शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

महिला विश्वकप क्रिकेट : भारताचा 8 विकेट्सनी पराभव

By admin | Updated: July 12, 2017 21:54 IST

हिला विश्वकप क्रिकेट स्पर्धेतील महत्त्वाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाने भारताचा 8 विकेट्सनी पराभव केला.

ऑनलाइन लोकमत
ब्रिस्टल, दि. 12 :  महिला विश्वकप क्रिकेट स्पर्धेतील महत्त्वाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाने भारताचा 8 विकेट्सनी पराभव केला. या सामन्यात पूनम राऊतने ठोकलेल्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी निर्धारित 50 षटकांत 227 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, ऑस्ट्रेलियाने 45.1 षटकात 227 धावांची खेळी करत भारतावर विजय मिळविला.  
या सामन्यात मेग लॅनिंग हिने सर्वाधिक जास्त धावा केल्या. तिने 88 चेंडून एक षटकार आणि सात चौकार लगावत नाबाद 76 धावांची खेळी केली. तर, इलेसी पेसी हिने सुद्धा नाबाद राहून 67 चेंडूत आठ चौकारांची खेळी करत 60 धावा कुटल्या. बेथ मूनीने 45 धावा केल्या, तिला गोलंदाज दिप्ती शर्मा हिने धावबाद केले. निकोल बोल्टोन हिने 36 धावा केल्या. 
याआधी, प्रथम फलंदाजी करताना भारताने कर्णधार मिताली राज आणि पूनम राऊतच्या खेळीच्या बळावर 50 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात 226 धावा केल्या होत्या. या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राच्या पूनम राऊतने शतक झळकावत संघाला मोठी धावसंख्या उभी करण्यात मोलाची भूमिका बजावली. मराठमोळ्या पूनम राऊतने 136 चेंडूचा सामना करताना 106 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान तिने 11 चौकार लगावले.
पूनमने कर्णधार मिताली राजसोबत दुसऱ्या विकेटसाठी 157 धावांची विक्रमी भागिदारी केली. मितालीने 67 धावांची खेळी करत पूनमला योग्य साथ दिली. भारताची सुरुवात आज निरशजनक झाली सलमीवीर स्मृती मानधना अवघ्या तीन धावांवर बाद झाली. अंतिम षटकात हाणामारीच्या षटकात हरमप्रीतने भारताची धावसंख्या झटपट वाढवली. हरमप्रीत कौरने 22 चेंडूत 23 धावांची खेळी केली. वेदा कृष्णमुर्ती आपली चमक दाखवू शकली नाही. ती शुन्य धावांवर बाद झाली. अखेरच्या षटकांत भारताने आपल्या विकेट बहाल केल्या.  
 
 
दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरूद्ध सुरू असलेल्या सामन्यामध्ये मितालीने 6 हजार धावांचा टप्पा ओलांडला. 183 एकदिवसीय सामन्यांमध्ये मितालीने हा विक्रम केला. यापुर्वी इंग्लंडची खेळाडू शार्ले एडवर्डच्या नावावर हा विक्रम होता. शार्ले एडवर्डने 191 सामन्यांमध्ये 5992 धावा बनवल्या होत्या. यासाठी शार्ले एडवर्डने  191 सामन्यांपैकी  180 डावांमध्ये फलंदाजी केली तर मितालीने त्यापेक्षा 16 डाव कमी म्हणजे केवळ 164 डावांमध्येच हा रेकॉर्ड केला. आतापर्यंत मितालीने आपल्या करिअरमध्ये 5 शतकं आणि 48 अर्धशतकं ठोकली आहेत. विशेष म्हणजे तिने शतक ठोकलं, त्या प्रत्येक वेळी भारताला विजय मिळाला आहे. तिची फलंदाजीची सरासरी 51 आहे. सलग 7 अर्धशतकं ठोकण्याचा विक्रमही मितालीच्या नावावर आहे.