शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
3
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
4
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
5
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
6
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
7
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
8
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
9
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
10
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
11
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
12
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
13
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
14
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
15
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
16
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
17
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 
18
Nashik Crime: रस्त्यावरून जाणाऱ्या मुलीला उचलले, रिक्षातून नेत असताना मैत्रिणीमुळे झाली सुटका
19
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
20
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!

महिला टी-२० विश्वचषक; भारताचे बांगलादेशसमोर विजयासाठी १६४ धावांचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2016 17:03 IST

भारताने निर्धारीत २० षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात १६३ धावा केल्या. बांगलादेशसमोर विजयासाठी १६४ धावांचे आव्हान ठेवले आहे.

ऑनलाइन लोकमत

बंगळुरू, दि. १५  - मिताली राज(४२), वेलास्वामी वनिता(३८), हरमनप्रीत कौर(३९) व वेदा कृष्णस्वामी(३६) यांच्या दमदार खेळाच्या बळावर भारताने निर्धारीत २० षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात १६३ धावा केल्या. बांगलादेशसमोर विजयासाठी १६४ धावांचे आव्हान ठेवले आहे. बांगलादेशने नाणेफेकीचा कौल जिंकून भारताला प्रथम फलंदाजीस आंमत्रित केले होते. आजपासून महीला टी २० विश्वचषकास सुरवात झाली असुन सलामीचा सामना भारत आणि बांगलादेश दरम्यान चिन्नास्वामी स्टेडियम बंगळुरू येथे आहे. 
 
कर्णधार मिताली राज आणि वेलास्वामी वनिताने ६२ धावांची धडाकेबाज दिली. या सलामीच्या जोडीने पहिल्या ६.३ षटकात १० च्या धावगतीने ६३ धावांची धडाकेबाज सलामी दिली. कर्णधार मिताली राजने ३५ चेंडून ५ चौकाराच्या मदतीने संयमी ४२ धावांची खेळी केली तर वेलास्वामी वनिताने २४ चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने झटपट ३८ धावांची खेळी केली. 
 
भारत मजबूत स्थितीत असतानाच भारताला सलग दोन झटके बसले वेलास्वामी वनितानंतर मंदना खातेही न उघडता बाद झाल्याने भारताची धावगती मंदावली. अनुभवी मिताली राजने कौर सोबत डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. हरमनप्रीत कौरने आक्रमक फंलदाजी करताना २९ चेंडूत ३ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने झटपट ३९ धावा केल्या. शेवटच्या हाणामारीच्या षटकात वेदा कृष्णस्वामीने २४ चेंडूत २ षटकाराच्या मदतीने ३६ धावा केल्या. बांगलादेश तर्फे रुमाना अहमद आणि फाहिमा खातूनने भारताच्या दोन फलंदानां बाद केले. तर नाहिदा अख्तरने एका भारतीय फलंदाजाला तंबूचा रास्ता दाखवला.