शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

‘आणखी चांगली कामगिरी करायचीय’

By admin | Updated: July 1, 2017 02:12 IST

जबरदस्त सूर गवसलेली भारताची सलामीची फलंदाज स्मृती मानधना आणखी धावांची भुकेली असून, आपली ही सुरेख लय विश्वचषकातील उर्वरित सामन्यात कायम ठेवण्याची तिची इच्छा आहे.

टॉन्टन : जबरदस्त सूर गवसलेली भारताची सलामीची फलंदाज स्मृती मानधना आणखी धावांची भुकेली असून, आपली ही सुरेख लय विश्वचषकातील उर्वरित सामन्यात कायम ठेवण्याची तिची इच्छा आहे.विशेष म्हणजे डाव्या गुडघ्यावरील दुखापतीनंतर ती जानेवारीपासून एकही सामना खेळली नव्हती. तरीदेखील निवड समितीने या स्पर्धेसाठी स्मृती हिची निवड करून मोठा जुगार खेळला होता. स्पर्धेच्या पहिल्या सराव सामन्यादरम्यान स्मृती लयीत दिसली नव्हती; परंतु वर्ल्डकपच्या पहिल्या दोन सामन्यांत इंग्लंडविरुद्ध ९0 आणि वेस्ट इंडीजविरुद्ध १0६ धावांची खेळी करताना तिने निवड समितीचा विश्वास सार्थ ठरवला.महिला बिग बॅश लीगच्या २0१६-१७ या हंगामात ब्रिस्बेन हिटकडून खेळणाऱ्या स्मृतीने म्हटले, ‘अद्याप स्पर्धा संपलेली नाही; परंतु दुखापतीनंतर चांगले पुनरागमन केल्याने मी आनंदित आहे. इंग्लंडविरुद्ध पहिल्या सराव सामन्यादरम्यान मला सूर गवसला नव्हता आणि मी खूप नर्व्हस होती. सराव सामन्यात वेस्ट इंडीजविरुद्ध नाबाद ८२ धावांची खेळी केल्यानंतर माझे फलंदाजीतील कौशल्य कायम आहे आणि मी फलंदाजी करू शकते हा आत्मविश्वास मिळाला. दुखापतीनंतर पुनरागमन करणे कठीण होते; परंतु आता मी खुश आहे. भारतासाठी दोन सामन्यांत मी चांगली कामगिरी केली आणि पुढेही अशीच लय कायम राहील, अशी आशा आहे.’ इंग्लंडमधील वातावरण स्मृतीच्या चांगलेच पथ्यावर पडते. येथे तिने २0१४ मध्ये अवघ्या वयाच्या १८ व्या वर्षीच भारताच्या कसोटी विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. ही डावखुरी फलंदाज म्हणाली, ‘मला येथील वातावरण आवडते. मला थंड हवामानात खेळणे आवडते. त्यामुळे मला आतून आनंद मिळतो. ते चांगल्या खेळपट्ट्या तयार करतात. भारतातही मला खेळणे आवडते; परंतु येथे खेळणे जास्त आवडते. मी फक्त माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करते. येथे टीव्ही नाही आणि लक्ष दुसरीकडे जाण्यासारखे येथे काही नाही. त्यामुळे मला क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यास मदत मिळते.’एखाद्या मोठ्या स्पर्धेच्या सहा महिन्यांपर्यंत मैदानाबाहेर राहणे हा कोणत्याही क्रिकेटपटूसाठी मोठा धक्का मानला जातो; परंतु स्मृतीने या वेळेचा उपयोग आपल्या फायद्यासाठी केला. पाकिस्तानविरुद्ध रविवारी होणाऱ्या सामन्यासंदर्भात ती म्हणाली, ‘मी अजिबात समाधानी नाही. गेली पाच महिने तंदुरुस्त होण्यासाठी मी एवढी मेहनत ९0 अथवा शतक करण्यासाठी घेतली नाही. मी भारतासाठी चांगली कामगिरी करू इच्छिते आणि भारतासाठी वर्ल्डकप जिंकू इच्छिते. मी पाच महिन्यांपासून त्यासाठी प्रयत्न करीत आहे.’