शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

युजवेंद्र चहलसमोर इंग्लंडचं लोटांगण, मालिकाही जिंकली

By admin | Updated: February 1, 2017 23:38 IST

चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम आणि निर्णायक सामन्यात भारताने इंग्लंडचा 75 धावांनी पराभव केला. 6 विकेट घेणा-या फिरकीपटू युजवेंद्र चहलसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी अक्षरश: लोटांगण घातलं.

ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 1 -  चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम आणि निर्णायक सामन्यात भारताने इंग्लंडचा 75 धावांनी पराभव केला. 6 विकेट घेणा-या फिरकीपटू युजवेंद्र चहलसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी अक्षरश: लोटांगण घातलं. 203 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडचा डाव केवळ 127 धावातच आटोपला. यासोबत भारताने टी-20 सामन्यांची मालिका  2-1 अशी जिंकली. 
 
पहिल्या दोन सामन्यांप्रमाणे तिस-याही सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकले. इंग्लंडने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, फलंदाजीस उतरलेल्या भारताची सुरूवात खराब झाली.  सामन्याच्या दुस-याच षटकात विराट कोहली केवळ 2 धावांवर धावबाद झाला. मात्र, त्यानंतर मैदानावर आलेल्या सुरेश रैनाने के.एल राहुलच्या साथीने इंग्लंडवर प्रतिआक्रमण चढवत धावांची गती कमी होऊ दिली नाही. भारताकडून रैना(63), धोनी(56) आणि युवराजने(27) तुफान फटकेबाजी केली. या जोरावर भारताने इंग्लंडला 203 धावांचं आव्हान दिलं होतं. 
 
203 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरूवातही खराब झाली. दुस-याच षटकात फिरकीपटू चहलने इंग्लंडचा सलामीवीर एस बिलिंग्सला भोपळाही फोडू न देता रैनाकरवी झेलबाद केले. त्यानंतर मैदानावर आलेल्या जो रूटने जेसन रॉयच्या साथीने भारताच्या गोलंदाजीवर प्रतिहल्ला चढवला. रॉय मोठी धावसंख्या उभारण्यास अपयशी ठरला. 32 धावांवर रॉयला मिश्राने बाद केलं. त्याच्याजागी आलेल्या मॉर्गन आणि रूट जोडीने भारताच्या गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवला. मात्र, 14 व्या षटकात मॉर्गन(40) आणि रूटला(42) लागोपाठ बाद करत चहलने इंग्लंडचं कंबरडं मोडलं.   त्यानंतर तर इंग्लंडचे फलंदाज मैदानात केवळ हजेरी लावण्यासाठी येत होते. इंग्लंडचे शेवटचे आठ फलंदाज केवळ 8 धावातच परतले, तर इंग्लंडच्या 6 फलंदाजांना भोपळाही फोडता नाही आला.  भारताकडून चहलने 4 षटकात केवळ 25 धावा देत 6 गडी बाद केले. त्याला जसप्रित बुमराहने तीन विकेट घेत योग्य साथ दिली. अमित मिश्रानेही एक विकेट घेतली.