शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
2
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
3
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
4
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
6
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
7
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
8
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!
9
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
10
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
11
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
12
मानव-बिबट्या संघर्षावर सरकारचे निर्णायक पाऊल; मनुष्यहानी रोखायला प्राधान्य, ११ कोटी मंजूर
13
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
14
"होनराव म्हणजे तू मराठी ना? तुझी बायको भैयिणी...", कमेंट वाचून मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला...
15
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
17
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
18
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
19
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे

विराटसेनेचेच पारडे जड

By admin | Updated: June 8, 2017 07:11 IST

पाकिस्तानविरुद्घची बहुचर्चित आणि दबाव आणणारी लढत सहज खिशात घातल्यानंतर भारतीय संघाला वेध लागले आहेत

बाळकृष्ण परब/ऑनलाइन लोकमत 
पाकिस्तानविरुद्घची बहुचर्चित आणि दबाव आणणारी लढत सहज खिशात घातल्यानंतर भारतीय संघाला वेध लागले आहेत ते चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ इंग्लंडच्या भूमीवर पाऊल ठेवल्यापासूनच जबरदस्त खेळ करत असल्याने भारतीय क्रिकेटप्रेमींनाही आता चॅम्पियन्स ट्रॉफी आपलीच असल्याचे स्वप्न पडू लागले आहे. मात्र "मंझिल अभी दूर है"  याची जाणीव भारतीय संघाला ठेवावी लागेल, भारतीय संघातील व्यावसायिकता पाहता ही जाणीव असेल अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही. 
बाकी दोन्ही संघांचा सध्याचा फॉर्म पाहता श्रीलंकन संघ म्हणजे बलाढ्य भारतीय संघासाठी काही बिजगणित किंवा भूमितीचा पेपर नक्कीच नाही. पहिल्या लढतील समोर आलेला पाकिस्तानचा संघ जर इतिहासाचा पेपर असेल तर श्रीलंकेचा संघ म्हणजे फार तर भूगोलाचा पेपर. मुरलीधरन, संगकारा, जयवर्धने निवृत्त झाल्यानंतर निर्माण झालेली पोकळी या संघाला अद्याप भरून काढता आलेली नाही. त्यांच्याकडे गुणवान खेळाडू आहेत. अँजेलो मॅथ्युज आणि लासिथ मलिंगासारखे अनुभवी गडीही आहेत, पण काही वर्षांपूर्वीच्या श्रीलंकन संघासारखा दबदबा त्यांना दाखवता आलेला नाही. सलामीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांचा खेळ डळमळीत झाला होता. गेल्या काही वर्षांत श्रीलंकेला भारताविरुद्ध म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही. हीसुद्धा आपल्यासाठी जमेची बाजू ठरेल.
बाकी भारतीय संघात फलंदाजी आणि गोलंदाजांची भट्टी छान जमून आली आहे. रोहित शर्मा आणि शिखर धवनने सलामीच्या लढतीतच शतकी भागीदारी केल्याने विराटच्या डोक्यावरील फार मोठी चिंता दूर झाली आहे. या दोघांचाही फॉर्म असाच कायम राहावा म्हणून त्याने देवाला नवसही बोलल्याची चर्चा आहे. तर युवराजच्या खेळीने त्याच्या तारुण्यातील आठवणी जागवल्यात. भुवनेश्वर, उमेश यादव, जसप्रीत बुमराह वगैरे मंडळी इंग्लिश भूमीत बळीचा बोनस अधिकाधिक लुटण्याच्या इराद्याने खेळत आहेत. त्यामुळे या  मंडळींसमोर श्रीलंकन संघ जिंकला तर ते आश्चर्यच म्हणावे लागेल.
पण लंकेविरुद्ध मैदानात उतरल्यावर विराटसेनेला एक डोळा आकाशाकडे ठेवावा लागेल. कारण इंग्लंडमधला पाऊस एखाद्या चंचल प्रेयसीसारखा असल्याने त्याचा मूड कधी बदलेल काही सांगता येत नाही. बरं एकवेळ प्रेयसीला समजावता येईल, पावसाला काय समजावणार? बाकी पावसाची मर्जी राहिली आणि नेहमीप्रमाणे आपली फलंदाजी बहरली तर विराटसेना सेमी फायनलचं तिकीट आजच कन्फर्म करेल, यात शंका नाही.