शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

एक दिवसीय मालिका सोडून वेस्ट इंडीज संघ मायदेशी परतणार

By admin | Updated: October 17, 2014 17:34 IST

मानधनावरून वेस्ट इंडीजचे खेळाडू आणि क्रिकेट बोर्ड यांच्यातील वाद विकोपाला गेला असून वेस्ट इंडीजचा संघ पाचवा एक दिवसीय सामना खेळणार नसल्याचे खेळाडूंनी जाहीर केले आहे.

भारता सोबतची एक दिवसीय मालिका सोडत वेस्ट इंडीजची टिम मायदेशी जाणारऑनलाइन लोकमतधरमशाला, दि. १७ - मानधनावरून वेस्ट इंडीजचे खेळाडू आणि क्रिकेट बोर्ड यांच्यातील वाद विकोपाला गेला असून वेस्ट इंडीजचा संघ पाचवा एक दिवसीय सामना खेळणार नसल्याचे खेळाडूंनी जाहीर केले आहे. विंडीज क्रिकेटबोर्ड खेळाडूंना योग्य मानधन देत नाही,तसेच खेळाडूंच्या तक्रारी ऐकून घेत नसल्याने खेळाडूंनी हा निर्णय घेतला आहे. या बाबत बीसीसीआयने ट्विटरवरून वेस्ट इंडीज संघाचा हा निर्णय धक्कादायक आणि निराशाजनक असल्याचे म्हटले आहे. वेस्ट इंडीजचा संघ भारताविरुद्ध खेळत असलेला चौथा सामना आज अर्धवट सोडून जाण्याच्या तयारीत होता. परंतू भारतातील क्रिकेटच्या अधिका-यांनी यामुळे सामना बघण्यास आलेले प्रेक्षक नाराज होतील असे सांगत संघाची समजूत घातली व त्यांना सामना खेळण्याची विनंती केली. विंडीज विरुद्ध भारतीय संघात होणारे सामने रद्द करण्यात आल्याने येत्या नोव्हेंबर बीसीसीआयने श्रीलंकेसोबत एख दिवसीय सामन्यांचे नियोजन केले आहे. विंडीज संघाने पाच एक दिवसीय सामने, टि-२० आणि तीन कसोटी सामने खेळण्यास नकार दिला आहे. यासंदर्भात बीसीसीआयने आयसीसी सोबत बैठक घेऊन वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डावर खटला दाखल करण्याच्या विचारात आहे.