शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
11
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
12
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
13
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
14
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
15
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
16
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
17
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
18
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
19
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
20
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."

महिला संघानेही केली कमाल

By admin | Updated: January 30, 2016 02:14 IST

भारतीय महिला क्रिकेट संघाने शुक्रवारी आॅस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा टी-२० सामना १० गडी राखून जिंकला. पावसामुळे व्यत्यय आलेल्या सामन्यात डकवर्थ लुईस नियमाचा आधार घेण्यात आला.

मेलबोर्न : भारतीय महिला क्रिकेट संघाने शुक्रवारी आॅस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा टी-२० सामना १० गडी राखून जिंकला. पावसामुळे व्यत्यय आलेल्या सामन्यात डकवर्थ लुईस नियमाचा आधार घेण्यात आला. या विजयामुळे भारताने तीन सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली आहे. भारतीय संघाचा हा आॅस्ट्रेलियातील पहिलाच मालिका विजय आहे.पावसामुळे हा सामना १८ षटकांचा करण्यात आला होता. भारताने नाणेफेक जिंकून आॅस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी दिली. आॅस्ट्रेलियाने निर्धारित षटकांत आठ बाद १२५ अशी समाधानकारक मजल मारली. मात्र, पावसामुळे भारताला १० षटकांत ६६ धावा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. भारताने ९.१ षटकांत बिनबाद ६९ धावा करीत सामना जिंकला.भारताकडून कर्णधार मिताली राजने ३२ चेंडूंत सहा चौकारांसह नाबाद ३७ धावा केल्या. स्मृती मानधनाने २४ चेंडूंत तीन चौकारासह नाबाद २२ धावा केल्या. तत्पूर्वी आॅस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिगने ३९ चेंडूंत तीन चौकार व दोन षट्कारांसह ४९ धावा केल्या. जॅस जोनासनने २७ व अ‍ॅलेक्स ब्लॅकवेलने नाबाद १२ धावा केल्या. झूलन गोस्वामीने १६ धावांत दोन, तर राजेश्वरी गायकवाडने २७ धावांत दोन बळी घेतले. पूनम यादव व हरमनप्रीत कौर यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला.संक्षिप्त धावफलकआॅस्ट्रेलिया १८ षटकांत ८ बाद - १२५़ (लेनिंग ४९, जोनासेन २७.झूलन गोस्वामी २/१६, राजेश्वरी गायकवाड २/२७)़भारत : ९.१ षटकांत नाबाद ६९़ (मिताली राज नाबाद ३७, स्मृती मानधना नाबाद २२)़