शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 Final: 'विराट' विजयोत्सव! RCB चे जेतेपदाचे स्वप्न साकार, 'किंग कोहली'चा जयजयकार
2
हळव्या मनाचा विराट! पहिली IPL ट्रॉफी जिंकताच रडत-रडतच अनुष्काकडे वळला अन्... (VIDEO)
3
न्यूझीलंडच्या संसदेत महिला खासदाराने दाखवला स्वत:चा न्यूड फोटो; नेमकं काय घडलं?
4
IPL 2025 : ऑरेंज-पर्पल कॅप GT कडे! MI च्या ताफ्यातील सूर्यालाही मिळाला मोठा पुरस्कार, इथं पाहा संपूर्ण यादी
5
युक्रेनचा रशियावर आणखी एक मोठा हल्ला, ११०० किलो स्फोटकांनी क्रिमिया पूल उडवला
6
IPL 2025 Final: अय्यरची विकेट अन् विराटसह RCB च्या ताफ्यात ट्रॉफी हाती आल्याचं फिल (VIDEO)
7
हेरगिरीच्या संशयावरून कारागृहात असलेल्या सुनीताच्या अटकेसाठी कारगिल पोलीस नागपुरात
8
RCB vs PBKS : विराटची विकेट पडली अन् अनुष्कासह कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेल्या एबीचा चेहरा पडला
9
"ट्रम्प यांच्या सांगण्यावरून मोदींनी सरेंडर केलं’’ काँग्रेस असती तर.., युद्धविरामावरून राहुल गांधींचा गंभीर आरोप   
10
राज्यात कोविडचे ४९४ सक्रिय रुग्ण, काय काळजी घ्याल?; आरोग्य विभागाने केलं आवाहन
11
IPL 2025 Final: 'टी-२० मध्ये कसोटी क्रिकेटचा आनंद लुटतोय' संथ खेळीमुळे विराट कोहली ट्रोल!
12
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम; आयपीएलमधील सर्वात मोठा विक्रम मोडला!
13
IPL 2025 Final : रजत पाटीदारनं सिक्सर मारला; मग Kyle Jamieson यानं असा घेतला बदला (VIDEO)
14
IPL 2025 Closing Ceremony : 'ऑपरेशन सिंदूर' थीम अन् भारतीय सैन्याच्या शौर्याला 'सलाम'
15
नागपुरातील लग्नघरात २४.६६ लाखांची चोरी; शेजाऱ्याने फोनमध्ये रेकॉर्ड केला व्हिडीओ
16
अनुसूचित जमाती आयोग, कामगार विमा महामंडळ...; राज्य मंत्रिमंडळाने घेतले चार महत्वाचे निर्णय
17
बेपत्ता मुलगी, ट्रॉली बॅगेत मृतदेह, २४०० किमी दूर मर्डर मिस्ट्री; २ राज्यांचे पोलीस हैराण
18
जर्सी RCB ची अन् पगडी पंजाबची; IPL फायनलमध्ये ख्रिस गेलचा दोन्ही संघांना फुल सपोर्ट
19
भारत-रशियाच्या भागीदारीमुळं ९ देशांचं टेन्शन वाढलं; ज्याचा विचार केला नव्हता ते घडलं

वानखेडेची खेळपट्टी आपल्याला अनुकूल बनवू नका - आयसीसी

By admin | Updated: March 30, 2016 13:46 IST

मायदेशात खेळत असल्यामुळे उपांत्यफेरीच्या महत्वाच्या सामन्यात भारताने आपल्याला अनुकूल खेळपट्टी बनवून घेऊ नये यासाठी आयसीसीकडून खबरदारी घेण्यात येत आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ३० - मायदेशात खेळत असल्यामुळे उपांत्यफेरीच्या महत्वाच्या सामन्यात भारताने आपल्याला अनुकूल खेळपट्टी बनवून घेऊ नये यासाठी आयसीसीकडून खबरदारी घेण्यात येत आहे. आयसीसीचे मैदान आणि खेळपट्टी समितीचे प्रमुख अँडी अॅटकीनसन यांनी वानखेडेच्या ग्राऊंडस्टाफशी चर्चा केली आहे. कोणीही खेळपट्टी बनवताना प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला तर, लगेच मला कळवा असे त्यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत. हिंदुस्थान टाईम्सने हे वृत्त दिले आहे. 
 
भारताने आतापर्यंतचे चारही सामने फिरकीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर खेळले आहेत. त्यामुळे भारताने प्रतिस्पर्धी संघाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. पण या वर्ल्डकपमध्ये वानखेडेच्या मैदानावर झालेल्या सर्व सामन्यांमध्ये धावांच्या राशी उभारल्या गेल्या. इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचे २३० धावांचे लक्ष्य या मैदानावर पार केले. 
 
विराट कोहलीचा अपवाद वगळता आधीच भारतीय फलंदाज फॉर्मसाठी चाचपडत आहेत. त्यामुळे फलंदाजीला अनुकूल असलेल्या या खेळपट्टीमुळे भारतीय संघाची चिंता वाढली आहे. उपांत्यफेरीचा सामना वानखेडेवरील दुस-या खेळपट्टीवर खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेत प्रथमच या खेळपट्टीचा वापर केला जाणार आहे. 
 
भारताचा दक्षिण आफ्रिके विरुद्ध येथे शेवटचा सामना झाला होता. ज्या सामन्यात आफ्रिकेने ४०० पेक्षा जास्त धावा कुटल्या होत्या. भारताने हा सामना गमावल्यामुळे त्यावेळी खेळपट्टीवरुन वाद निर्माण झाला होता.