शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
3
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
4
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
5
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
6
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
7
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
8
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
9
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
10
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
11
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
12
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
13
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
14
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
15
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
16
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
17
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
18
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
19
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
20
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

वानखेडेची खेळपट्टी आपल्याला अनुकूल बनवू नका - आयसीसी

By admin | Updated: March 30, 2016 13:46 IST

मायदेशात खेळत असल्यामुळे उपांत्यफेरीच्या महत्वाच्या सामन्यात भारताने आपल्याला अनुकूल खेळपट्टी बनवून घेऊ नये यासाठी आयसीसीकडून खबरदारी घेण्यात येत आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ३० - मायदेशात खेळत असल्यामुळे उपांत्यफेरीच्या महत्वाच्या सामन्यात भारताने आपल्याला अनुकूल खेळपट्टी बनवून घेऊ नये यासाठी आयसीसीकडून खबरदारी घेण्यात येत आहे. आयसीसीचे मैदान आणि खेळपट्टी समितीचे प्रमुख अँडी अॅटकीनसन यांनी वानखेडेच्या ग्राऊंडस्टाफशी चर्चा केली आहे. कोणीही खेळपट्टी बनवताना प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला तर, लगेच मला कळवा असे त्यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत. हिंदुस्थान टाईम्सने हे वृत्त दिले आहे. 
 
भारताने आतापर्यंतचे चारही सामने फिरकीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर खेळले आहेत. त्यामुळे भारताने प्रतिस्पर्धी संघाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. पण या वर्ल्डकपमध्ये वानखेडेच्या मैदानावर झालेल्या सर्व सामन्यांमध्ये धावांच्या राशी उभारल्या गेल्या. इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचे २३० धावांचे लक्ष्य या मैदानावर पार केले. 
 
विराट कोहलीचा अपवाद वगळता आधीच भारतीय फलंदाज फॉर्मसाठी चाचपडत आहेत. त्यामुळे फलंदाजीला अनुकूल असलेल्या या खेळपट्टीमुळे भारतीय संघाची चिंता वाढली आहे. उपांत्यफेरीचा सामना वानखेडेवरील दुस-या खेळपट्टीवर खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेत प्रथमच या खेळपट्टीचा वापर केला जाणार आहे. 
 
भारताचा दक्षिण आफ्रिके विरुद्ध येथे शेवटचा सामना झाला होता. ज्या सामन्यात आफ्रिकेने ४०० पेक्षा जास्त धावा कुटल्या होत्या. भारताने हा सामना गमावल्यामुळे त्यावेळी खेळपट्टीवरुन वाद निर्माण झाला होता.