शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

‘आणखी चांगली कामगिरी करायचीय’

By admin | Updated: July 1, 2017 02:12 IST

जबरदस्त सूर गवसलेली भारताची सलामीची फलंदाज स्मृती मानधना आणखी धावांची भुकेली असून, आपली ही सुरेख लय विश्वचषकातील उर्वरित सामन्यात कायम ठेवण्याची तिची इच्छा आहे.

टॉन्टन : जबरदस्त सूर गवसलेली भारताची सलामीची फलंदाज स्मृती मानधना आणखी धावांची भुकेली असून, आपली ही सुरेख लय विश्वचषकातील उर्वरित सामन्यात कायम ठेवण्याची तिची इच्छा आहे.विशेष म्हणजे डाव्या गुडघ्यावरील दुखापतीनंतर ती जानेवारीपासून एकही सामना खेळली नव्हती. तरीदेखील निवड समितीने या स्पर्धेसाठी स्मृती हिची निवड करून मोठा जुगार खेळला होता. स्पर्धेच्या पहिल्या सराव सामन्यादरम्यान स्मृती लयीत दिसली नव्हती; परंतु वर्ल्डकपच्या पहिल्या दोन सामन्यांत इंग्लंडविरुद्ध ९0 आणि वेस्ट इंडीजविरुद्ध १0६ धावांची खेळी करताना तिने निवड समितीचा विश्वास सार्थ ठरवला.महिला बिग बॅश लीगच्या २0१६-१७ या हंगामात ब्रिस्बेन हिटकडून खेळणाऱ्या स्मृतीने म्हटले, ‘अद्याप स्पर्धा संपलेली नाही; परंतु दुखापतीनंतर चांगले पुनरागमन केल्याने मी आनंदित आहे. इंग्लंडविरुद्ध पहिल्या सराव सामन्यादरम्यान मला सूर गवसला नव्हता आणि मी खूप नर्व्हस होती. सराव सामन्यात वेस्ट इंडीजविरुद्ध नाबाद ८२ धावांची खेळी केल्यानंतर माझे फलंदाजीतील कौशल्य कायम आहे आणि मी फलंदाजी करू शकते हा आत्मविश्वास मिळाला. दुखापतीनंतर पुनरागमन करणे कठीण होते; परंतु आता मी खुश आहे. भारतासाठी दोन सामन्यांत मी चांगली कामगिरी केली आणि पुढेही अशीच लय कायम राहील, अशी आशा आहे.’ इंग्लंडमधील वातावरण स्मृतीच्या चांगलेच पथ्यावर पडते. येथे तिने २0१४ मध्ये अवघ्या वयाच्या १८ व्या वर्षीच भारताच्या कसोटी विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. ही डावखुरी फलंदाज म्हणाली, ‘मला येथील वातावरण आवडते. मला थंड हवामानात खेळणे आवडते. त्यामुळे मला आतून आनंद मिळतो. ते चांगल्या खेळपट्ट्या तयार करतात. भारतातही मला खेळणे आवडते; परंतु येथे खेळणे जास्त आवडते. मी फक्त माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करते. येथे टीव्ही नाही आणि लक्ष दुसरीकडे जाण्यासारखे येथे काही नाही. त्यामुळे मला क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यास मदत मिळते.’एखाद्या मोठ्या स्पर्धेच्या सहा महिन्यांपर्यंत मैदानाबाहेर राहणे हा कोणत्याही क्रिकेटपटूसाठी मोठा धक्का मानला जातो; परंतु स्मृतीने या वेळेचा उपयोग आपल्या फायद्यासाठी केला. पाकिस्तानविरुद्ध रविवारी होणाऱ्या सामन्यासंदर्भात ती म्हणाली, ‘मी अजिबात समाधानी नाही. गेली पाच महिने तंदुरुस्त होण्यासाठी मी एवढी मेहनत ९0 अथवा शतक करण्यासाठी घेतली नाही. मी भारतासाठी चांगली कामगिरी करू इच्छिते आणि भारतासाठी वर्ल्डकप जिंकू इच्छिते. मी पाच महिन्यांपासून त्यासाठी प्रयत्न करीत आहे.’