शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

महिला टी-२० विश्वचषक; भारताचे बांगलादेशसमोर विजयासाठी १६४ धावांचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2016 17:03 IST

भारताने निर्धारीत २० षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात १६३ धावा केल्या. बांगलादेशसमोर विजयासाठी १६४ धावांचे आव्हान ठेवले आहे.

ऑनलाइन लोकमत

बंगळुरू, दि. १५  - मिताली राज(४२), वेलास्वामी वनिता(३८), हरमनप्रीत कौर(३९) व वेदा कृष्णस्वामी(३६) यांच्या दमदार खेळाच्या बळावर भारताने निर्धारीत २० षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात १६३ धावा केल्या. बांगलादेशसमोर विजयासाठी १६४ धावांचे आव्हान ठेवले आहे. बांगलादेशने नाणेफेकीचा कौल जिंकून भारताला प्रथम फलंदाजीस आंमत्रित केले होते. आजपासून महीला टी २० विश्वचषकास सुरवात झाली असुन सलामीचा सामना भारत आणि बांगलादेश दरम्यान चिन्नास्वामी स्टेडियम बंगळुरू येथे आहे. 
 
कर्णधार मिताली राज आणि वेलास्वामी वनिताने ६२ धावांची धडाकेबाज दिली. या सलामीच्या जोडीने पहिल्या ६.३ षटकात १० च्या धावगतीने ६३ धावांची धडाकेबाज सलामी दिली. कर्णधार मिताली राजने ३५ चेंडून ५ चौकाराच्या मदतीने संयमी ४२ धावांची खेळी केली तर वेलास्वामी वनिताने २४ चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने झटपट ३८ धावांची खेळी केली. 
 
भारत मजबूत स्थितीत असतानाच भारताला सलग दोन झटके बसले वेलास्वामी वनितानंतर मंदना खातेही न उघडता बाद झाल्याने भारताची धावगती मंदावली. अनुभवी मिताली राजने कौर सोबत डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. हरमनप्रीत कौरने आक्रमक फंलदाजी करताना २९ चेंडूत ३ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने झटपट ३९ धावा केल्या. शेवटच्या हाणामारीच्या षटकात वेदा कृष्णस्वामीने २४ चेंडूत २ षटकाराच्या मदतीने ३६ धावा केल्या. बांगलादेश तर्फे रुमाना अहमद आणि फाहिमा खातूनने भारताच्या दोन फलंदानां बाद केले. तर नाहिदा अख्तरने एका भारतीय फलंदाजाला तंबूचा रास्ता दाखवला.