शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

युजवेंद्र चहलसमोर इंग्लंडचं लोटांगण, मालिकाही जिंकली

By admin | Updated: February 1, 2017 23:38 IST

चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम आणि निर्णायक सामन्यात भारताने इंग्लंडचा 75 धावांनी पराभव केला. 6 विकेट घेणा-या फिरकीपटू युजवेंद्र चहलसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी अक्षरश: लोटांगण घातलं.

ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 1 -  चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम आणि निर्णायक सामन्यात भारताने इंग्लंडचा 75 धावांनी पराभव केला. 6 विकेट घेणा-या फिरकीपटू युजवेंद्र चहलसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी अक्षरश: लोटांगण घातलं. 203 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडचा डाव केवळ 127 धावातच आटोपला. यासोबत भारताने टी-20 सामन्यांची मालिका  2-1 अशी जिंकली. 
 
पहिल्या दोन सामन्यांप्रमाणे तिस-याही सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकले. इंग्लंडने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, फलंदाजीस उतरलेल्या भारताची सुरूवात खराब झाली.  सामन्याच्या दुस-याच षटकात विराट कोहली केवळ 2 धावांवर धावबाद झाला. मात्र, त्यानंतर मैदानावर आलेल्या सुरेश रैनाने के.एल राहुलच्या साथीने इंग्लंडवर प्रतिआक्रमण चढवत धावांची गती कमी होऊ दिली नाही. भारताकडून रैना(63), धोनी(56) आणि युवराजने(27) तुफान फटकेबाजी केली. या जोरावर भारताने इंग्लंडला 203 धावांचं आव्हान दिलं होतं. 
 
203 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरूवातही खराब झाली. दुस-याच षटकात फिरकीपटू चहलने इंग्लंडचा सलामीवीर एस बिलिंग्सला भोपळाही फोडू न देता रैनाकरवी झेलबाद केले. त्यानंतर मैदानावर आलेल्या जो रूटने जेसन रॉयच्या साथीने भारताच्या गोलंदाजीवर प्रतिहल्ला चढवला. रॉय मोठी धावसंख्या उभारण्यास अपयशी ठरला. 32 धावांवर रॉयला मिश्राने बाद केलं. त्याच्याजागी आलेल्या मॉर्गन आणि रूट जोडीने भारताच्या गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवला. मात्र, 14 व्या षटकात मॉर्गन(40) आणि रूटला(42) लागोपाठ बाद करत चहलने इंग्लंडचं कंबरडं मोडलं.   त्यानंतर तर इंग्लंडचे फलंदाज मैदानात केवळ हजेरी लावण्यासाठी येत होते. इंग्लंडचे शेवटचे आठ फलंदाज केवळ 8 धावातच परतले, तर इंग्लंडच्या 6 फलंदाजांना भोपळाही फोडता नाही आला.  भारताकडून चहलने 4 षटकात केवळ 25 धावा देत 6 गडी बाद केले. त्याला जसप्रित बुमराहने तीन विकेट घेत योग्य साथ दिली. अमित मिश्रानेही एक विकेट घेतली.