शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

विराटसेनेचेच पारडे जड

By admin | Updated: June 8, 2017 07:11 IST

पाकिस्तानविरुद्घची बहुचर्चित आणि दबाव आणणारी लढत सहज खिशात घातल्यानंतर भारतीय संघाला वेध लागले आहेत

बाळकृष्ण परब/ऑनलाइन लोकमत 
पाकिस्तानविरुद्घची बहुचर्चित आणि दबाव आणणारी लढत सहज खिशात घातल्यानंतर भारतीय संघाला वेध लागले आहेत ते चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ इंग्लंडच्या भूमीवर पाऊल ठेवल्यापासूनच जबरदस्त खेळ करत असल्याने भारतीय क्रिकेटप्रेमींनाही आता चॅम्पियन्स ट्रॉफी आपलीच असल्याचे स्वप्न पडू लागले आहे. मात्र "मंझिल अभी दूर है"  याची जाणीव भारतीय संघाला ठेवावी लागेल, भारतीय संघातील व्यावसायिकता पाहता ही जाणीव असेल अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही. 
बाकी दोन्ही संघांचा सध्याचा फॉर्म पाहता श्रीलंकन संघ म्हणजे बलाढ्य भारतीय संघासाठी काही बिजगणित किंवा भूमितीचा पेपर नक्कीच नाही. पहिल्या लढतील समोर आलेला पाकिस्तानचा संघ जर इतिहासाचा पेपर असेल तर श्रीलंकेचा संघ म्हणजे फार तर भूगोलाचा पेपर. मुरलीधरन, संगकारा, जयवर्धने निवृत्त झाल्यानंतर निर्माण झालेली पोकळी या संघाला अद्याप भरून काढता आलेली नाही. त्यांच्याकडे गुणवान खेळाडू आहेत. अँजेलो मॅथ्युज आणि लासिथ मलिंगासारखे अनुभवी गडीही आहेत, पण काही वर्षांपूर्वीच्या श्रीलंकन संघासारखा दबदबा त्यांना दाखवता आलेला नाही. सलामीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांचा खेळ डळमळीत झाला होता. गेल्या काही वर्षांत श्रीलंकेला भारताविरुद्ध म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही. हीसुद्धा आपल्यासाठी जमेची बाजू ठरेल.
बाकी भारतीय संघात फलंदाजी आणि गोलंदाजांची भट्टी छान जमून आली आहे. रोहित शर्मा आणि शिखर धवनने सलामीच्या लढतीतच शतकी भागीदारी केल्याने विराटच्या डोक्यावरील फार मोठी चिंता दूर झाली आहे. या दोघांचाही फॉर्म असाच कायम राहावा म्हणून त्याने देवाला नवसही बोलल्याची चर्चा आहे. तर युवराजच्या खेळीने त्याच्या तारुण्यातील आठवणी जागवल्यात. भुवनेश्वर, उमेश यादव, जसप्रीत बुमराह वगैरे मंडळी इंग्लिश भूमीत बळीचा बोनस अधिकाधिक लुटण्याच्या इराद्याने खेळत आहेत. त्यामुळे या  मंडळींसमोर श्रीलंकन संघ जिंकला तर ते आश्चर्यच म्हणावे लागेल.
पण लंकेविरुद्ध मैदानात उतरल्यावर विराटसेनेला एक डोळा आकाशाकडे ठेवावा लागेल. कारण इंग्लंडमधला पाऊस एखाद्या चंचल प्रेयसीसारखा असल्याने त्याचा मूड कधी बदलेल काही सांगता येत नाही. बरं एकवेळ प्रेयसीला समजावता येईल, पावसाला काय समजावणार? बाकी पावसाची मर्जी राहिली आणि नेहमीप्रमाणे आपली फलंदाजी बहरली तर विराटसेना सेमी फायनलचं तिकीट आजच कन्फर्म करेल, यात शंका नाही.