शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

‘विशेष’ खेळाडूंना डब्ल्यूडब्ल्यूईचा ‘खास’ पाठिंबा

By admin | Updated: July 18, 2015 00:33 IST

लॉस एंजेलिस (अमेरिका) येथे २५ जुलै ते २ आॅगस्ट दरम्यान पार पडणाऱ्या ‘स्पेशल आॅलिम्पिक्स वर्ल्ड गेम्स’ स्पर्धेसाठी भारताचा संघ सज्ज असून या स्पर्धेसाठी ‘वर्ल्ड रेसलिंग

मुंबई : लॉस एंजेलिस (अमेरिका) येथे २५ जुलै ते २ आॅगस्ट दरम्यान पार पडणाऱ्या ‘स्पेशल आॅलिम्पिक्स वर्ल्ड गेम्स’ स्पर्धेसाठी भारताचा संघ सज्ज असून या स्पर्धेसाठी ‘वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट’ने (डब्ल्यू.डब्ल्यू.ई.) भारतीय संघाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. या स्पर्धेत भारतीय संघ ‘स्पेशल आॅलिम्पिक्स भारत’ या नावाने सहभागी होणार असून शुक्रवारी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमामध्ये याबाबत माहिती देण्यात आली. २४ जुलैला रात्री भारतीय संघ लॉस एंजेलिसला रवान होणार आहे.‘स्पेशल आॅलिम्पिक्स भारत’चे राष्ट्रीय क्रीडा संचालक व्हीक्टर आर. वाझ व डब्ल्यूडब्ल्यूई इंडियाचे महाव्यवस्थापक रुकिन किझिबाश यांनी भारतीय संघातील निवडक खेळाडूंच्या उपस्थितीत स्पर्धेबाबत माहिती दिली. दरम्यान यावेळी आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते भारतीय संघाच्या जॅकेटचे अनावरण देखील झाले. यावेळी स्नेहा वर्मा, दिशा मारु (दोघेही स्विमिंग), नितीन सिंग, फातिमा रॉड्रिग्स (दोघेही बास्केटबॉल), प्रिया गडा (रोलर स्केटींग), मिहिर सोनी आणि विपुल जैन (दोघेही सॉफ्टबॉल) या खेळाडूंची उपस्थिती होती.एकूण १७० देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत भारताचा खेळाडू, प्रशिक्षक आणि अधिकारी असा एकूण ३२०हून अधिक सदस्यांचा मोठा चमू सहभागी होणार आहे. अ‍ॅथलेटीक्स, अ‍ॅकेवेटीक, बोक्के, बास्केटबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, व्हॉलिबॉल, फुटबॉल, पॉवरलिफ्टींग, रोलर स्केटींग, हँडबॉल, सायकलिंग आणि गोल्फ या खेळांमद्ये भारताचे खेळाडू पदक मिळवण्यासाठी प्रयत्न करतील. या स्पर्धेत भारताकडे बलाढ्य प्रतिस्पर्धी म्हणून पाहिले जाते. २०११ साली झालेल्या गतस्पर्धेत १८४ खेळाडूंचा सहभाग असलेल्या भारताने तब्बल २४८ पदकांची लयलूट करताना ७८ सुवर्ण, ७७ रौप्य आणि ९३ कांस्य पदाकांचस कमाई केली होती. यामुळेचे भारताच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.(क्रीडा प्रतिनिधी)