शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
2
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
3
केरळ, यूपीसह अनेक राज्यात SIR ला आव्हान; सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला मागितले उत्तर...
4
मोठी बातमी! इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहून भारत दौऱ्यावर येणार, जुनी दोस्ती आणखी घट्ट होणार
5
Local Body ELection: दोंडाईचा नगरपालिका निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय, नगराध्यक्ष आणि सर्वच २६ नगरसेवक बिनविरोध!
6
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
7
रात्री लाईट ऑन करून झोपण्याची सवय असेल तर आताच बदला, आरोग्याचं होईल मोठं नुकसान
8
IND A vs BAN A 1st Semi Final : १२ चेंडूत ५० धावा! बांगलादेशनं भारतीय संघासमोर ठेवलं मोठं टार्गेट
9
ना थांबा, ना विश्रांती… गरुडाचा ६१०० किलोमीटर प्रवास थक्क करणारा; आशियातून आफ्रिकेत ६ दिवसांत पोहोचला
10
पाच वर्ष लपूनछपून डेटिंग, मग भरमैदानात प्रपोज... अशी फुलली स्मृती मंधाना-पलाशची Love Story
11
'माझ्याकडून हे SIR चे काम होणार नाही...' गुजरातमध्ये बीएलओ शिक्षकाने आयुष्य संपविले, देशातील आठवा...
12
BSNL ने किंमत न वाढवताही प्लॅन्स केले महाग; 'या' लोकप्रिय रिचार्ज प्लॅन्सची व्हॅलिडिटी घटवली!
13
टाटा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले; फक्त एकाच क्षेत्रात वाढ, गुंतवणूकदारांचे ₹४.३० लाख कोटी पाण्यात!
14
बर्फ, दलदल, वाळवंट अन् पाणी..; कुठेही चालण्यास सक्षम, भारतीय सैन्याला मिळणार BvS10 सिंधू आर्मर्ड व्हेईकल
15
"तेव्हा कुणी आलं नाही, आता स्टंटबाजी करायला आले, पण मी मारहाण...", भाजपच्या माजी नगरसेवकांने सांगितलं काय घडलं?
16
सावधान! क्रोम युजर्सना मोठा धोका, गुगलने जारी केली सिक्योरिटी वार्निंग, वेळीच व्हा अलर्ट
17
VIDEO: क्रिकेटच्या पिचवर पडली विकेट! पलाशनं कायम 'स्मृती'त राहिल असं केलं हटके प्रपोज
18
कर्नाटक सरकारमध्ये बदल होणार! डीके शिवकुमार यांच्या समर्थकांच्या हालचाली वाढल्या, काही आमदार दिल्लीत तळ ठोकून
19
उपमुख्यमंत्रिपदाची मागणी का केली नाही? चिराग म्हणाले- मी लालची नाही; मिळाले त्यात समाधानी
20
करिश्मा कपूरनं मुंबईतील १ फ्लॅट भाड्याने दिला; दर महिन्याला किती होणार कमाई? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मालिका विजयाच्या षटकारासह विराटचा अनोखा विक्रम

By admin | Updated: February 13, 2017 18:11 IST

कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने एकापोठापाठ सहा मालिका जिंकत मालिका विजयाचा षटकार लगावला आहे

ऑनलाइन लोकमतहैदराबाद, दि. 13 - कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने एकापोठापाठ सहा मालिका जिंकत मालिका विजयाचा षटकार लगावला आहे. हैदराबाद येथे रंगलेल्या कसोटीत भारतीय संघाने बांगलादेशचा दणदणीत पराभव केला. श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज , न्यूझीलंड आणि इंग्लंड सारख्या तगड्या संघांना धूळ चारणाऱ्या भारतानं बांगलादेशची सहज पराभव करत कोसटीत आपणचं शेर असल्याचे दाखवलं. बांगलादेश विरुद्धच्या या विजयासह सलग सहा कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावे झाला आहे. बांगलादेश विरुद्धचा हा सामना विराटचा कर्णधार म्हणून 23 वा सामना होता. या सामन्यातील विजयानंतर त्याच्या नावावर विविध रेकॉर्ड झाले आहेत. - 2015 पासून भारतीय संघ कसोटीच्या मैदानात अजिंक्य आहे. भारताने 2015 मध्ये श्रीलंकेला 2-1 ने हरवून, कसोटी मालिका विजयाला सुरुवात केली- विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतानं सलग सहावी कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला, पण विशेष म्हणजे विराट हा सर्वाधिक 19 कसोटी सामने अपराजित राहणारा भारताचा कर्णधारही ठरला.

 

(अश्विनने केली भज्जीच्या विक्रमाशी बरोबरी)

- याआधी हा विक्रम सुनील गावस्करांच्या नावावर होता. गावस्करांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय कसोटी संघ 18 कसोटी सामने अपराजित होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 26 कसोटी सामने अपराजित राहण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या क्लाईव्ह लॉईडच्या नावावर आहे.

(भारताचा बांगलादेशवर 'विराट' विजय)

 

या यादीत रिकी पॉन्टिंगच्या नेतृत्त्वाखालील ऑस्ट्रेलिया संघ दुसऱ्या आणि विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. पॉन्टिंगच्या ऑस्ट्रेलिया संघानं सलग 22 कसोटी सामन्यांमध्ये अपराजित राहण्याची कामगिरी बजावली आहे.ला.

(या दिवशी रिलीज होणार सचिनचा चित्रपट !)

- 23 कसोटीनंतर सर्वात यशस्वी कर्णधाराच्य़ा यादीत विराट अव्वल स्थानी आहे. धोनी, गांगुलीसारख्या माजी कर्णधारांना मागे टाकत विराट अग्रस्थानी विराजमान झाला आहे. - विराटने नेतृत्व केलेल्या 23 कसोटी सामन्यांपैकी 15 कसोटी सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे तर दोन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला, सहा सामने अनिर्णत राखले आहेत. 23 सामन्यानंतर धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 14 विजय आणि तीन पराभव पत्करले होते. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताला 23 सामन्यांत 10 विजय आणि 7 पराभव स्वीकारावे लागले होते.