शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

महिला विश्वकप क्रिकेट : भारताचा 8 विकेट्सनी पराभव

By admin | Updated: July 12, 2017 21:54 IST

हिला विश्वकप क्रिकेट स्पर्धेतील महत्त्वाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाने भारताचा 8 विकेट्सनी पराभव केला.

ऑनलाइन लोकमत
ब्रिस्टल, दि. 12 :  महिला विश्वकप क्रिकेट स्पर्धेतील महत्त्वाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाने भारताचा 8 विकेट्सनी पराभव केला. या सामन्यात पूनम राऊतने ठोकलेल्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी निर्धारित 50 षटकांत 227 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, ऑस्ट्रेलियाने 45.1 षटकात 227 धावांची खेळी करत भारतावर विजय मिळविला.  
या सामन्यात मेग लॅनिंग हिने सर्वाधिक जास्त धावा केल्या. तिने 88 चेंडून एक षटकार आणि सात चौकार लगावत नाबाद 76 धावांची खेळी केली. तर, इलेसी पेसी हिने सुद्धा नाबाद राहून 67 चेंडूत आठ चौकारांची खेळी करत 60 धावा कुटल्या. बेथ मूनीने 45 धावा केल्या, तिला गोलंदाज दिप्ती शर्मा हिने धावबाद केले. निकोल बोल्टोन हिने 36 धावा केल्या. 
याआधी, प्रथम फलंदाजी करताना भारताने कर्णधार मिताली राज आणि पूनम राऊतच्या खेळीच्या बळावर 50 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात 226 धावा केल्या होत्या. या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राच्या पूनम राऊतने शतक झळकावत संघाला मोठी धावसंख्या उभी करण्यात मोलाची भूमिका बजावली. मराठमोळ्या पूनम राऊतने 136 चेंडूचा सामना करताना 106 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान तिने 11 चौकार लगावले.
पूनमने कर्णधार मिताली राजसोबत दुसऱ्या विकेटसाठी 157 धावांची विक्रमी भागिदारी केली. मितालीने 67 धावांची खेळी करत पूनमला योग्य साथ दिली. भारताची सुरुवात आज निरशजनक झाली सलमीवीर स्मृती मानधना अवघ्या तीन धावांवर बाद झाली. अंतिम षटकात हाणामारीच्या षटकात हरमप्रीतने भारताची धावसंख्या झटपट वाढवली. हरमप्रीत कौरने 22 चेंडूत 23 धावांची खेळी केली. वेदा कृष्णमुर्ती आपली चमक दाखवू शकली नाही. ती शुन्य धावांवर बाद झाली. अखेरच्या षटकांत भारताने आपल्या विकेट बहाल केल्या.  
 
 
दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरूद्ध सुरू असलेल्या सामन्यामध्ये मितालीने 6 हजार धावांचा टप्पा ओलांडला. 183 एकदिवसीय सामन्यांमध्ये मितालीने हा विक्रम केला. यापुर्वी इंग्लंडची खेळाडू शार्ले एडवर्डच्या नावावर हा विक्रम होता. शार्ले एडवर्डने 191 सामन्यांमध्ये 5992 धावा बनवल्या होत्या. यासाठी शार्ले एडवर्डने  191 सामन्यांपैकी  180 डावांमध्ये फलंदाजी केली तर मितालीने त्यापेक्षा 16 डाव कमी म्हणजे केवळ 164 डावांमध्येच हा रेकॉर्ड केला. आतापर्यंत मितालीने आपल्या करिअरमध्ये 5 शतकं आणि 48 अर्धशतकं ठोकली आहेत. विशेष म्हणजे तिने शतक ठोकलं, त्या प्रत्येक वेळी भारताला विजय मिळाला आहे. तिची फलंदाजीची सरासरी 51 आहे. सलग 7 अर्धशतकं ठोकण्याचा विक्रमही मितालीच्या नावावर आहे.