शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
2
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
3
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
4
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
5
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
6
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
7
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
8
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
9
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
10
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
11
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
12
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
13
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
14
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
15
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
16
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
17
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
18
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
19
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
20
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप

...तर सचिनची संघातून हकालपट्टी झाली असती!

By admin | Updated: September 22, 2016 19:44 IST

२०१२ मध्ये वन डे संघातून सचिन तेंडुलकरने स्वत:हून निवृत्ती घेतली अन इज्जत शाबूत ठेवली. अन्यथा त्याची हकालपट्टी अटळ होती.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. २२ : २०१२ मध्ये वन डे संघातून सचिन तेंडुलकरने स्वत:हून निवृत्ती घेतली अन इज्जत शाबूत ठेवली. अन्यथा त्याची हकालपट्टी अटळ  होती. टीम इंडियाचे माजी निवडकर्ते संदीप पाटील यांनी गुरुवारी हा गौप्यस्फोट केला.सचिन २०१२ मध्ये वन डेतून आणि २०१३ मध्ये २०० वी कसोटी खेळल्यानंतर कसोटी क्रिकेटमधून देखील निवृत्त झाला. कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यात सचिनची संघातील अवस्था जागा अडविणारा खेळाडू अशी झाली होती. त्याने २०१२ मध्ये निवृत्ती घेतली नसती तर हकालपट्टी करण्यासाठी निवडकर्ते तयार होते, असे पाटील यांनी एका मराठी वाहिनीशी बोलताना सांगितले.

राष्ट्रीय निवड समिती प्रमुख म्हणून कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर पाटील पुढे म्हणाले,ह्य१२ डिसेंबर २०१२ ला नागपुरात इंग्लंडविरुद्ध कसोटी खेळली जात असताना तत्कालीन निवडकर्त्यांनी त्याची भेट घेतली. सचिनला त्याच्या भविष्यातील योजनांबद्दल विचारले तेव्हा मी निवृत्ती वैगरे घेणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले. पण निवड समितीने सचिनला बाहेर करण्याचा निर्णय घेत बोर्डाला तसे सूचित केले होते. भविष्यात काय वाढून ठेवले आहे, हे सचिनला कळले असावे. आमची पुढची बैठक झाली तेव्हा वन डेतून निवृत्त होणार असल्याचे सचिनने आम्हाला कळविले. त्याने हा निर्णय घेतला नसता तर त्याची हकालपट्टी अटळ होती.

कसोटीवर लक्ष केंद्रित करण्याचा सचिनचा विचार असावा. त्याने मला आणि संजय जगदळे यांना फोन केला. ४६३ वन डे (४६ शतकांसह १८४२६ धावा) खेळल्यानंतर २३ डिसेंबर २०१२ ला निवृत्ती जाहीर केली. वर्षभरानंतर कसोटीतून निवृत्ती घेण्यासाठी सचिनला बाध्य करण्यात आले. हा खुलासा देखील संदीप पाटील यांनी केला. सचिनच्या निवृत्तीसाठी दोन सामन्यांची कसोटी मालिका बोर्डाच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली. २०० कसोटीत ५१ शतकांसह १५९२१ धावा काढणारा हा खेळाडू १६ नोव्हेंबर २०१३ रोजी निवृत्त झाला. आपल्या कार्यकाळात काही गोष्टी मनाविरुद्ध घडल्याची खंत देखील पाटील यांनी व्यक्त केली