शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

आम्हाला सरकारच्या उत्तराची प्रतीक्षा - शुक्ला

By admin | Updated: November 29, 2015 01:32 IST

भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान पुन्हा एकदा क्रिकेट संबंध सुरळीत करण्यासाठी सरकारच्या उत्तराची प्रतीक्षा आहे, असे बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी राजीव शुक्ला यांनी सांगितले.

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान पुन्हा एकदा क्रिकेट संबंध सुरळीत करण्यासाठी सरकारच्या उत्तराची प्रतीक्षा आहे, असे बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी राजीव शुक्ला यांनी सांगितले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला पुढील महिन्यात श्रीलंकेत आयोजित संभाव्य मालिकेसाठी यापूर्वीच त्यांच्या सरकारचा हिरवा कंदील मिळालेला आहे, तर भारताला अद्याप सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. शुक्ला म्हणाले, ‘आम्ही यापूर्वीच मालिकेबाबत मंत्रालयाकडे अर्ज सादर केलेला आहे, पण विदेश मंत्री सुषमा स्वराज राष्ट्रकुल संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी माल्टा येथे गेल्या असल्यामुळे त्या परतण्याची प्रतीक्षा करीत आहोत. स्वराज मायदेशी परतल्यानंतर याबाबत निर्णय होईल.’भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान आयोजित संभाव्य मालिकेचे यजमानपद भूषवण्यासाठी श्रीलंकेने पुढाकार घेतला आहे. ही मालिका १५ डिसेंबर ते जानेवारीचा पहिला आठवडा या संभाव्य कालावधीत आयोजित होण्याची शक्यता आहे. या मालिकेत तीन वन-डे आणि दोन टी-२० सामने होण्याची शक्यता आहे. उभय संघांदरम्यान २००७ पासून कसोटी क्रिकेट खेळले गेलेले नाही. पाकिस्तानने २०१२-१३ मध्ये मर्यादित षटकांच्या छोटेखानी मालिकेसाठी भारताचा दौरा केला होता. (वृत्तसंस्था)दोन बोर्डांनी (बीसीसीआय व पीसीबी) यापूर्वीच मालिकेबाबत निर्णय घेतलेला आहे. आता निर्णय भारत सरकारला घ्यायचा आहे. आम्हाला सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. खेळाची राजकारणासोबत सरमिसळ करू नये. सरकारच्या सहमतीशिवाय आम्ही पाकिस्तानसोबतच्या मालिकेबाबत निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही सरकारकडे अर्ज सादर केलेला असून शासनाच्या उत्तराची प्रतीक्षा आहे. सरकारकडून उत्तर मिळाल्यानंतर आम्ही त्याबाबत माहिती कळवू. - राजीव शुक्ला