शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

आम्ही अंतिम सामन्याच्या निर्धारानेच खेळू

By admin | Updated: October 19, 2016 04:29 IST

(जेडीटी) क्लबविरुद्ध बाजी मारून बंगळुरू फुटबॉल क्लब एएफसी कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या निर्धाराने खेळेल

बंगळुरु : मलेशियाच्या जोहोर दारुल ताजिम (जेडीटी) क्लबविरुद्ध बाजी मारून बंगळुरू फुटबॉल क्लब एएफसी कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या निर्धाराने खेळेल, असा विश्वास कर्णधार सुनील छेत्रीने व्यक्त केला.विशेष म्हणजे, जर बंगळुरू एफसी अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरला, तर या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा पहिला भारतीय संघ म्हणून बंगळुरू एफसी इतिहास निर्माण करेल. त्याचवेळी या दोन संघांदरम्यान जोहोर बाहरू येथे झालेल्या पहिल्या सत्रातील सामना १-१ असा बरोबरीत सुटला होता, तर या वेळी संघ नव्या विचाराने मैदानावर उतरणार असून कामगिरीत नक्कीच सुधारणा होईल, असा विश्वासही छेत्रीने व्यक्त केला. छेत्री म्हणाला, ‘‘इतर सामन्यांप्रमाणेच या सामन्याकडे आम्ही पाहत आहोत. या सामन्यातून भारतीय फुटबॉलचा नवा अध्याय लिहिला जाऊ शकतो. काहीतरी नवीन करण्याच्या जवळ आम्ही आहोत. यासाठीच आम्हाला आमचा सर्वोत्तम खेळ करण्याची गरज आहे. हा सामना केवळ बंगळुरूचा नसून पूर्ण देशाचा आहे.’’ छेत्री म्हणाला, ‘‘विजेतेपदाचे प्रबळ दावेदार म्हणून आम्ही मैदानात उतरू. प्रतिस्पर्धी संघ कोण आहे, हे आमच्यासाठी महत्त्वाचे नाही. माझ्या मते सामन्याविषयी आपल्याला अतिउत्साही होता कामा नये आणि केवळ सामन्यावर लक्ष केंद्रित करावं.’’ बंगळुरू एफसीने जेडीटीविरुद्ध अद्याप एकही विजय मिळवलेला नसून याचा खेळाडूंच्या मानसिकतेवर काहीही फरक पडणार नाही असे छेत्रीने सांगितले. (वृत्तसंस्था)>गेल्यावेळी जेडीटीविरुद्ध आमचा १-२ असा पराभव झाला होता. त्यांचा संघ खूप मजबूत आहे. मी सामन्यात सकारात्मक विचाराने उतरेल. इराण आणि ओमान विरुद्धच्या आंतरराष्ट्रीय सामन्यातही आपण विजयी होऊ शकतो, या विचाराने मी खेळलो होतो.- सुनील छेत्री