शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

..तर पळ काढणार नाही : ठाकूर

By admin | Updated: July 17, 2017 00:26 IST

गरज भासली तर मी जबाबदारीपासून पळ काढणाऱ्यांपैकी नाही, असे मत गेल्या सहा महिन्यांपासून भारतीय क्रिकेटमध्ये सुरू

नवी दिल्ली : गरज भासली तर मी जबाबदारीपासून पळ काढणाऱ्यांपैकी नाही, असे मत गेल्या सहा महिन्यांपासून भारतीय क्रिकेटमध्ये सुरू असलेल्या उलथापालथीपासून दूर असलेले बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केले आहे. सर्वोच्च न्यायालयात अलीकडेच ठाकूर यांनी विनाअट माफी मागितली. त्यानंतर त्यांच्यावरील खोटी साक्ष देण्याचे प्रकरण मिटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने लोढा समितीच्या सुधारणा लागू करण्यासाठी बोर्डाच्या सदस्यांचे मन वळविण्यात अपयशी ठरल्यानंतर ठाकूर यांना पदावरून हटविले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकांच्या समितीने (सीओए) जबाबदारी सांभाळली आहे, पण गेल्या सहा महिन्यांत त्यांनाही या प्रकरणात विशेष यश मिळालेले नाही. अलीकडेच माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली यांनी ठाकूर यांनी वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार करताना त्यांना क्रिकेट प्रशासनामध्ये परतण्याची विनंती केली. तुम्हाला आता समाधान वाटत आहे का, याबाबत बोलताना ठाकूर म्हणाले, ‘माझा न्यायपालिकेवर पूर्ण विश्वास आहे.’हमीपूरचे खासदार असलेले ठाकूर या कालावधीत आपल्या राजकीय कार्यात व अन्य क्रीडा संघटनांच्या कार्यामध्ये व्यस्त होते. ठाकूर म्हणाले, ‘मी या कालावधीत खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी हिमाचल प्रदेश राज्य आॅलिम्पिकचे आयोजन केले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मी हॉकी हिमाचलसोबत जुळलेला आहे. राज्यात आॅलिम्पिक खेळांना प्रोत्साहन देण्यास मी प्राधान्य देत असतो.’ (वृत्तसंस्था)सौरवने दिलेला प्रस्ताव म्हणजे त्याचे मोठेपण आहे. मी त्यासाठी भारताच्या माजी कर्णधाराचा विशेष आभारी आहे. जर भारतीय क्रिकेटला माझी जर गरज असेल तर त्यासाठी नेहमी उपलब्ध राहील. मी जबाबदारीपासून पळ काढणारा नाही. - अनुराग ठाकूर