्षक असल्याचा विश्वास बसत नाही : सर्फराजभारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याविषयी पूर्ण श्रद्धा व्यक्त करताना उदयोन्मुख भारतीय फलंदाज सर्फराज खान याने त्याला हा माजी कर्णधार त्याचा प्रशिक्षक असल्याचा विश्वास बसत नसल्याचे म्हटले आहे.बांगलादेशात २२ जानेवारी ते १४ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या अंडर १९ वर्ल्डकपआधी द्रविडचा संघावर विशेष खोलवर प्रभाव पडला आहे. हा प्रभाव बांगलादेशविरुद्ध अंतिम सामन्यातील सामनावीर सर्फराज असो अथवा मालिकावीर रिषभ पंत. त्यांच्यासाठी द्रविड प्रशिक्षक असणे हे स्वप्न सत्यात उतरण्यासारखे आहे.सर्फराज म्हणाला, ‘‘आतापर्यंत मी त्यांना टीव्हीवर शतक झळकावताना पाहिले होते. ते आमचे प्रशिक्षक आहेत आणि आमच्या बरोबर आहेत यावर विश्वास बसणे माझ्यासाठी कठीण आहे. वर्ल्डकपच्या तयारीसाठी त्यांचा अनुभव महत्त्वाचा ठरेल असा मला पूर्ण विश्वास वाटतो. ते खूप शांतचित्त आहेत आणि हे त्यांच्यात विशेष आहे. त्यांनी कधीही मला मी धावा करीत नाही असे म्हटले नाही; परंतु प्रत्येक दिवशी शिकावे लागेल हे त्यांनी मला सांगितले. त्यांनी मला माझा नैसर्गिक खेळ करण्यास सांगितले. त्यांनी मला खूप मदत केली. मी त्यांचा ऋणी आहे.’’