शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला सरकारच्या उत्तराची प्रतीक्षा - शुक्ला

By admin | Updated: November 29, 2015 01:32 IST

भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान पुन्हा एकदा क्रिकेट संबंध सुरळीत करण्यासाठी सरकारच्या उत्तराची प्रतीक्षा आहे, असे बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी राजीव शुक्ला यांनी सांगितले.

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान पुन्हा एकदा क्रिकेट संबंध सुरळीत करण्यासाठी सरकारच्या उत्तराची प्रतीक्षा आहे, असे बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी राजीव शुक्ला यांनी सांगितले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला पुढील महिन्यात श्रीलंकेत आयोजित संभाव्य मालिकेसाठी यापूर्वीच त्यांच्या सरकारचा हिरवा कंदील मिळालेला आहे, तर भारताला अद्याप सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. शुक्ला म्हणाले, ‘आम्ही यापूर्वीच मालिकेबाबत मंत्रालयाकडे अर्ज सादर केलेला आहे, पण विदेश मंत्री सुषमा स्वराज राष्ट्रकुल संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी माल्टा येथे गेल्या असल्यामुळे त्या परतण्याची प्रतीक्षा करीत आहोत. स्वराज मायदेशी परतल्यानंतर याबाबत निर्णय होईल.’भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान आयोजित संभाव्य मालिकेचे यजमानपद भूषवण्यासाठी श्रीलंकेने पुढाकार घेतला आहे. ही मालिका १५ डिसेंबर ते जानेवारीचा पहिला आठवडा या संभाव्य कालावधीत आयोजित होण्याची शक्यता आहे. या मालिकेत तीन वन-डे आणि दोन टी-२० सामने होण्याची शक्यता आहे. उभय संघांदरम्यान २००७ पासून कसोटी क्रिकेट खेळले गेलेले नाही. पाकिस्तानने २०१२-१३ मध्ये मर्यादित षटकांच्या छोटेखानी मालिकेसाठी भारताचा दौरा केला होता. (वृत्तसंस्था)दोन बोर्डांनी (बीसीसीआय व पीसीबी) यापूर्वीच मालिकेबाबत निर्णय घेतलेला आहे. आता निर्णय भारत सरकारला घ्यायचा आहे. आम्हाला सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. खेळाची राजकारणासोबत सरमिसळ करू नये. सरकारच्या सहमतीशिवाय आम्ही पाकिस्तानसोबतच्या मालिकेबाबत निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही सरकारकडे अर्ज सादर केलेला असून शासनाच्या उत्तराची प्रतीक्षा आहे. सरकारकडून उत्तर मिळाल्यानंतर आम्ही त्याबाबत माहिती कळवू. - राजीव शुक्ला