शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

भारोत्तोलनपटूंना डॉक्टर, फिजिओची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 04:20 IST

भारोतोलनपटूंना जखमांबाबत योग्य मार्गदर्शन करण्यासाठी क्रीडा वैद्यकतज्ज्ञ तसेच फिजिओ यांची तातडीची गरज असल्याचे मत या खेळातील राष्ट्रीय प्रशिक्षक विजय शर्मा यांनी व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली: भारोतोलनपटूंना जखमांबाबत योग्य मार्गदर्शन करण्यासाठी क्रीडा वैद्यकतज्ज्ञ तसेच फिजिओ यांची तातडीची गरज असल्याचे मत या खेळातील राष्ट्रीय प्रशिक्षक विजय शर्मा यांनी व्यक्त केले आहे. मीराबाई चानूला जखमेमुळे आशियाईमधून माघार घ्यावी लागल्यानंतर अशाप्रकारची घटना भविष्यात होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय योजण्याचे त्यांनी आवाहन केले आहे.मीराबाईच्या कमरेच्या दुखण्यावर सध्या मुंबईत उपचार सुरू आहे. यासंदर्भात वृत्तसंस्थेशी बोलताना शर्मा म्हणाले, ‘आशियाई खेळण्याची जोखीम न पत्करता आॅलिम्पिक पात्रता तयारीवर लक्ष्य केंद्रित करण्याचा मीराबाईला सल्ला दिला होता. गेल्या आठ आठवड्यात तिने सरावदेखील केलेला नाही. आमच्यासाठी आॅलिम्पिक अधिक महत्त्वपूर्ण असल्याने कुठलीही जोखीम पत्करायची नाही. राष्टÑीय संघाला क्रीडा वैद्यकतज्ज्ञ आणि फिजिओ मिळाल्यास आमच्या खेळाडूंना योग्य मार्गदर्शन मिळेल. यामुळे भविष्यात अशा घटना घडणारनाहीत.’गोल्ड कोस्ट राष्टÑकुल स्पर्धेत भारतीय संघासोबत फिजिओ नव्हता, असे निदर्शनास आणून देत शर्मा म्हणाले,‘तरीही आमच्या खेळाडूंनी आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यावेळीही मीराबाईने फिजिओची गरज असल्याचे मीडियाशी बोलताना म्हटले होते.मीराबाईच्या अनुपस्थितीतही भारतीय खेळाडू आशियाईमध्ये दमदार कामगिरी करतील, अशी अपेक्षा व्यक्त करीत शर्मा म्हणाले,‘मीराबाई खेळणार नाही, याबद्दल मी मानसिक तयारी केली होती, पण तिच्या अनुपस्थितीत इतर खेळाडू पदक विजेती कामगिरी करतील, याबद्दल मी आशावादी आहे.’ मीराबाईच्या पुनरागमनाच्या शक्यतेसंदर्भात विचारताच ते म्हणाले,‘मुंबईत तिच्यावर उपचार सुरू आहेत. मी सातत्याने डॉक्टरांच्या संपर्कात आहे. तिला जखम नाही. शिवाय अनेक एमआरआयमध्ये दुखण्याचा शोध लागलेला नाही. मी घाई न करता नोव्हेंबरमध्ये आयोजित आॅलिम्पिक पात्रता फेरीवर लक्ष्य केंद्रित करण्यास सांगितले आहे.’ (वृत्तसंस्था)>विश्व दर्जाचे पदक विजेते भारोत्तोलक हवे असतील तर क्रीडा वैद्यक तज्ज्ञ तसेच फिजिओचे मार्गदर्शन आवश्यक आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने संपूर्ण मदतीचे आश्वासन दिले असले तरी नियुक्ती करण्याचा अधिकार आम्हाला नाही.आमच्याकडे कुठलाही तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने गरज भासल्यास पतियाळा येथील साईच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो.’’ - विजय शर्मा राष्टÑीय प्रशिक्षक