शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

विश्वविजेतेपदाचा ‘कॅरेबियन कार्निव्हल’

By admin | Updated: April 4, 2016 03:18 IST

रविवारचा दिवस वेस्ट इंडिज आणि टी २० क्रिकेटसाठी इतिहास घडवणारा ठरला...सायंकाळी विंडिजच्या महिलांनी बलाढ्य आॅस्ट्रेलियन संघाला नमवत प्रथमच जगज्जतेपद पटकावले.

कोलकाता : रविवारचा दिवस वेस्ट इंडिज आणि टी २० क्रिकेटसाठी इतिहास घडवणारा ठरला...सायंकाळी विंडिजच्या महिलांनी बलाढ्य आॅस्ट्रेलियन संघाला नमवत प्रथमच जगज्जतेपद पटकावले. तर रात्री भारताला हरवत अंतिम फेरी गाठणाऱ्या विंडिजच्या पुरुष संघाने पराभवाच्या उंबरठ्यावर असताना शेवटच्या षटकातील कार्लोस ब्रेथवेटच्या सलग चार षटकारांच्या आतषबाजीच्या जोरावर इंग्लंडला धूळ चारत विश्वविजेतेपदावर दुसऱ्यांदा मोहोर उमटवली. त्यानंतर ईडन गार्डनवर ‘कॅरेबियन कार्निव्हल’च साजरा झाला.

ज्याच्या खेळीवर संघाच्या विजयाचे गणित अवलंबून असते तो तुफानी ख्रिस गेल स्वस्तात बाद झाला.... त्याआधी संपूर्ण स्पर्धेत संघातील सर्वात यशस्वी फलंदाजही केवळ एक धाव काढून बाद झाला... तर उपांत्य सामन्यात यजमान भारताविरुध्द एकहाती विजय मिळवून देणारा लेंडल सिमन्सही शून्यावर परतल्यानंतर वेस्ट इंडिज इंग्लंडविरुद्ध हातातील विजेतेपद गमावणार असेच चित्र टी२० अंतिम सामन्यात होते. मात्र एका बाजूला खंबीरपणे उभ्या असलेल्या मार्लन सॅम्युअल्सने अखेरपर्यंत संघाचा किल्ला लढवताना नाबाद ८५ धावांचा विजयी तडाखा देत संघाला दुसऱ्यांदा विश्वविजेपदाचा मान मिळवून दिला. तरी सर्वांच्या लक्षात राहिला तो अंतिम सामन्यात निर्णायक अष्टपैलू खेळी करणारा कार्लोस ब्रेथवेट. अखेरच्या सहा चेंडूवर विंडिजला विजयासाठी १९ धावांची आवश्यकता असताना ब्रेथवेटने चार चेंडूवर सलग चार षटकार ठोकत विजयश्री खेचून आणली.>हा ठरला टर्निंग पॉइंट...सातव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर यष्टीरक्षक जोस बटलरने सॅम्युअल्सचा झेल घेतला आणि इंग्लंडने जल्लोष करण्यास सुरुवात केली. यावेळी विंडिजची अवस्था ३ बाद ३७ धावा अशी होती आणि त्यात सॅम्युअल्सचा बळी जात होता. मात्र रिप्लेमध्ये बटलरकडून झेल घेताना चेंडू जमिनीला टेकल्याचे स्पष्ट झाले व सॅम्युल्सला नाबाद ठरला. पुढे त्यानेच संघासाठी विजयी खेळी केली. हाच सामन्यातील टर्निंग पॉइंट ठरला.2012सालीदेखील अंतिम फेरीत सॅम्युअल्सने श्रीलंकेविरुध्द ७८ धावा कुटताना संघाला विश्वविजेतेपद मिळवून दिले होते. स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणारा विराट कोहलीनंतर (२७३) जो रुट (२४९) दुसऱ्या क्रमांकावर. टी२० विश्वचषकमध्ये विंडिज इंग्लंडविरुध्द अद्यापही अपराजित. 24धावा वेस्ट इंडिजने अखेरच्या षटकात फटकावल्या. हा आंतरराष्ट्रीय टी२० मधील विश्वविक्रम आहे.>अखेरच्या षटकात युवराजची आठवण...२००७ साली झालेल्या पहिल्या वहिल्या टी२० विश्वचषकात विजेता ठरलेल्या भारताच्या युवराज सिंगने इंग्लंडविरुद्धच्या लढतीत एकाच षटकात सहा षटकार ठोकण्याचा विश्वविक्रम केला. विंडिजच्या ब्रेथवेटनेही काहीसा असाचा प्रयत्न करताना इंग्लंडविरुध्द अखेरच्या षटकात पहिल्या चार चेंडूवर षटकार ठोकून युवीची आठवण करुन दिली.2010साली विजेतेपद पटकावलेल्या इंग्लंडचे पहिलेच उपविजेतेपदएकाच विश्वचषक स्पर्धेत एकाच देशाच्या दोन संघांनी बाजी मारण्याची पहिलीच वेळदोन वेळा टी२० विश्वचषक पटकावणारा वेस्ट इंडिज पहिला संघ.दोन वेळा अंतिम फेरी गाठताना वेस्ट इंडिजने दोन्ही वेळा शानदार बाजी मारली.