शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

..तर पळ काढणार नाही : ठाकूर

By admin | Updated: July 17, 2017 00:26 IST

गरज भासली तर मी जबाबदारीपासून पळ काढणाऱ्यांपैकी नाही, असे मत गेल्या सहा महिन्यांपासून भारतीय क्रिकेटमध्ये सुरू

नवी दिल्ली : गरज भासली तर मी जबाबदारीपासून पळ काढणाऱ्यांपैकी नाही, असे मत गेल्या सहा महिन्यांपासून भारतीय क्रिकेटमध्ये सुरू असलेल्या उलथापालथीपासून दूर असलेले बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केले आहे. सर्वोच्च न्यायालयात अलीकडेच ठाकूर यांनी विनाअट माफी मागितली. त्यानंतर त्यांच्यावरील खोटी साक्ष देण्याचे प्रकरण मिटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने लोढा समितीच्या सुधारणा लागू करण्यासाठी बोर्डाच्या सदस्यांचे मन वळविण्यात अपयशी ठरल्यानंतर ठाकूर यांना पदावरून हटविले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकांच्या समितीने (सीओए) जबाबदारी सांभाळली आहे, पण गेल्या सहा महिन्यांत त्यांनाही या प्रकरणात विशेष यश मिळालेले नाही. अलीकडेच माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली यांनी ठाकूर यांनी वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार करताना त्यांना क्रिकेट प्रशासनामध्ये परतण्याची विनंती केली. तुम्हाला आता समाधान वाटत आहे का, याबाबत बोलताना ठाकूर म्हणाले, ‘माझा न्यायपालिकेवर पूर्ण विश्वास आहे.’हमीपूरचे खासदार असलेले ठाकूर या कालावधीत आपल्या राजकीय कार्यात व अन्य क्रीडा संघटनांच्या कार्यामध्ये व्यस्त होते. ठाकूर म्हणाले, ‘मी या कालावधीत खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी हिमाचल प्रदेश राज्य आॅलिम्पिकचे आयोजन केले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मी हॉकी हिमाचलसोबत जुळलेला आहे. राज्यात आॅलिम्पिक खेळांना प्रोत्साहन देण्यास मी प्राधान्य देत असतो.’ (वृत्तसंस्था)सौरवने दिलेला प्रस्ताव म्हणजे त्याचे मोठेपण आहे. मी त्यासाठी भारताच्या माजी कर्णधाराचा विशेष आभारी आहे. जर भारतीय क्रिकेटला माझी जर गरज असेल तर त्यासाठी नेहमी उपलब्ध राहील. मी जबाबदारीपासून पळ काढणारा नाही. - अनुराग ठाकूर