शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
3
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
4
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
5
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
6
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
7
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
9
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
10
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
11
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
12
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
13
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
14
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
15
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
16
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
17
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
18
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
19
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
20
अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले

भारोत्तोलनपटूंना डॉक्टर, फिजिओची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 04:20 IST

भारोतोलनपटूंना जखमांबाबत योग्य मार्गदर्शन करण्यासाठी क्रीडा वैद्यकतज्ज्ञ तसेच फिजिओ यांची तातडीची गरज असल्याचे मत या खेळातील राष्ट्रीय प्रशिक्षक विजय शर्मा यांनी व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली: भारोतोलनपटूंना जखमांबाबत योग्य मार्गदर्शन करण्यासाठी क्रीडा वैद्यकतज्ज्ञ तसेच फिजिओ यांची तातडीची गरज असल्याचे मत या खेळातील राष्ट्रीय प्रशिक्षक विजय शर्मा यांनी व्यक्त केले आहे. मीराबाई चानूला जखमेमुळे आशियाईमधून माघार घ्यावी लागल्यानंतर अशाप्रकारची घटना भविष्यात होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय योजण्याचे त्यांनी आवाहन केले आहे.मीराबाईच्या कमरेच्या दुखण्यावर सध्या मुंबईत उपचार सुरू आहे. यासंदर्भात वृत्तसंस्थेशी बोलताना शर्मा म्हणाले, ‘आशियाई खेळण्याची जोखीम न पत्करता आॅलिम्पिक पात्रता तयारीवर लक्ष्य केंद्रित करण्याचा मीराबाईला सल्ला दिला होता. गेल्या आठ आठवड्यात तिने सरावदेखील केलेला नाही. आमच्यासाठी आॅलिम्पिक अधिक महत्त्वपूर्ण असल्याने कुठलीही जोखीम पत्करायची नाही. राष्टÑीय संघाला क्रीडा वैद्यकतज्ज्ञ आणि फिजिओ मिळाल्यास आमच्या खेळाडूंना योग्य मार्गदर्शन मिळेल. यामुळे भविष्यात अशा घटना घडणारनाहीत.’गोल्ड कोस्ट राष्टÑकुल स्पर्धेत भारतीय संघासोबत फिजिओ नव्हता, असे निदर्शनास आणून देत शर्मा म्हणाले,‘तरीही आमच्या खेळाडूंनी आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यावेळीही मीराबाईने फिजिओची गरज असल्याचे मीडियाशी बोलताना म्हटले होते.मीराबाईच्या अनुपस्थितीतही भारतीय खेळाडू आशियाईमध्ये दमदार कामगिरी करतील, अशी अपेक्षा व्यक्त करीत शर्मा म्हणाले,‘मीराबाई खेळणार नाही, याबद्दल मी मानसिक तयारी केली होती, पण तिच्या अनुपस्थितीत इतर खेळाडू पदक विजेती कामगिरी करतील, याबद्दल मी आशावादी आहे.’ मीराबाईच्या पुनरागमनाच्या शक्यतेसंदर्भात विचारताच ते म्हणाले,‘मुंबईत तिच्यावर उपचार सुरू आहेत. मी सातत्याने डॉक्टरांच्या संपर्कात आहे. तिला जखम नाही. शिवाय अनेक एमआरआयमध्ये दुखण्याचा शोध लागलेला नाही. मी घाई न करता नोव्हेंबरमध्ये आयोजित आॅलिम्पिक पात्रता फेरीवर लक्ष्य केंद्रित करण्यास सांगितले आहे.’ (वृत्तसंस्था)>विश्व दर्जाचे पदक विजेते भारोत्तोलक हवे असतील तर क्रीडा वैद्यक तज्ज्ञ तसेच फिजिओचे मार्गदर्शन आवश्यक आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने संपूर्ण मदतीचे आश्वासन दिले असले तरी नियुक्ती करण्याचा अधिकार आम्हाला नाही.आमच्याकडे कुठलाही तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने गरज भासल्यास पतियाळा येथील साईच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो.’’ - विजय शर्मा राष्टÑीय प्रशिक्षक